Agricultural Department : शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घ्या अन् पिकांची किडीपासून संरक्षण करा, नेमकी योजना काय?
Agricultural Department : शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घ्या अन् पिकांची किडीपासून संरक्षण करा, नेमकी योजना काय?
Agricultural Department : शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घ्या अन् पिकांची किडीपासून संरक्षण करा, नेमकी योजना काय?
खरीप हंगामातील पिकांवर कीडरोगराईची काय अवस्था आहे याचा अभ्यास आता कृषी विभागाकडून केला जाणार आहे. त्यासाठी कृषी क्षेत्रात कामगंध सापळे हे गरजेचे असतात. मात्र, त्यासाठी शेतकरी फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे अभ्यासासाठी नमुने कसे घ्यावेत हा प्रश्न आहे. कापसामध्ये तर कामगंध सापळे हे असणे…
View On WordPress
0 notes
पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच अॅपमधून होणार नोंदणी - GIS map will now be available only while registering the crops
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर आज सकाळी खासगी बस आणि ट्रक दरम्यानच्या भीषण अपघातात चार कबड्डीपटुंचा मृत्यू झाला, तर अन्य दहा जखमी झाले आहेत. जखमींना परिसरातल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या सांडव्याच्या दोन दरवाजांमधून आपेगाव आणि हिरडपुरी बंधारा करिता पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत कालपासून गोदावरी नदीपात्रात हे पाणी सोडण्यात येत आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसंच रामलल्ला प्रतिष्ठापणेनिमित्त अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कार्ड धारक पात्र लाभार्थ्यांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन दिला जात आहे. लाभार्थी साठ टक्के कुटुंबाना हा शिधा उपलब्ध करुन देण्यात आला असून उर्वरितांना वाटप सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
भारतानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज राजकोट इथं तीन बाद २५७ धावा केल्या असून भारताकडे सध्या ३८३ धावांची आघाडी आहे. कालच्या दुसऱ्या डावातल्या दोन बाद १९६ धावसंख्येवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केल्यानंतर भारताचा शुभमन गिल ९१ धावांवर बाद झाला.
****
मलेशियात सुरू आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं थायलंडविरुद्ध दोन- एक अशी आघाडी घेतली आहे. पी. व्ही. सिंधूनं पहिला सामना जिंकल्यानंतर ट्रेसा जॉली आणि गायत्री पुलेला यांनी दुहेरीतल्या लढतीत विजय मिळवला पण तिसऱ्या सामन्यात अस्मिता चल्हाला पराभव स्वीकारावा लागला.
****
अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये फळं, भाजीपाला आणि फुल पिकांची लागवड तसंच संबंधित प्रात्यक्षिकं पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या सहकार्यानं उद्यानविद्या महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २१ आणि २२ तारखेला ही प्रात्यक्षिकं होणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
फळबाग पिकांची नोंद सातबारा वर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे कशी नोंदवावी ! - Record of Orchard Crops in Mobile.
0 notes
पावसाच्या पाण्यावर येणारी अननस | Pineapple on Rain Water | Pineapple Cultivation | #outgrow
आंब्याच्या बागेमध्ये अंतर्गत पीक म्हणून मसाला पिकांची पण लागवड केलेले आहे. त्यामध्येच अननसाची पण लागवड केली आहे. ज्यांच्याकडे बागायती क्षेत्र नसेल त्यांना पावसाच्या पाण्यावर हे पिक आम्ही घेतो त्यामध्ये अननस एक पीक आहे. जून जुलै ऑगस्ट च्या पावसाळ्यामध्ये याची लागवड होते आणि त्याच पाण्यावर हे पीक काढले जाते. अननसाच्या बुंद्याला छोटे-छोटे फुटवे फुटतात त्यापासूनच पुढे रोप तयार होतं. मोठ्या झाडांच्या सावलीतही या झाडांची चांगली वाढ होते. कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न देणारे हे पीक आहे
0 notes
मका खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करा; शेकडो शेतक-यांची मागणी
सुरेंद्रकुमार ठवरे
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकांची लागवड करण्यात आली आहे. बहुतांश शेतक-यांनी मकापिकाची कापणी करुन मळणी करुन विक्रीसाठी तयार केले आहे. त्यामुळे मका खरेदी साठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतक-यासह मका उत्पादक शेतकरी शालीकराम बोरकर, यादोराव बोरकर यांनी केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका हा धान उत्पादनासाठी विदर्भासह राज्यात…
View On WordPress
0 notes
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद
हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली तालुक्यातील मौजे भिरडा शिवारातील किशोर मास्ट यांच्या शेतातील गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊस, फुलकोबी, आंबा या पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी किशोर मास्ट व उपस्थित शेतकरी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून…
View On WordPress
0 notes
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद
हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली तालुक्यातील मौजे भिरडा शिवारातील किशोर मास्ट यांच्या शेतातील गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊस, फुलकोबी, आंबा या पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी किशोर मास्ट व उपस्थित शेतकरी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून…
View On WordPress
0 notes
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवार रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांची तारांबळ उडाली आहे. तर आजपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान रात्री १० पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात ब-याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा देखील पाहायला मिळाला.
