#घोडदौड..
ब्रिटनला मागे टाकून भारताची घोडदौड.. बनला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
ब्रिटनला मागे टाकून भारताची घोडदौड.. बनला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
ब्रिटनला मागे टाकून भारताची घोडदौड.. बनला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्याचबरोबर ब्रिटनची आर्थिक क्षेत्रात घसरण होऊन तो ६ व्या स्थानावर घसरला आहे.
ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्याचबरोबर ब्रिटनची आर्थिक क्षेत्रात घसरण होऊन तो ६ व्या स्थानावर…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 17 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
जागतिक समृद्धीकरता सबका साथ आणि सबका विकास हे सूत्र अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतानं दुरस्थ पद्धतीने आयोजित केलेल्या दुसर्या वॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक हिताचा विचार करता, ग्लोबल साउथ मधल्या देशांनी एकत्र येत आपल्या भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, ग्लोबल साऊथ मधल्या देशांचा आवाज बुलंद करणं, हे भारतानं आपलं कर्तव्य मानलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. अलिकडेच पश्चिम आशिया क्षेत्रात घडलेल्या घटनांमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असली, तरी एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य या दृष्टीनं वाटचाल केल्यास जागतिक हित साध्य होईल, असा विश्वास, पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
****
मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व २३० विधानसभा जागांसाठी तर छत्तीसगडमधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या ७० जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मध्य प्रदेश २८ टक्के, तर छत्तीसगढमध्ये २० टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. संध्याकाळी सहा वजोपर्यंत मतदान चालणार आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आज विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा, रोड शो होत आहेत. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडे २८ हजार ५७ अर्ज आले आहेत.
****
येत्या चार डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा भव्य सोहळा किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात सनम्वय ठेऊन काम करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची अर्थात नाईट लँडिंगची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. लवकरच दिल्ली इथलं डी जी सी ए चं पथक चिपीमध्ये येऊन याबाबतची तपासणी करणार आहे.
****
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९० साली प्रति हेक्टर ३२ टनांहून अधिक माती वाहून गेली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ६२ टन ७०० क्विंटलवर पोहोचल्याचं प्राध्यापक पेन्नन चिन्नसामी आणि वैशाली होनप यांनी केलेल्या अभ्यासात आढळलं. महाराष्ट्रात ९७ टक्क्यांनी जमिनीची धूप वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे.
****
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाक��े यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह मुंबईत शिवाजी पार्क इथं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं.
****
शासकीय सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अमरावती इथं कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरवात झाली आहे. गेल्या २४ दिवसांपासून या कर्मचार्यांचं आदोलन सुर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी देशाच्या लोकसभेत ठराव पारित करणं गरजेचं असल्याचं मत मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. यासाठी आपण राज्यभरातल्या लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा ठराव मंजूर करुन घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे येत्या २४ नोव्हेंबर रोजी औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात ८० टक्के पीक हे सोयाबीनचं घेतलं जातं. मात्र सोयाबीनला मिळणारा आताचा दर उत्पादन खर्च बघता अत्यल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
आयुष्यमान भारत अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी घोडदौड सुरू आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आदिवासी जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्हा गेल्या रविवारी केलेल्या कामकाजात देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलाआहे.विशेषत: रविवार आणि दिवाळीची सुट्टी असताना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय हेल्थ ऑथॉरिटी यांनी जिल्ह्याचं अभिनंदन केलं आहे.
****
0 notes
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली खरी,पण पुढचा मार्ग मात्र काट्याकुट्यानी भरलेला,
खरी शिवसेना कोणाची ? याविषयीचा तिढा निवडणूक आयोगाने नुकताच सोडवला
आहे.बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना ( शिंदे गट ) असून शिवसेना हे पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाचे,असा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.आयोगाच्या या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर हे प्रकरण इथेच संपणारे नाही,कारण उद्धव ठाकरे गटाने आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे.त्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घ काळ चालणार आहे.
