उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनः कोरोनाच्या काळात 22 लाख पाणी दिले, 35 लाख केळीचे बिल; क्रिकेटपटूच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी पोलिसांनी पकड मजबूत केली - उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनः कोरोनाच्या काळात 22 लाख पाणी, 35 लाख केळीचे बिल दिले; क्रिकेटपटूच्या जीवाला धोका असल्याच्या प्रकरणी पोलिसांनी पकड घट्ट केली
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनः कोरोनाच्या काळात 22 लाख पाणी दिले, 35 लाख केळीचे बिल; क्रिकेटपटूच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी पोलिसांनी पकड मजबूत केली – उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनः कोरोनाच्या काळात 22 लाख पाणी, 35 लाख केळीचे बिल दिले; क्रिकेटपटूच्या जीवाला धोका असल्याच्या प्रकरणी पोलिसांनी पकड घट्ट केली
प्रत्युष राज (इंडियन एक्सप्रेस)
केळीसाठी 35 लाख रुपयांसह अन्न आणि केटरिंगसाठी 1.74 कोटींहून अधिक; दैनंदिन भत्त्यांसाठी ४९.५ लाख रुपये; कोविड लॉकडाऊन दरम्यान 11 कोटी खर्च; खेळाडूंची देय रक्कम न भरणे; धूर्त निवड धोरणे, खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या. क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंड (CAU/उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन) वर खेळाडूंना धमकावण्यासाठी आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक्सपोसॅट, अर्थात एक्स-रे पोलारिमीटर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुढील पाच वर्षांसाठी अंमलबजावणी आजपासून सुरु
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत नवीन वर्षात १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेचं ठिकठिकाणी यशस्वी मार्गक्रमण
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज एक्सपोसॅट, अर्थात 'एक्स-रे पोलारिमीटर' या उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58 या ध्रुवीय उपग्रह प��रक्षेपकाच्या सहाय्यानं, हा उपग्रह अवकाशात झेपावला. या उपग्रहाबरोबर इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं. खगोलीय स्त्रोतांपासून वैश्विक क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्याचा, भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे. एक्सपोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे, आकाशगंगेतली कृष्ण विवरं आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे. एक्सपोसॅट अभ्यास उपग्रहाचा कालावधी पाच वर्षांचा असून, तो कक्षेत यशस्वीपणे स्थिरावल्याचं इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं.
एक्सपोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. २०२४ ची ही चांगली सुरुवात असून, अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढवणारी ही बातमी असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुढील पाच वर्षांसाठी अंमलबजावणी आजपासून सुरु झाली. या योजनेंतर्गत ८१ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना अन्न धान्याचं मोफत वाटप केलं जाईल. नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली होती. केंद्र सरकारची ही योजना म्हणजे लाभार्थ्यांसाठी अन्नधान्य आणि पोषण सुरक्षा पुरवणारा ऐतिहासिक निर्णय आहे. अन्नसुरक्षा पुरवणारी ही जगातील सर्वात व्यापक मोहीम आहे, या मोहिमेवर ११ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना ५ किलो धान्य मोफत देण्यात येतं. कोरोना काळात जनतेला या योजनेचा मोठा लाभ मिळाला होता.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत नवीन वर्षात राज्यातल्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार आहेत. १५ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून कौशल्य संपन्न महाराष्ट्राच्या दिशेनं सरकारने या माध्यमातून आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
****
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित - एम एस ई बी च्या "विद्युत सहाय्यक" या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हता मध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती लोढा यांनी दिली. यामुळे राज्यातल्या विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळेल, असं ते म्हणाले.
****
भीमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या पेरणे फाटा इथल्या विजयस्तभांला अभिवादन करण्यासाठी आज अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी या विजयस्तंभाला अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील याठिकाणी अभिवादन केलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, संजय बनसोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर दाखल होत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
****
भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून याठिकाणी भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं, त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशातल्या नागरीकांनी नमो ॲप वर जनमन सर्वेक्षणात सहभागी होऊन गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रगतीसंबंधी आपले विचार मांडावे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हॅश टॅग जन मन सर्वे चा वापर करुन नागरीक आपली मतं थेट आपल्याला पाठवू शकतील, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या मथुरा नगर, गुलमोहर कॉलनी परिसरात पोहचली. स्थानिक नागरिकांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडशी गावात आज विकसित भारत संकल्प यात्रेनं जनजागृती केली. या वेळी बचत गटांतील महिलांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देण्यात आली. तसंच, फवारणीसाठी ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आलं.