दरम्यान रविवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. ज्यात गंगापूर शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यात आणि शहरात अनेक ठिकाणी वादळी वा-यासह रिमझिम पाऊस पडत होता. यासोबत सिरेसायगाव, बोर दहेगाव, चापनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतक-यांचीचिंता वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ ते ८ मार्चदरम्यान वादळवारा आणि विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात काही ठिकाणी वादळवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अवकाळीचा शेतक-यांना फटका
सध्या शेतात हरभरा, ज्वारी, गहू, उन्हाळी मका, करडई आदी पिके काढणीला आलेली आहेत. अशा शेतक-यांनी पिकांची काढणी करून तातडीने ढीग मारून ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक वातावरण पाहून पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असा विभागीय कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.
Read the full article
0 notes
शेती व तिचा इतिहास ... | वस्तूंच्या उत्पादनाशी संबंधीत आहे , सभ्यता शेती व वनीकरणातून अन्न आणि इमरान जनावरांचे पालवायोषण आणि अतिरिका अाधान्य देणयाची लागवड ही रोती ही मुख्य घटना होती यामुळे 25 अधिक दाट व स्तरीय समाजाचा विकास सक्षम झाला कृषी अभ्यासाला अंग्रॉनॉमी म्हणून संबोधले जाते आणि संबंधित बगायती अभ्यास बागायती क्षेत्रात | केला जातो शेती��ध्ये विविध तंत्र आणि विशिष्ट्ये आहेत वाढत्या वनस्पतीसाठी उपयुक्त असलेली जमीन विस्तृत करने पाण्याचे वाहिन्या खोदल्या जातात आणि इतर प्रकारच्या सिंचनाचा वापर केला जातो . शेतीयोग्य जमिनीवर पिकांची वाढ आणि कुरण आणि परिसरावरील जनावरांच्या कुरणात प्रामुख्याने शेतीशी संबंधीत आहे . गेल्या शतकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीची ओळख आणि परिमानायक वाढ विचायत घेण्यामागील मुख्य मुद्दे बनली विकसित जगात , शेतात सेंद्रिय शेती पर्यंत आहे ' आधुनिक शेतीशास्त्र , वनसातीचे संकरीतकरण किटकनाशके व खते व तंत्रज्ञानाच्या सुधारणांनी पिकांचे उत्पादन वेगाने वाढवले आहे . आणि मानवी आरोग्या वर विपरीत परिणाम झाला आहे . सघन स्वाईन होतीसारख्या निवडक प्रजनन व पशुसवंर्धनाच्या आधुनिक पद्धतींनी मांसाचे उत्पादन वाढले आहे . परंतु प्राणी कूटता देखील . वाढली आहे . प्रतिजैविकांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हामौन आणि सामान्यतः वापरल्या जाणाच्या रसायनांबा बतचे मुद्दे उदयास आले आहेत . मांस औद्योगिक उत्पादन महये ,
मान , फार्मास्युटिकल्स आणि उत्तेजक घटकामध्ये प्रमुख कृषी उत्पादनाना खाद्य , फायबर , इंधन वा | विदेशी उत्पादनांचा देखील एक वर्ग आहे सन 2000 पासून | विस्तृतपणे गतबद्ध केले जाऊ शकी सजावटीच्या किया | | जैवइंधन बायोफार्मोस्युटिकल्स , बायोप्लास्टिक्स आणि फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनमा वनस्पतीचा वापर केला .. खास पदाथमिध्ये धान्य भाज्य फले आणि मांसा याचा समावेश आहे . 