सेनेच्या स्थापनेनंतरच्या ५७ वर्षाच्या वाटचालीत सेनेने आजवर अनेक वादळे व संकटे अंगावर झेलली.त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर तब्बल तीन दशकानंतर सेनेने १९९५ साली सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला.भाजप सोबत त्यांनी युती सरकार स्थापन केले व त्यांची राज्यभरात घोडदौड सुरू झाली.मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मूठभर संवगड्याना सोबत घेऊन १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.ऍड.बळवंत मंत्री,प्रमोद नवलकर,वामनराव महाडिक,दत्ताजी साळवी,दत्ता नलावडे,लीलाधर डाके,मनोहर जोशी,मधुकर सरपोतदार,सुधीर जोशी,डॉ.हेमचंद्र गुप्ते,सूर्यकांत महाडिक,बंडू शिंगरे,या साथीदारांना सोबत घेऊन बाळासाहेबांनी ३० ऑक्टो.१९६६ रोजी शिवतीर्थावर पहिला मेळावा घेतला.या पहिल्याच मेळाव्याला मराठी जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला.सुमारे पाच लाख लोक,या मेळाव्याला उपस्थित होते.मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संघटना अशी ओळख जनमानसात तयार झाल्यानंतर बाळासाहेबांनी राज्यभरात झंझावती दौऱ्यास सुरुवात केली.त्यामुळे अल्पावधीत संघटनेची लोकप्रियता वाढत गेली व १९६८ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सेनेने पहिल्याच प्रयत्नात ४२ नगरसेवक निवडून आणले. त्यानंतर परळ विधानसभेचे आ.कॉ.कृष्णा देसाई यांची हत्या झाली व त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली.या पोटनिवडणुकीत सेनेने वामनराव महाडिक याना उतरवले.त्या निवडणुकीत सेनेचे चिन्ह होते," उगवता सूर्य," अटीतटीच्या लढतीत डाव्यांचा उमेदवार पडला व महाडिक निवडून आले.अशाप्रकारे सेनेचा विधिमंडळात प्रवेश झाला.त्यानंतर सेनेचे उमेदवार विविध चिन्हावर निवडणूक लढवत राहिले,पण त्यांना फारसे यश मिळू शकले नाही.१९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेनेला मशाल हे चिन्ह मिळाले.त्या निवडणुकीत सेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले व पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली.
अशाप्रकारे सेनेची घौडदौड सुरू झाली. अल्पावधीत गावागावात शाखा उभारल्या गेल्या.१९७५ च्या दरम्यान देशात प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधकांना रोखण्यासाठी देशावर आणीबाणी लादली.त्यांच्या या निर्णयाला सर्व थरातून विरोध झाला.अनेक राजकीय नेत्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.अशावेळी बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयाचे समर्थन केले व त्यांच्या इंदिरा काँग्रेससोबत युती केली.मात्र ही युती फार काळ टिकली नाही.त्यानंतर १९८९ साली भाजप नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलो पाहिजे,असा आग्रह बाळासाहेबांकडे धरला व ते त्यांच्या गळी उतरवले.अशाप्रकारे १९८९ साली सेना-भाजप युती आकाराला आली.त्यानंतरच्या पाच वर्षात अनेक निवडणुकीत युतीला फारसे यश मिळू शकले नाही.
१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली व राज्यात काँग्रेसेतर सरकार स्थानापन्न झाले.सेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.काही काळ शांततेत गेल्यानंतर युतीमध्ये अंतर्गत बेबनाव व तंटेबखेडे सुरू झाले.सतत निर्माण होणाऱ्या मतभेदांमुळे दरी रुंदावत गेली पण महाजन-मुंडे जोडगोळीने ते तुटेपर्यंत ताणू दिले नाहीत.मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ नारायण राणे यांच्या गळ्यात पडली.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळवता आले नाही.निवडणुकीत राणे यांच्या समर्थकांची तिकिटे कापण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले व उद्धव-राणे यांच्यामधील संघर्ष पराकोटीला गेला.दरम्यान छगन भुजबळ यांचे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात बाळासाहेबासोबत मतभेद झाले व भुजबळ यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत,पवारांचे घड्याळ हाती घेतले.उद्धव-राणे असा संघर्ष सुरू असतानाच उद्धव-राज या दोघा भावंडामध्ये कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली.भुजबळ,राणे व राज या तिघांनीही आपापले मार्ग स्विकारले.गेल्या जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी या सर्वांवर कडी करत सेनेचे " होत्याचे नव्हते," केले.सन २०१४ साली जागावाटपावरून युती मध्ये बेबनाव निर्माण झाला व दोन्ही पक्ष स्वबळावर लढले.पण निकालानंतर सत्तेसाठी दोघांनाही एकत्र यावे लागले.नंतरच्या काळात या दोघांमधील दरी रुंदावत गेली.निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली व दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून निवडणूक लढले. निकालानंतर भाजपशी काडीमोड घेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.हिंदुत्वाशी फारकत घेत सेनेने हिंदुत्वाला कायम विरोध करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सोयरीक केली.त्यामुळे बिथरलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला व एका रात्रीत महाविकास आघाडी सरकार कोसळले.ज्या बाळासाहेबांनी अथक प्रयत्नातून पक्ष उभारला,त्या पक्षाच्या आता अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या आहेत.उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय पक्षासाठी कपाळमोक्ष करणारा ठरला.एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव त्यांना इतर आमदार,खासदार,
नगरसेवक,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व शिवसैनिकांची मिळालेली साथ,यावरून सेनेत प्रचंड असंतोष होता,आमदार/खासदारामध्ये प्रचंड नाराजी होती,हे उघड झाले.आज पक्षाची अवस्था दयनीय अशी झाली आहे.पक्षाचे नांव व चिन्ह गेले तरी त्यांच्या बोलघेवड्या प्रवक्त्याना अद्याप शहाणपण सुचलेले नाही.काल परवापर्यंत हिंदुत्वाच्या प्रश्नावर उद्धव व आदित्य ठाकरे यांना शिव्यांची लाखोली वाहत होते,ते आज उद्धवजीचं हिंदुत्वच कसं खरं आहे,हे छाती बडवून सांगताना पाहायला मिळतात.ज्या सरकारवर घटनाबाह्य सरकार म्हणून आदित्य ठाकरे सतत टीकास्त्र सोडत होते,त्यांनी आता राज्यघटना किती परिपूर्ण व परिपक्व आहे,हे समजून घ्यायला हवे.अजूनही वेळ गेलेली नाही,उद्धव ठाकरे यांनी केवळ टोमणे मारण्यात वेळ वाया घालण्याऐवजी आपला पक्ष अधिक कमकुवत होणार नाही.सुरू झालेली गळती कशी थांबेल,यावर लक्ष केंद्रित करायला हवे. तसेच रोज सकाळी उठून चॅनेल्सवर नको त्या प्रतिक्रिया देणाऱ्यांना पायबंद घालावा,अन्यथा येणारा काळ फार कठीण आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर पुन्हा गळती सुरू होण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांची संभावना करण्याची एकही संधी सेनेचे प्रवक्ते सोडत नाहीत.पण त्यामुळे शिंदे गटाला सहानुभूती मिळते,हे ते विसरतात.२०१९ चे सत्तांतराचे नाट्य आपल्या असं अंगलट येईल,असे उद्धव ठाकरे यांना स्वप्नातदेखील वाटलं नसेल,पण तसं घडलं,याला दस्तुरखुद्द उद्धव,आदित्य, संजय राऊत,विनायक राऊत व आसपास वावरणारी चौकडीच जबाबदार आहे.
एकनाथ शिंदे या सर्व घडामोडीमुळे आनंदी जरी असले तरी भविष्यात त्यांनाही सावधगिरी बाळगावी लागणार आहे.कारण भाजपचे एक मिशन पूर्ण झाले आहे,मुंबई महानगरपालिका व स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता यासाठी भाजपवाले कोणत्याही थराला जाऊ शकतात.आपली अवस्था जेवणाच्या ताटातील कडीपत्यासारखी होता कामा नये,याची काळजी एकनाथ शिंदे यांनी घ्यायला हवी.कारण भाजपने आजवर ज्या पक्षाना सोबत घेतले,त्यांचे त्यांनी खच्चीकरण केले,असा इतिहास आहे.त्यामुळे शिंदे यांनीही फार हुरळून जाता कामा नये.
1 note
·
View note
असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : 23 ऑक्टोबर
असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : 23 ऑक्टोबर
रविवार, २३ ऑक्टोबर २०२२. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना “आज वर्ज्य दिवस आहे.” उल्कादर्शन, दीपदान.टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तरार्ध लाभदायक आहे. व्यवसायात दबदबा राहील. प्रगतीची घोडदौड चालू…
View On WordPress
0 notes
युवा सेनेच्या पदाधिकारी निवडीचा धडाका सुरूच!
युवा सेनेच्या पदाधिकारी निवडीचा धडाका सुरूच!
कोकिसरे विभाग प्रमुख पदी रोहित पावसकर तर लोरे गणेश पवार यांची नियुक्ती
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर
कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेनेची घोडदौड सुरूच असून, युवासेनेच्या पदाधिकारी नियुक्तीचा धडाका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सुरू ठेवला आहे. नुकत्याच वैभववाडी तालुक्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकांमध्ये युवा सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…
View On WordPress
0 notes
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'औरंगाबादची विकासाकडे घोडदौड' पुस्तिकेचे प्रकाशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ पुस्तिकेचे प्रकाशन
औरंगाबाद 01 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि ३१) विभागीय आयुक्त कार्यालयात झाले.
