छत्रपती शिवाजी महाराज — एक अद्वितीय योद्धा
जयंती आपल्या राजाची
प्रजेच्या प्रखर सूर्याची!
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेज
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रवाद
जगातील एक उत्तम अशा राजाच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आज ही जेंव्हा महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा पहिला दिवा हा महाराजांना असतो,
ते देवाचे अवतार होते म्हणून नाही तर यासाठी की महाराष्ट्रातील मंदिर आणि देवाचं रक्षण माझ्या राजानं केलं.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर सूर्य जन्मला. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा, वाजत होता. ‘शिवाजी’ हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व, ते शौर्यमय आणि धर्माचे पालक होते. त्यांचे सामर्थ्य, वीरत्व, आणि राष्ट्रीय भावना आजही आपल्याला स्फुरण देतात. तसेच त्यांचा संघर्ष आणि साहस ह्या दिवशी शिवाजी महाराजांना स्मरणीय बनवतात.
शिवजयंतीच्या दिवशी राज्यातील विविध शाळांमध्ये विशेष कार्यक्रम होतात. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती नाटक, कथा या द्वारे शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सांगितली जाते. एवढेच काय असंख्य कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवले जातात.
शिवाजी महाराज हे प्रजाहित जाणणारे राजे होते. त्यांनी सर्व धर्मांसाठी समान आणि न्यायप्रिय शासन स्थापनेचा प्रयत्न केला. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्याच स्वप्न पूर्ण केले. यामुळे हा दिवस सर्वांसाठीच आपुलकीचा गर्वाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचे महामेरू आहेत, त्यांची दूरदृष्टी, नीतीमत्ता कमालीची आहे, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभ केलं.
आज याच स्वराज्याचा डंका जगभर गाजताना आपल्याला पाहायला मिळतो.
आपल्या या तेजसूर्याला, प्रजाहितदक्ष राजाला द्या डिजिटल सलाम…
कसे?
तर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारे आपले AdBanao App हे आहे ३५ लाखापेक्षा जास्त बिझिनेसची पहिली पसंद.
आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीचा उत्साह वाढवा फक्त आमच्या सोबत.
Read the full blog on our website
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्याचं प्रशासन अधिक गतिमान तसंच पारदर्शी होण्यासाठी सुशासन नियमावलीला मान्यता.
कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईची काँग्रेस पक्षाची मागणी.
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती उद्योजकता शिबीराचं उद्धाटन.
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल.
****
राज्याचं प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशासन नियमावली २०२३ ला आज मान्यता दिली. आज सह्याद्री अतिथीगृह इथं यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही मान्यता प्रदान केली. शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालावी आणि अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्या होत्या. यासाठी निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने तयार केलेली देशातील अशा स्वरूपाची ही पहिलीच नियमावली असून यामध्ये २०० हून अधिक सूचना देण्यात आल्या आहेत. सुशासन नियमावली २०२३ मध्ये नागरिकांना सुलभरीत्या सेवा मिळण्यावर भर देण्यात आला आहे. यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे.
****
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि मायक्रोसेल टेलिकॉम टॉवर्स बसवून प्रवाशांना दळणवळण सेवा देण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या उपक्रमांतर्गत पहिले १२ खांब ‘इंडस टॉवर्स’ या आघाडीच्या दूरसंचार कंपनीला देण्यात आले आहेत. ‘इंडस टॉवर्स’ कंपनीला आज याबाबतचं पत्र सुपूर्द करण्यात आलं. महा मुंबई मेट्रो विविध इच्छुक एजन्सींसाठी मेट्रोच्या खांबांवर टेलिकॉम टॉवर्सच्या स्थापनेचा परवाना लवकरच देईल. याअंतर्गत महामुंबई मेट्रोला तिकिटाव्यतिरिक्त येत्या १० वर्षात सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
****
अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग-एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने केलेल्या कारवाईच्या विरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वानखेडे यांना दिलासा देत, सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, वानखेडे यांनी यासंदर्भात या याचिकेत अनेक खुलासे केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक इथं इलेक्ट्रॉनिक क्लस्टर विकसित करण्यासाठी जागा निश्चित करण्याचं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. नाशिक इथं उद्योजक संघटनांच्या निमा पॉवर २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यात १२ हजार ३६० उद्योजक तयार झाले आहेत, या वर्षभरात २५ हजार उद्योजक निर्मितीचं उद्दीष्ट असल्याचं सामंत यांनी सांगितलं. दिंडोरी, घोटी याठिकाणीसुद्धा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम.आय.डी.सीच्या विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया उद्या २० मेपासून सुरू होऊन ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल. राज्य मंडळाखेरीज अन्य शिक्षण मंडळांचे इयत्ता १० वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. लवकरच राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू केली जात आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. हे ऑनलाइन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रचलित पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार असल्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलं आहे.