2007 मध्ये . जगातील जवळजवळ एक तृतीयांस कामगार कृषी क्षेत्रात कार्यया होते . तथापि औद्योगिकीकरणाच्या प्रारंभापासूनच शेतीचे महत्त्व कमी झाले आहे . आणि 2003 मध्ये - इतिहासात प्रथमच सेक क्षेत्राने शेतीला आर्थिक क्षेत्राच्या रूपात मागे टाकले आणि त्याचा प्रसार जगभर पसरला जास्तीत जा | लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला कृषी जगातील लोकसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देते तरीही कृषी उत्पादन सकल जगातील उत्पादनाच्या कमी आहे . कमी बनवते सुमारे 10,000 वर्षापूर्वीच्या विकासापासून , भौगलिक कन्हरेज आणि उत्पादनांमध्ये शेतीचा मोठ्या प्रमाण विस्तार झाला आहे . या विस्तारादरम्यान नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पिके जोडली ठगेली . सिंचन , पीक फिरवियों , खते . आणि किटकनाशके यासारखये शेती पहुंदती फार पूर्वी विकसीत केल्या गेल्या , केतु लक्षणीय गेल्या शतकात घडल्या . मानवी इतिहासाची प्रमुख भूमिका आहे . आणि ती राहील कारण जगातील सामाजीक आणि आर्थिक बदलामध्ये शेतीचा विकास महत्त्वाचा घटक आहे . इतिहासामध्ये घडामोडी फक्त शेतीच्या
-वैभव वैद्य....
0 notes
वर्धेत मुसळधारेने पिकांची दैना ; हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट ; धरणाच्या जलपातळीत वाढ
वर्धेत मुसळधारेने पिकांची दैना ; हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट ; धरणाच्या जलपातळीत वाढ
वर्धेत मुसळधारेने पिकांची दैना ; हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट ; धरणाच्या जलपातळीत वाढ
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसापैकी आताच ४३ टक्के पावसाची विक्रमी नोंद झाली.
वर्धा : जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोनेगाव परिसरात पिकांची झालेली दैना…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 14 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १४ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान - तीनच्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या प्रक्षेपणानंतर, चंद्रावर अलगद यान उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरणार आहे. एल व्ही एम 3 या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान तीनचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. २०१९ च्या चांद्रयान -दोन मोहिमेत सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर कोसळलं होतं. त्यामुळे आताच्या लँडरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. लँडर चंद्रावर अलगद उतरून तिथलं तापमान, तसंच भोवतालची कंपनं मोजून प्लाझ्मा घनतेचा अंदाज लावणार आहे; तसंच रोव्हर परिसरातल्या मूलभूत रचनेबाबत माहिती गोळा करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून चांद्रयान - तीन मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, आज ते पॅरीस इथं फ्रान्सच्या बॅस्टील डे या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित संचलन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताच्या तीनही सैन्य दलाची एक तुकडी देखील या संचलनात सहभागी होणार आहे.
***
जम्मू इथल्या आधार शिबिरातून अमरनाथ यात्रेसाठीची १२ वी तुकडी आज बालटाल आणि पहलगाम साठी रवाना झाली. या तुकडीत सात हजार २०० हून अधिक भाविकांचा समावेश आहे. एक जुलैपासून आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६९ भाविकांनी अमरनाथाचं दर्शन घेतलं आहे.
***
राज्यात शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स अहवालात, महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून, राज्यात शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यातल्या दोन शिक्षकी ३८ हजार शाळांमधला विद्यार्थीपट कमी झाला असून, याची सरकारनं गंभीर दखल घेतली पाहिजे. राज्य सरकारनं लवकरच संबंधितांची बैठक बोलावून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असंही पवार यांनी या पत्रात सुचवलं आहे.