या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजना आणि प्रकल्पाची फलनिष्पत्ती याविषयीच्या माहितीचा समावेश आहे.
प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब…
View On WordPress
0 notes
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'औरंगाबादची विकासाकडे घोडदौड' पुस्तिकेचे प्रकाशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ पुस्तिकेचे प्रकाशन
औरंगाबाद 01 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि ३१) विभागीय आयुक्त कार्यालयात झाले.
या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजना आणि प्रकल्पाची फलनिष्पत्ती याविषयीच्या माहितीचा समावेश आहे.
प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब…
View On WordPress
0 notes
2रा T20I पूर्वावलोकन: वेस्ट इंडीज विरुद्ध विजयी धावा सुरू ठेवण्याचा उत्साही भारताचा अंदाज | क्रिकेट बातम्या
2रा T20I पूर्वावलोकन: वेस्ट इंडीज विरुद्ध विजयी धावा सुरू ठेवण्याचा उत्साही भारताचा अंदाज | क्रिकेट बातम्या
रोहित शर्माचा दमदार भारत विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी आणि सोमवारी दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजवर वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करेल. पाहुण्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात सर्वसमावेशक विजय मिळवत आहेत. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना वेगळे केले ते केवळ त्याची अष्टपैलू कामगिरीच नाही तर रोहितने आपल्या तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवलेले हुशार कर्णधारही. रवींद्र जडेजा,…
View On WordPress
0 notes
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकताच ट्विटरवर वर्चस्व गाजवले, लोक म्हणाले - 'हे एक रौप्यही सोन्याच्या ढिगाऱ्यात वेगळ्या पद्धतीने चमकेल'
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकताच ट्विटरवर वर्चस्व गाजवले, लोक म्हणाले – ‘हे एक रौप्यही सोन्याच्या ढिगाऱ्यात वेगळ्या पद्धतीने चमकेल’
नीरज चोप्राची विजयी घोडदौड सुरूच आहे. आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेकीत रौप्य पदक जिंकून त्याने 140 कोटी भारतीयांचे डोके अभिमानाने उंच केले आहे.
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
नीरज चोप्राने आपण ‘भालाफेक’मध्ये निष्णात असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यांची विजयी घोडदौड सुरूच आहे. जागतिक अॅथलेटिक्स…
View On WordPress
0 notes
परिवर्तन
परिवर्तन
विश्वविजयाचा प्रचंड व दुर्दम्य संकल्प मनाशी बांधून तो तरूण राजपुत्र आपल्या सैन्यासह निघाला होता.स्वत:चे साहस,धैर्य,चातुर्य,कल्पकता,उदंड उत्साह या गुणांबरोबरच जीवास जीव देणारे सैन्य व आईचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या राजपुत्राने देशामागून देश,लधायांमागून लढाया,युद्धामागून युद्धे जिंकली ती आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर.
ही प्रचंड व अखंड घोडदौड सतत चालू होती. नुकतीच एक अवघड मोहीम जिंकून आल्यावर हा तरूण राजपुत्र बागेतून नयनरम्यं वनश्री पाहत फिरत होता. वनश्रीचे दर्शन घेत असतानाच राजपुत्राच्या समोर केसांचे संपूर्ण मुंडण केलेला,हाती लांब सोटा व अंगावर करड्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला तेजस्वी पुरूष उभा राहिला. त्याच्या चेहर्यावरिल तेज पाहून राजपुत्र प्रभावित झाला.मंद स्मित करीत तो तेजस्वी पुरूष राजपुत्राला म्हणाला,”राजपुत्रा ! कुठे निघालास ? मी येऊ तुजबरोबर ?”
त्याबरोबर राजपुत्राने त्या तेजस्वी पुरूषाकडे एक कटाक्ष टाकला. राजपुत्र त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झाला होता. आता त्याच्या वाणीतील सामर्थ्य पाहून त्याच्या मनात एकदम पूज्यबुद्धी उत्पन्न झाली व त्याने आपल्याबरोबर येण्यास आनंदाने संमती दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या तेजस्वी पुरूषाने राजपुत्रास विचारले, “राजपुत्रा,तू कोणत्या उद्देशाने या मोहिमा आखत आहेस ?”
त्यावर तो राजपुत्र उत्तरला, “महाराज,मी जग जिंकण्याच्या उद्देशाने,जगास आपले अंकित करण्याच्या मनोदयाने या मोहिमांवर आलो आहे.”