दरम्यान, मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणी जिल्ह्यातले गोकर्णा कदम आणि मीरा इंगळे यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - गोकर्णा कदम आणि मीरा इंगळे, जि.परभणी
****
लातूर जिल्ह्यातल्या ११ लाख २७ हजार पात्रताधारक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळणार असून, आतापर्यंत केवळ २८ टक्के नागरीकांनीच हे कार्ड काढून घेतलं असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली. लातूर इथं आज आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ��िल्हा प्रशासनाने मिशन मोडवर जनतेची आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत, येत्या काही महिन्यात आयुष्मान भारत मिशन मध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आयुष्मान कार्डचे महत्व ए.टी.एम. कार्डसारखे वाढेल, असं शेटे यावेळी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दुसऱ्या फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाचा प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. यावेळी शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन बहुउद्देशिय विद्यालय परिसरात हे संमेलन घेण्यात आलं.
****
उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेस उशिरा धावत असल्यामुळे नांदेड इथून सुटणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या वेळेत बदल झाला आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या सकाळी साडे चार वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं नववर्षानिमित्त श्री संत सत्गुरू श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज मोठी गर्दी केली आहे. काल रात्रभरही गज���नन महाराजांचं मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं होतं.
****
धुळे जिल्हा स्वस्त धान्य संघटनेतर्फे आजपासून संप पुकारण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी सकाळी तहसिल कार्यालयासमोर निदर्शनं केली तसंच संघटनेच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाला लेखी निवेदन दिलं.
****
धुळे जिल्ह्यात पोलीस विभागानं दोन गावठी पिस्तुलं, पाच जिवंत काडतुसं असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय १० लाख २४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसंच जिल्ह्यात विविध ११७ प्रकरणांतील गुन्ह्यांमध्ये ४९ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
****
0 notes
सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी…’या’ गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक
सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी…’या’ गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक
सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी…’या’ गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक
कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सुधारण्याच्या दिशेने वाटचाल…
View On WordPress
0 notes
कोरोनाची चौथी लाट ? मास्कबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की..
कोरोनाची चौथी लाट ? मास्कबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की..
राज्यातील वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या संदर्भात मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चौथ्याला लाटेला संसर्गाचा वेग जास्त असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही कारण रुग्ण बरा होण्याचा कालावधी हा कमी आहे, असे म्हटले आहे.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, ‘ मुंबई पुणे ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग…
View On WordPress
0 notes
उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी ‘अभय' योजना
उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी ‘अभय’ योजना
*कर कायद्यातंर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये १० हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ होणार, छोट्या व्यापाऱ्यांना १ लाख प्रकरणात फायदा – अजित पवार*
*वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतचा कालावधी*
मुंबई : प्रतिनिधी
कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या…
View On WordPress
0 notes
ऍशलेघ बार्टीची निवृत्ती: श्वास किंवा तणाव जाणवणे
ऍशलेघ बार्टीची निवृत्ती: श्वास किंवा तणाव जाणवणे
मनीषकुमार जोशी
सुनील गावसकर जेव्हा निवृत्त झाले होते, तेव्हा असे म्हटले जात होते की खेळाडू जेव्हा त्याच्या शीर्षस्थानी असतो तेव्हा त्याने खेळाचा निरोप घ्यावा. त्यांच्या निवृत्तीनंतर लोक त्यांना परत येण्याची विनंती करतील. जेव्हा एखाद्या खेळाडूने गेममधून माघार घ्यावी तेव्हा ही परिस्थिती असते. क्रिकेट हे व्यावसायिक नसताना गावस्कर यांनी हे विधान केले होते. आज क्रिकेटपटू वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन
सोळाव्या वित्त आयोगाची केंद्र सरकारकडून स्थापना
विकसित भारत संकल्प यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणार - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
आणि
वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
****
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे वर्ष प्रसन्नता, शांती आणि समृद्धी आणणारं असो, तसंच नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस यांनीही नागरीकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाणे इथं रक्तदान शिबिरात सहभागी होत नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी नागरीकांना शुभेच्छा देताना ते म्हणाले,
‘‘२०२४ हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो, अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्वसामान्य माणसावरचं संकट, अरिष्ट दूर होवो, आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या, हे राज्य सुजलाम, सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या, अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा.’’