****
केंद्र शासनाने महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांची व्यसनमुक्तीसाठी निवड केली आहे. यामध्ये सोलापूर, ठाणे, जळगांव, कोल्हापूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. “व्यसनमुक्त ग्राम” या शीर्षाखाली जिल्ह्यात पाच तसंच दहा हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती निवडून या गावांमध्ये व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
****
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यां विरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करत, मागण्यांचं निवेदन दिलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर आणि त्र्यंबकेश्वर इथं जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्यात आल्याचा आरोप केला. भडकाऊ भाषणे आणि वक्तव्य करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही राज्यात मात्र या आदेशाचे पालन होताना दिसत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटवण्यात येऊ नये, अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. आज चंद्रपर इथं या समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. भामटा शब्द या जातीतून वगळल्यास, विमुक्त जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ सवर्ण राजपूत घेतील आणि या प्रवर्गात मोडणाऱ्या १४ विमुक्त जातींवर अन्याय होईल, त्यामुळे भामटा शब्द वगळू नये, अन्यथा विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वजातींना सोबत घेऊन राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
****
विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत निर्धारित ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवावी असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं वंदे मातरम सभागृहात कराड यांच्या हस्ते आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती उद्योजकता शिबिराचं उद्धाटन झालं, त्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था - सिपेटच्या विद्यार्थी क्षमतेत दुप्पट वाढ करुन एक हजार विद्यार्थी क्षमता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या काम���ंची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी फुलंब्री तालुक्यातील गणोरी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरु असलेल्या गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर मुर्शिदाबादवाडी, बिल्डा, तसंच सिल्लोड तालुक्यातील भराडी ग्रामपंचायतीलाही त्यांनी भेट देत घरकुल, शाळा, अंगणवाडी, तसंच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या बांधकामांची पाहणी केली.
****
औरंगाबाद इथं एकाच कुटुंबातील तीन जणांनी घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. सातारा पोलीस ठाणे हद्दीत वळदगाव इथं ही घटना घडली. मृतांमध्ये पती पत्नी आणि त्यांच्या चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे. पोलिसांनी तीनही मृतदेह तात्काळ घाटी रुग्णालयात हलवले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमान समुद्र तसंच निकोबार बेटांच्या परिसरात मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. परिणामी देशाच्या नैऋत्य भागात २३ ते २५ मे दरम्यान काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहूरगड इथं श्री रेणुका देवी मंदिर परिसरात उद्या लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचं भूमिपूजन होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यात जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत एकशे दोन या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा पुरवली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णांकरीता एकशे दोन या रुग्णवाहिकेतून सेवा पुरवण्यासाठी शासनाने ठरवून दिलेला प्रति किलोमीटर दर आकारून रुग्णवाहिका पुरवण्यात येते. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी केलं आहे.
****
0 notes
गुजरात मध्ये भूपेंद्र पटेल उद्या दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
गुजरात मध्ये भूपेंद्र पटेल उद्या दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
भूपेंद्र पटेल हे 12 डिसेंबरला सलग दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शनिवारी त्यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. राज्यात भाजप सलग सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी,…
View On WordPress
0 notes
फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं : एकनाथ शिंदे
फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं : एकनाथ शिंदे
मुंबई : संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “या संबंधी…
View On WordPress
0 notes
Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार नाही, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, या दिवशी घेणार शपथ!
Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार नाही, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, या दिवशी घेणार शपथ!
महाराष्ट्र विधानसभेत 106 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. (फाइल फोटो)
प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय
106 आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पुनरागमनाचा टप्पा तयार झाला आहे. आता भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकते.
महाराष्ट्र (महाराष्ट्र) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फ्लोअर टेस्टपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा जाहीर केला.…
View On WordPress
0 notes
विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वितरण - महासंवाद
विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
नागपूर, दि. 05 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पोलीस विभाग, क्रीडा व महसूल विभागातील उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या…
View On WordPress
0 notes
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात
-खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना वंदन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या…
View On WordPress
0 notes
योगेश्वरी मंदिरात आराध बसण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षीही खंड ; या वर्षीही मंदिरात आराध बसण्यास परवानगी नाही .
ओमिओक्रॉन च्या पार्श्वभूमीवर शासनाची दक्षता
अंबाजोगाई – महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव हा योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा महोत्सव म्हणून साजरा होतो. १२ व्या शतकात श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराची स्थापना झाली. त्या वेळेपासून मंदिरात आराध बसण्याची परंपरा आहे. मात्र सलग दोन वर्षे कोरोनाच्या…
View On WordPress
0 notes
सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा, भाजपकडे कोणते पर्याय उपलब्ध ?
सरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा, भाजपकडे कोणते पर्याय उपलब्ध ?