राजपुत्राच्या बोलण्यावर सौम्यं शब्दांत तो भिक्षू म्हणाला, “म्हणजे राजपुत्रा, तू जगास आपले दास बनविण्याच्या उद्देशाने आपली मातृभूमी सोडून इतक्या लांब आला आहेस तर !”
“होय ! आपल्या बाहुबलाच्या-तलवारीच्या जोरावर हे जग जिंकून त्यास आपले मांडलिक बनविणे ही माझी महत्वाकांक्षा आहे. माझ्या महत्वाकांक्षेलाच मी मूर्त स्वरूपात उतरवीत आहे.”
“पण राजपुत्रा, जरा तू आपल्या अवलंबिलेल्या या मार्गाबाबत कधी सारासार विचार केला आहेस ? स्वत:ची अवास्तव व अवाजवी उच्चाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तू किती निरपराधी, निष्पाप जीवांच्या प्राणाशी खेळ करतोयस. हा रक्तपात, ही हानी केवळ एका नश्वर संपत्तीसाठी अन केवळ सुखोपभोगासाठी ? तुला आपली अविचारी व राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा रक्तपात करण्याचा अधिकार कुणी दिला ? ही अराजकसदृश परिस्थिती, शांततेच्या जागी हे भीतीचे साम्राज्यं स्थापण्याचा तुला अधिकारच काय ?”
भिक्षूच्या स्पष्टवक्तेपणाचे त्यास आश्चर्य वाटले. “यात अधिकाराचा प्रश्नच काय ? दुर्बलांबर सबलांची सत्ता प्रस्थापित होणे हा तर सृष्टीचा अलिखित नियमच आहे. या नियमास अनुसरूनच माझे वर्तन आहे. जगावर राज्यं प्रस्थापित करायचे तर तलवारीला पर्याय नाही.
“पण तुला ही शक्ती. हे बाहुबल,हे राज्यपद बहाल करण्यात आले आहे ते त्यांचे रक्षण करण्यासाठी. त्यांचे स्वातंत्र्यं हिरावून त्यांना गुलाम बनविण्यासाठी नव्हे. तुझ्या हाती ही तलवार आहे ती दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी.पण याचा वापर होतो आहे तो रक्तपात करण्यासाठी,अराजकता माजवण्यासाठी,विषमता प्रस्थापित करण्यासाठी,दुसर्यांना गुलाम बनवण्यासाठी.अशा शस्त्रांचा,अशा अस्त्रांचा उपयोगच काय ? अशी शस्त्रे मोडीतीच न��घायला हवीत. या शस्त्रांच्या दहशतीने मानवी मनाला फार थोड्या काळाकरिता ताब्यात धरून ठेवता येते,त्यावर हुकूमत गाजवता येते. अशी हुकूमत क्षणार्धात नाहीशी होते,कोलमडून पडते. तू आपल्या तलवारीच्या जोरावर आतापर्यंत भयंकर नरसंहार करून सर्वत्र धावपळीचे,दहशतीचे साम्राज्यं उभे केले आहेस. तसे पाहता मानवी मन हे संवेदनक्षम. या दहशतीऐवजी लोकांना गरज असते प्रेमाची, प्रेमाने वागनविण्याची,समजून घेण्याची. सततच्या लढायांमुळे पाहा हा आजूबाजूचा मुलूख कसा उजाड,वैरण झाला आहे. येथल्या माणसांवरच काय, पण पशू-पक्षी,झाडापनांवरदेखील दहशतीची छाया पसरली आहे. माणसाला गरज असते ती शांत वातावरणाची. शांततेच्या काळात प्रत्येक जण आपापल्या नित्यक्रमात गर्क असतो.त्याचा परिणाम राष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्याही उत्थानात होतो. तर त्याउलट त्यांना दास बनविल्याने समाजात विषमता निर्माण होते. मनुष्याचे माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्कं नाकारण्यात येतात. तुझ्यात आणि सामान्यं दासात फरक तो काय ? तुला व त्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे ,दोन कान, त्याला व तुला एकच डोके,भूक लागणारे पोट. मग त्याला तू तुझ्यापेक्षा हीन म्हणून का वागवावे ? निसर्गाने मानवाला विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे. त्याचा उपयोग तू दासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी केलास ?”
“नाही महाराज,तशी गरजच कधी मला पडली नाही.”