नववर्षाच्या स्वागतासाठी काल राज्यातल्या पर्यटन स्थळांवर तसंच मोठ्या मॉल्समध्ये नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सरत्या वर्षातला सूर्यास्त पाहण्यासाठी राज्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर देखील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या वणीच्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि शिर्डी इथलं साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी काल रात्रभरही खुलं ठेवण्यात आलं होतं.
****
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा हा १०८वा भाग होता. सरत्या वर्षात देशानं लक्षणीय कामगिरी केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नारी शक्ती वंदन कायदा, जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन, भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणं, चांद्रयान ३ मोहीमेचं यश, क्रिडा क्षेत्रातली कामगिरी आदी घटनांचा त्यांनी उल्लेख केला. शारिरीक आणि मानसिक आरोग्याचं महत्वही पंतप्रधानांनी मन की बात मधून विषद केलं.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं मन की बात हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या फडात जाऊन उसतोड कामगारांबरोबर ऐकला.
****
प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई शहरात राबवलं जाणारं हे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना केलं आहे.
****
साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात डाटा गोळा करायला वेळ लागेल, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. २०१४ ते २०१९ काळात आपण हा प्रश्न जवळून हाताळला होता, त्यावेळी मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला एक वर्ष लागलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, त्यामुळे जे एन वन या नव्या स्वरुपामुळे घाबरून जाऊ नये, मात्र सतर्कता बाळगायला हवी, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या एम्स रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या.
****
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. करीर यांनी काल मनोज सौनिक यांच्या कडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे देखील काल सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
****
केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. वित्त आयोग केंद्र आणि राज्यांदरम्यान कर महसुलाचं वाटप, तसंच पंचायत संस्थांची उत्पन्नाची साधनं याविषयी शिफारशी करेल.
****
विकसित भारत संकल्प यात्रा ही पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणारी यात्रा असल्याचं, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा या गावात काल विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत संकल्प यात्रेमुळे सर्व स्तरातल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याचं ते म्हणाले,
‘‘योजनाएं जब सौ प्रतिशत जमीनपर पहुंचेगी, तो इसके बाद हमको विकसित भारत का संकल्प भी साथ के साथ करना चाहिये. आज मै जितने भी लाभार्थियोंसे मिला हुं, प्रधानमंत्री आवास योजना का पैसा, किसान सम्मान निधी का पैसा, वो आपके अकाऊंट मे, जो हमारे दिव्यांग भाई है, उनका पैसा उनके अकाऊंट में, ये जो जन धन अकाउंट है, ये देश के इकानॉमीका सबसे बडे माध्यम बना है. इन सब को देश की आर्थिक ताकत के साथ जोडनें का काम, ये प्रधानमंत्रीजीने किया है.’’
यावेळी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या १७० लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचं वाटप करण्यात आलं. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे यावेळी उपस्थित होते.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिकांनी आपल्या लाभाची माहिती दिली...