मुंबई : हे सरकार आपल्याच कर्माने कोसळेल, आणि हे सरकार जेव्हा कोसळेल त्या वेळेस आम्ही पर्यायी सरकार देऊ असा दावा विधानपक्ष विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून अजूनही सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडल्यास पर्यायी सरकार देऊ असेही फडणवीस म्हणाले. सरकार स्थापनेसाठी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
जी - ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी भारताला मिळाली असून, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं, ही बाब अधिकच खास झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जी - ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक आणि अभिमान बाळगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, ��्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतातल्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय असून, आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात असल्याचं ते म्हणाले. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात असल्याचं सांगुन पंतप्रधानांनी, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं नमूद केलं. अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला असून, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येत असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. विविध देशांमध्ये भारतीय संगीताबद्दलची आत्मियता त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून यावेळी विषद केली.
भारत देश जगातल्या सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आपण खूप अभिमान बाळगतो. त्यामुळे आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात सध्या शिक्षणाचं क्षेत्र उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, उत्तर प्रदेशचे जतिन ललितसिंह आणि झारखंडचे संजय कश्यप या दोन शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली.
आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसि हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत. इजिप्तच्या राष्ट्रपतींची प्रजासत्ताक दिनाच्या येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि इजिप्तमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून, दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला 'अतिथी देश' म्हणून आमंत्रित करण्यात आलं असल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.
****
स्पेन मध्ये झालेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह एकूण ११ पदक जिंकत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुरेश विश्वनाथ, वंशराज, देविका घोरपडे आणि रविना यांनी सुवर्ण पदक जिंकलं. भावना शर्मा, कीर्ति आणि आशिष यांनी रौप्य, तर तमन्ना, कुंजरानी देवी, लशु यादव आणि मुस्कान यांनी कांस्य पदक जिंकलं.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता जपान विरुद्ध कोस्टारिका, संध्याकाळी साडे सहा वाजता बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, रात्री साडे नऊ वाजता क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, तर रात्री साडे बारा वाजता स्पेन विरुद्ध जर्मनी हे सामने होणार आहेत.
काल या स्पर्धेत अर्जेंटिनानं मेक्सिकोचा दोन - शून्य असा, तर फ्रान्सने डेन्मार्कचा दोन - एक असा पराभव केला. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा एक - शून्य असा, तर पोलंडनं सौदी अरेबियाचा दोन - शून्य असा पराभव केला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९ षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. मात्र पाऊस सुरुच राहील्यानं सामना रद्द करण्यात आला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
JDU-भाजप युती तुटली, CM नितीश राज्यपालांकडे देणार राजीनामा; नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार
JDU-भाजप युती तुटली, CM नितीश राज्यपालांकडे देणार राजीनामा; नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार
JDU-भाजप युती तुटली, CM नितीश राज्यपालांकडे देणार राजीनामा; नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार
Bihar: बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. जनता दल युनायटेडच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेतील आणि राजीनामा सादर करतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील. …
Bihar: बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे.…
View On WordPress
0 notes
देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान : पालकमंत्री प्राजक्त तनपुरे
देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान : पालकमंत्री प्राजक्त तनपुरे
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन साजरा
गोंदिया,दि.1 : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने गेल्या 62 वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करुन विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकाविले असून…
View On WordPress
0 notes
उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर #UkhadDiya ट्रेंड झाला, लोकांनी संजय राऊतांना विचारले- जोश कसा आहे?
उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर #UkhadDiya ट्रेंड झाला, लोकांनी संजय राऊतांना विचारले- जोश कसा आहे?
ठाकरे सरकार पडल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला.
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात फ्लोर टेस्ट होणार नाही. भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकते आणि देवेंद्र फडणवीस 1 जुलैला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. यानंतर बहुमत चाचणी होईल.
महाराष्ट्र राजकीय संकट: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर…
View On WordPress
0 notes
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
नाशिक दिनांक 01 मे 2022 (विमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी अपर आयुक्त भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी तथा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त(महसूल) गोरक्षनाथ गाडीलकर,…
View On WordPress
0 notes
शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रशासकीय कामकाज
शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रशासकीय कामकाज
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मूळ उद्देश सभासदांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. कंपन्यांच्या कामकाजातील पारदर्शकतेसाठी उत्तम व मजबूत प्रशासनाची निर्मिती करणे आवश्यक असून यामध्ये भागधारकांचे हक्क सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता शासनामार्फत विविध तरतुदी करण्यात येत आहेत. गेल्या दोन दशकांचा विचार केला, तर असे निदर्शनास येईल की, केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर…
View On WordPress
0 notes
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना
मुंबई, दि. 29
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने…
View On WordPress
0 notes