“राजपुत्रा! तू केवळ तुझेच सुख पाहिलेस.यामुळे माणसामाणसातील दरी वाढत जाते. एकमेकांना दुसर्याच्या सुखाचा हेवा वाटून वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली की, ती भागविण्यासाठी, ती तृष्णा शमविण्यासाठी चढाओढ लागते अन सर्व दु:खास,रक्तपातास कारणीभूत अशी वर्चस्वाची भावना निर्माण होते. ही भावना वाढीस लागली की, सबल-निर्बल, गरिब-श्रीमंत असा झगडा सुरू होतो. या झगड्यात कुणीच सुखी होत नाही. मात्र जीवनास एक अनिश्चितता,दहशत प्राप्त होते. समोर असलेली व्यक्ती ही माझ्याच दर्जाची आहे.माणूस म्हणून तिचेही जगण्याचे,वावरण्याचे काही हक्कं आहेत. तिलाही ते मिळावेत यासाठी जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा सार्वत्रिक बंधुभाव निर्माण होतो व हा बंधुभाव अनिश्चितता व दहशत संपविण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून हे राजपुत्रा, तू आपले नश्वर आणि क्षणिक वैभव वाढविण्यासाठी व्यर्थ रक्तपात चालविला आहेस तोही व्यर्थच आहे. हे जीवन आधीच यातनांची खाण आहे. त्यात तू आणखी भर टाकतो आहेस.तू आपल्या शरीराचे चोचले पुरविण्यासाठी जो जग जिंकण्याचा निरर्थक खटाटोप चालविला आहेस तो अस्थायी आहे. तो कधी ना कधी नाश पावणारच ! परंतु या प्रलयात अनेकांच्या जीवनाची मात्र राखरांगोळी होणार आहे. या जगात शाश्वत, चिरंजीवी असे काही नाही. तेव्हा तू विश्वविजयाच्या गृष्टीने जो रक्तपात चालविला आहेस तो फोल आहे. जगाला तलवारीची गरज नाही,तर प्रेमाची गरज आहे. प्रेमाने प्राणिमात्रांना जिंकता येते,आपलेसे करता येते. ज्या गोष्टी दहशतीने करता येत नाहीत त्या प्रेमाचे दोन गोड शब्द बोलण्याने साध्यं होतात. तर याउलट सततच्या युद्धपरिस्थितीमुळे राज्येच्या राज्ये, साम्राज्ये नाश पावतात, सुंदर नगरे,शेते उजाड होतात. परिणामी लोक अन्नं, वस्त्रं, निवारा या आपल्या मूलभूत गरजांना पारखे होतात. युद्धाची झळ दोन्ही बाजूंना सारखी सोसावी लागते. अपमानास्पद स्थिती प्राप्त झाल्यामुळे वैमनस्यं वाढीस लागते. याची परिणिती विनाशात होते. तेव्हा काही कारण नसताना या विनाशाला निमंत्रण देण्याचे कारणच काय ?”
बुद्धांच्या मुखांतून बाहेर पडत असलेले ते ओजस्वी शब्द जगज्जेतेपदाची स्वप्ने पाहात असलेला सिकंदर एकाग्रपणे ऐकत होता, आपल्या अंत:करणात साठवत होता. थोड्या वेळाने भरल्या अंत:करणाने बुद्धांच्या चरणांजवळ झुकून तो म्हणाला,”महाराज, मी चुकलो. तारूण्याच्या या उत्साहात माझ्या हातून अनेक चुका घडल्या. माझ्या या कृत्यांतील फोलपणा माझ्या ध्यानात आला आहे.”
राजपुत्राचे हे पश्चातापदग्ध बोलणे ऐकून बुद्ध त्यास म्हणाले,”राजपुत्रा,आपल्या हातून घडलेल्या वाईट कर्मांवर पश्चाताप करणाराच खरा माणूस असतो. तर आपल्या वाईट कृत्यांवर खूश होणारा,त्यातून आनंद मिळवणारा मानूस राक्षस असतो. माणूसपणाची साक्ष तू दिली आहेस. तेव्हा आपल्या राज्यात परत जा व लोककल्याणकारी कामे कर. तेव्हाच तू लोकांच्या हृदयावर राज्यं करशील. लोक आदराने तुझे आदराने नाव घेतील.”
बुद्धांच्या तत्वज्ञानाने ,शिकवणुकीने मनाचा खोल वेध घेतलेला तो राजपुत्र उठला व आपल्या सैन्यासह , नव्या मनुसह स्वत:वर स्वत:वर विजय मिळविण्याच्या आकंक्षेने स्वदेशी रवाना झाला.