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महापालिका हद्दीत २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३ ठिकाणच्या पाच हजार ७४४ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शाईन एंटरप्राईजेस या कंपनीत झालेल्या या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमी कामगारांना तातडीनं शासकीय खर्चानं सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी काल सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी भेट देत, दुर्घटनेची माहिती घेतली.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची काल हिंगोली शहरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं दुसऱ्या फुले-शाहू- आंबेडकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन आणि प्रकट मुलाखती आदी कार्यक्रम होत आहेत. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
0 notes
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अभय योजना जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अभय योजना जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात ��ेण्यापूर्वीच्या विविध करांसंद��्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी
कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ होणार, छोट्या व्यापाऱ्यांना 1 लाख प्रकरणात फायदा
मुंबई, दि.21 :- कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार…
View On WordPress
0 notes
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड-२०२२’ अभय योजना जाहीर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड-२०२२’ अभय योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा
वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी
कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ होणार, छोट्या व्यापाऱ्यांना 1 लाख प्रकरणात फायदा
मुंबई, दि. 21 :- कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार…
View On WordPress
0 notes
म्हापण मध्ये गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
म्हापण मध्ये गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
म्हापण : कोरोना कालावधी सुरू झाल्यापासून कलागुणांना वाव मिळणे कठीण झाले होते. कोरोना व त्याचे वेगवेगळे प्रकार व त्याचे प्रभाव यामुळे लोकांच्या मनात नैराश्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नैराश्य दूर करून चैतन्यमय वातावरण निर्माण करण्यासाठी म्हापण गावाच्या सरपंचांनी सद्यकालीन दुर्मिळ असलेल्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोरोना काळात विद्यार्थी व कलाकारांच्या आयुष्यात नैराश्याचे प्रमाण…
View On WordPress
0 notes
आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे : उपमुख्यमंत्री अजित पवार
आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे : उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पध्दती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर…
View On WordPress
0 notes
शासनाकडून होणारा अपुरा लसीचा पुरवठा, त्यातून लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ आणि वादावादी टाळण्यासाठी पुन्हा एकदा दुसर्या डोसचा कालावधी एकदम दुप्पट दिवसांनी वाढविला. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसर्या डोससाठी नागरिकांना 84 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाच्या वतीने गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसर्या डोसमधीत अंतर 28 दिवसांचे […]
0 notes
दीपक मोहिते,
परिस्थिती सुधारण्यास बराच अवधी लागणार,
सर्वसामान्य माणसाचे नेहमीच तुणतुणे सुरू असते की आता जगणं,फार कठीण झालं आहे.खर्चाची तोंडमिळवणी करताना सर्वसामान्य माणसाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.समाजातील एकही घटक,असं म्हणू
शकत नाही की आम्ही आजच्या घडीला खाऊन पिऊन सुखी आहोत.
कोरोनामुळे सर्वानाच आर्थिक झळ सोसावी लागत आहे.आजही आपण सर्वजण आर्थिक आ���ाडीवर झुंज घेत आहोत.एकप्रकारे आपल्या आयुष्याचा खेळ झाला आहे.अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आपल्या मुलाबाळांचे भवितव्य काय ? शिक्षणाचा पार खेळखंडोबा झाला आहे,आहे त्या नोकऱ्या आपल्या मुलांनी गमावल्या,महीनाकाठी मिळणाऱ्या वेतनात कपात,विजेची येणारी भरमसाठ बिले,ती अदा न केल्यास वीजजोडण्या खंडीत करणे,शाळा बंद असल्यातरी फीची होणारी सक्ती व प्रचंड महागाई इ.कारणांमुळे तुमचे-आमचे कंबरडे साफ मोडून पडले आहे.
आज कोरोना कमी झाला असला तरी संकट अद्याप टळलेले नाही.नवनवीन विषाणूचे आवागमन सुरूच आहे.आपल्यासाठी जीवघेणा ठरलेला कोरोना,वैद्यकीय व्यवसायाला मात्र पोषक ठरला आहे.गेल्या सव्वा वर्षात,या व्यवसायाने गोरगरीब जनतेची उपचाराच्या नावाखाली प्रचंड लूट केली.ज्या कोरोनाने जगभरातील अब्जावधी नागरिकांचे खिसे रिकामे केले,तो कोरोना मात्र वैद्यकीय व्यवसायाचे खिसे भरणारा व आर्थिक वैभव मिळवून देणारा ठरला आहे.या काळात भारतीय संविधानातील विविध तरतुदींना छेद देत,अनेक रुग्णालयानी त्यांच्या तीन पिढ्या बसून खातील,इतका रग्गड पैसा कमावला.पण त्यांच्यावर कारवाई करण्यात राज्य सरकारे अपयशी ठरली.संविधानातील मोफत शिक्षण व वैद्यकीय सेवा,या दोन महत्वाच्या तरतुदींना वैद्यकीय व्यवसायिकांनी हरताळ फासला.
एकीकडे आर्थिक आघाडीवर असलेली मंदी व रोजगार निर्मितीच्या महत्वाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक झालेले दुर्लक्ष,त्यामुळे जनतेला पुन्हा स्थिरस्थावर होण्यास किमान दहा वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.आणि जर राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार सप्टें.किंवा ऑक्टो.महिन्यात तिसरी लाट आदळली तर मात्र सारं काही संपल्यातच जमा होणार.
0 notes