***
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्यानं विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विभागाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तृणधान्य पिकांची पौष्टिकता लक्षात येईल, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्याअनुषंगाने दररोज खिचडीसारखे पदार्थ देण्याऐवजी त्यात विविधता आणण्याची सूचनाही केसरकर यांनी यावेळी केली.
***
बुलढाणा इथं प्रस्तावित असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयास लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांचं नाव देण्याच्या प्रस्तावास शासनानं मान्यता दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा बुलढाणा लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृषी महाविद्यालयाला भाऊसाहेब फुंडकर यांचं नाव देण्याची मागणी केली होती.
***
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात बेलापूर ते पढेगाव दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. निझामाबाद - पुणे एक्सप्रेस १८ आणि १९ जुलैला, दौंड - निझामाबाद एक्सप्रेस १९ आणि २० जुलै ला, पंढरपूर - निझामाबाद एक्सप्रेस १८ आणि १९ जुलै, तर निझामाबाद - पंढरपूर एक्सप्रेस २० आणि २१ जुलै ला रद्द करण्यात आली आहे.
***
सामाजिक क्षेत्रात सातत्यानं काम करीत असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार औरंगाबाद इथल्या स्नेह सावली केअर सेंटरच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे. शहरातल्या समर्थनगर परिसरातल्या आयएमए सभागृहात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
***
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या चोविस तासात जिल्ह्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १४७ मिलीमीटर पाऊस झाला. होडावडे पुलावर पाणी आल्यानं सावंतवाडी – तळवडे - वेंगुर्ला वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची आणि कामावर जाणाऱ्यांची गैरसोय झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
//************//
0 notes
शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही डॉ. इंद्र मणी, सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी…
मातीतील सेंद्रिय घटक संपले आहे, परंतु यामध्ये बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सदृढ बनवू शकतो यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच एकात्मिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वनाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
कृषी पूरक उद्योगांची कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही असेही ते म्हणाले.
बदलते हवामान व बिघडते आरोग्य यासाठी शेती व आहारात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी सारखेच भरड धन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ इत्यादी पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करावी यासाठी बीजप्रक्रिया व खताचे नियोजन करावे असे डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरड धान्याचे आहारातील महत्व आणि सुधारित तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले. गणपत पवार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने प्रयत्न करावा असे आवाहन केले.
जिल्ह्यातील उद्योजक महिला तथा बचत गटांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदविल असून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी बचत गट व महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले, महिलांना स्वावलंबी बनविले अशा सर्व उद्योजक महिला व बचतगटांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेतला आहे.
महोत्सवात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण, भरड धान्य व पदार्थ, विविध यंत्र इत्यादी पन्नासहून अधिक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले असून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा-२०२४ आयोजन केले होते. या स्पर्धा मध्ये विद्यार्थ्याना प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आले
#kvksagrolli #krushived2024 #climatechange #agriculture
0 notes
कुटासा परिसरात कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज, वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी
कुटासा परिसरात कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज, वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, प्रतिनिधी कुशल भगत कुटासा ( अकोट ) दि. 06 नोव्हेंबर :- कुटासा परिसरात अतिवृष्टी व संततधार पावसाच्या संकटानंतर कपाशी पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.कुटासा शेत शिवारातील कपाशी पिकावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. आधीच सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून सडत आहेत.ज्ञकाही ठिकाणी कपाशीचा पाला व फुले गळून पडत आहेत तर काही…
View On WordPress
0 notes
सिंधुदुर्गातील १०० टक्के सातबारावर ई-पीक पाहणी नोंद झाली पाहिजे !
सिंधुदुर्गातील १०० टक्के सातबारावर ई-पीक पाहणी नोंद झाली पाहिजे !
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे उद्घाटन
कणकवली : जिल्ह्यातील शेतक-यांनी या नवीन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन २ या अँपवर जाऊन आपल्या सातबा-यावर पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पीक विमा योजना व अन्य कामासाठी त्याचा उपयोग शासन करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना या ॲपचा वापर करुन पिक पाहणी नोंद करावी.…
View On WordPress
0 notes