© :- पंकज कालुवाला
1 note
·
View note
MahaVikasAghadi : दोन वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्रमय प्रदर्शन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा आरसा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
#MahaVikasAghadi : दोन वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्रमय प्रदर्शन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा आरसा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत #Maharashtra
MahaVikasAghadi : मुंबई, (दि १७ मार्च २०२२) : राज्य शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक असून महाविकास आघाडी सरकारनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासाची घोडदौड यात प्रतिबिंबित होत असून हे प्रदर्शन शासनाच्या विकासकामांचा आरसा आहे अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…
View On WordPress
0 notes
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची विजयी घोडदौड; भाजपचे पसमांदा कार्ड फेल
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची विजयी घोडदौड; भाजपचे पसमांदा कार्ड फेल
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची विजयी घोडदौड; भाजपचे पसमांदा कार्ड फेल
नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची पुन्हा एकदा जादू चालली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजप कडवी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निकालांमुळं महायुतीची जबाबदारी वाढली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यभरातल्या ग्रामपंचायत, सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्णत्वाकडे
बीड जिल्ह्यात क्षीरसागर गटाचं वर्चस्व तर अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला यश
आणि
नांदेड पाटबंधारे मंडळाकडून पाण्याच्या आवर्तनांचं वेळापत्रक जाहीर
****
ग्रामपंचायतींसह सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीतल्या आजच्या निकालांवरुन जनतेचं महायुतीला पाठबळ असल्याचं स्पष्ट होत असून महायुतीची जबाबदारी वाढली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या निकालांबाबत माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले -
आमची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणखी काम करू. या राज्याचा विकास करू. आणखी उद्योगध��दे आणू. तरूणांना नोकऱ्या, हाताला काम, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं जे काही धोरण आम्ही आखलेलं आहे, त्याला अधिक गती देऊ, अधिक चालना देऊ. आणि केवळ सव्वा वर्षामध्ये एवढा भरघोस पाठिंबा या ठिकाणी जनतेने दिलाय. ही अशीच घोडदौड पुढे चालू राहील. पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हेच महायुतीचं यश कायम राहील, किंबहुना यामध्ये वाढ होईल. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंचेचाळीस प्लस जागा या राज्यामधून आम्ही देऊ.
****
राज्यभरात दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींसह १३० सरपंचपदांसाठीच्या काल झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत असून निकाल प्राप्त होत आहेत. मराठवाड्यातल्या २४८ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत आहे. बीड जिल्ह्यातल्या १८६, नांदेड १९, छत्रपती संभाजीनगर १६, लातूर १३, धाराशिव सहा, तर परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्या मतमोजणी होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांतल्या १५८ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटानं जिंकल्या आहेत. त्या पाठोपाठ बीड तालुक्यात आमदार संदीप क्षीरसागर गटानं विजय मिळवला आहे तर डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या गटानं प्रथमच तीन ग्रामपंचायतींमध्ये विजय प्राप्त केला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून सर्वाधिक जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दोन ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले असून जांभूळटोला इथं महायुती तर माकडी इथं सात पैकी पाच जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३७ ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ठिकाणचे निकाल हाती आले असून यात काँग्रेसनं सर्वाधिक १७ जागी विजय मिळविला आहे. भाजपनं ८, शिवसेना शिंदे गट ३, शिवसेना ठाकरे गट २, बीआरएस २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १, आणि अपक्षांनी ४ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. नागपूर जिल्ह्याच्या १४० सरपंच पदांपैकी ११४ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. ३६५ सरपंच पदापैकी २४० पेक्षा जास्त जागा भाजप समर्थित उमेदवार जिंकतील असा विश्वास नागपूर ग्रामीणचे पक्ष प्रमुख सुधाकर कोहळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या १४ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं सर्वधिक जागा मिळवून आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीनं तीन जागांवर, काँग्रेस दोन जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं दोन जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, प्रहार जनशक्ती यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपनं २३ पैकी सरपंचपदाच्या १५ जागांवर विजय मिळवला आहे.
****
राज्यात झालेल्या दोन हजार तीनशे एकोण साठ ग्रामपंचायतींपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महायुतीनं राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला असल्याचं त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या विधिमंडळासंदर्भात एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
****
केंद्रीय माहिती आयुक्त हीरालाल समरिया यांनी आज मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना या पदाची शपथ दिली.
****
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव मिळवून देण्यासाठी एक फिरतं वाहन नागपूरकरांच्या सेवेत आजपासून रुजू झालं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, यांच्या हस्ते आज सकाळी नागपूरमध्ये याचं लोकार्पण करण्यात आलं. थेट गरजू रुग्णांच्या घरापर्यंत पोचून दररोज १५ रुग्णांची तपासणी या माध्यमातून करता येईल. दिव्यांगाच्या अपंगत्वाचं मूल्यांकन, मोजमाप आणि अवयवांचं वितरण वेगवान पद्धतीनं करण्यासाठी हे वाहन तयार करण्यात आलं आहे.
****
रब्बी हंगामाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आणि पूर्णा पाटबंधारे विभागाद्वारे फेब्रुवारी २०२४ पर्यत पाण्याची आवर्तनं नांदेड पाटबंधारे मंडळानं जाहीर केली आहेत. रब्बी हंगामासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प -इसापूर धरणातल्या उपलब्ध पाणीसाठयानुसार एकूण चार पाणीपाळया देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिलं आर्वतन उजव्या आणि डाव्या कालव्यातून कालपासून येत्या २५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येत आहे. दुसरं आर्वतन पाच ते २५ डिसेंबर या कालावधीत तर तीसरं आवर्तन पाच जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत सोडण्यात येणार आहे. या सर्व आवर्तनाचा कालावधी २० दिवसांचा राहील, असं मडळानं जाहीर केलं आहे.
****
हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज बीड इथं नुकतेच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची पाहणी केली, त्यावेळी भुजबळ बोलत होते. बीडमध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी आहे, हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे, असं त्यांनी नमूद केलं. आता याच्या मुळाशी गेलं पाहिजे नाहीतर पुन्हा सरकारनं गुन्हे मागे घ्यायचे हे चालणार नाही, असं ते म्हणाले. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर आणि प्रशासनातील अन्य अधिकारी भुजबळ यांच्या या पाहणीवेळी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात दिवाळीनिमित्त शासनाकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ झाला आहे. नांदेड जिल्ह्यासाठी पाच लाख ६२ हजार ८५१ पिशव्या उपलब्ध झाल्या असून पुरवठा विभागाकडून तालुकास्तरावर वाटप सुरू झालं असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
सकल मराठा समाजातर्फे सोलापूर इथं गेल्या तेरा दिवसांपासून सुरु असलेलं साखळी उपोषण आज आंदोलकर्त्यांनी स्थगित केलं. नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरुन उपोषण मागं घेत असल्याची माहिती आंदोलक गणेश देशमुख यांनी दिली आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांवर कंत्राटी स्वरूपात काम सुरू आहे. यात आरोग्य परिचारिका आरोग्य सेविका यापासून ते वैद्यकीय अधिकारी या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेनं बांगलादेशसमोर विजयासाठी २८० धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीमध्ये सुरू या सामन्यात चरिथ असलांकाच्या १०८ धावांमुळं श्रीलंकेला २७९ धावांचा टप्��ा गाठता आला. या सामन्यादरम्यान पंचांनी फलंदाजी करायला वेळ लावल्यानं अँजलो मॅथ्यूजला `टाईमड आऊट` देण्याचा अभूतपूर्व निर्णय दिला. बांगलादेशतर्फे तंझीम हसन शकीबनं सर्वाधिक तीन गडी बाद केले.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास आजपासून दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारं निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेनं दिलं होतं, त्यानुसार ही वाढ करण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यसंचालनालयानं म्हटलं आहे.
****
0 notes
झिम्मा'ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी...
झिम्मा’ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी…
लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला ‘झिम्मा’ हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा’ ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने ९१ टक्के प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान ‘झिम्मा’ने पटकावला आहे. आजही अनेक सिनेमे प्रदर्शित होत असताना ‘झिम्मा’ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सोशल मिडीयावरही…
View On WordPress
0 notes
राणेंच्या मतदारसंघात युवासेनेची घोडदौड!
राणेंच्या मतदारसंघात युवासेनेची घोडदौड!
जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची नियोजनबद्ध कामगिरी
युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या कडून कौतुक
कणकवली : युवा सेनेच्या सभासद नोंदणी अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली मतदार संघात सर्वाधिक सभासद नोंदणी करण्यात आली आहे. युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून कणकवली मतदार संघात प्रत्यक्ष फिल्डवर उतरून संघटना वाढीसाठी काम करण्यात…
View On WordPress
0 notes
खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा २०२२ : कबड्डीत मुलींची दमदार आगेकूच
खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा २०२२ : कबड्डीत मुलींची दमदार आगेकूच
मुंबई, दि.4: पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या संघावर 62 विरूद्ध 18 असा 44 गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले.…
View On WordPress
0 notes