FIFA WC Viral Video: फुटबॉलची हवा! ४० हजार फूट उंचीवर हवेत अनुभवला सामन्याचा थरार
FIFA WC Viral Video: फुटबॉलची हवा! ४० हजार फूट उंचीवर हवेत अनुभवला सामन्याचा थरार
FIFA WC Viral Video: फुटबॉलची हवा! ४० हजार फूट उंचीवर हवेत अनुभवला सामन्याचा थरार
FIFA World Cup 2022: विमानातील एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या विमानातील एक प्रवासी सोडून सर्वजण फुटबॉल सामना पाहत आहेत. इंस्टाग्रामवर डॅनियलॅक्निएटो (Danielacnieto) नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ सर्वप्रथम पोस्ट केला गेला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इतर पेजेसद्वारे शेअर करण्यात आला आहे.
FIFA World Cup 2022:…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित करणार असून, त्यानंतर आचारसंहिता लागू होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून विकसित भारताच्या निर्मितीकरता सूचना देण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या दहा वर्षांत देशाने मोठी झेप घेतली असून प्रचंड आर्थिक प्रगती पाहिली आहे. परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा मिलाफ करून देश पुढे जात असून, भारताच्या समृद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशावर भर दिला जात असल्याचं, पंतप्रधानांनी यात नमूद केलं.
अनेक योजना आणि उपक्रमांमुळे देशाचा चेहरामोहरा बदलला आहे, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, मातृ वंदना योजना, जीएसटीची अंमलबजावणी, कलम ३७० हटवणं, नारी शक्ती वंदन कायदा आणि नवीन संसद भवनाचं उद्घाटन यांचा समावेश आहे. जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवल्यामुळेच हा बदल शक्य झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशाला नव्या उंचीवर नेऊन विकसित भारत बनवण्याचा संकल्प साकारण्यासाठी देशवासियांनी साथ द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
दरम्यान, पीएम-सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक कुटुंबांची नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये पाच लाखांहून अधिक नोंदणी झाल्याचं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. या योजनेत जास्तीत जास्त नागरीकांनी नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
प्रसार भारतीचे संचालक म्हणून नवनीत कुमार सेहगल यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज त्यांनी पदभार स्वीकारला. सेहगल हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं अंगणवाडी सेविकांना मोबाइल वाटप काल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. वीज नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जेची सोय केली जाणार असून, त्यासाठी पहिल्या वर्षी ३६ हजार अंगणवाड्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
सरहद शौर्याथॉन-२०२४ या स्पर्धेच्या बोधचिन्हाचं आणि संकेतस्थळाचं अनावरण काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. सरहद पुणे, भारतीय लष्कर आणि अर्हम संस्था यांच्यातर्फे येत्या ३० जून रोजी ही स्पर्धा होणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या झोजिला युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारकादरम्यान होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत, भारतासह विविध देशातले धावपटू सहभागी होतील. झोजिला युद्धातल्या विजयाचा अमृत महोत्सव आणि कारगिल युद्धातल्या विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पंचवीसावा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या मंगळवारी १९ मार्चला होणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. विविध विद्याशाखेतील एकूण ११ ��जार दोन स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येईल.
****
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचं आरक्षित तिकीट हिंगोली इथं पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतला आहे. सामान्य वेळेत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेनंतर हिंगोली रेल्वेस्थानकावरच्या फलाट क्रमांक दोन वरील तिकीट खिडकीतून मध्यरात्री १२ वाजेपासून ते पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत या गाडीचं आरक्षित तिकीट प्रवाशांना घेत येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. आंबेडकर सेनेचा ११ वा वर्धापन दिन येत्या २० मार्चला महाड इथल्या चवदार तळे याठिकाणी होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबावडेगाव या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी सेनेची रॅली जाणार आहे. डॉ. आंबेडकर सेनेचे सेना प्रमुख भाई दिनकर ठोकळ आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदास लहाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात लक्ष्यनं मलेशियाच्या खेळाडुचा २० -२२, २१ - १६, २१ - १९ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना आज बर्मिंगहम इथं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी सोबत होणार आहे.
****
0 notes
डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन संगीताची अखंड तपस्या - राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १३ : विख्यात शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
डॉ. प्रभा अत्रे या संशोधक वृत्तीच्या प्रयोगशील गायिका व संगीत रचनाकार होत्या. आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्दीत त्यांनी नवतेचा अंगीकार केला व भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेले. आपला सांगीतिक वारसा पुढे नेताना त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते…
View On WordPress
0 notes
डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन संगीताची अखंड तपस्या - राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १३ : विख्यात शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
डॉ. प्रभा अत्रे या संशोधक वृत्तीच्या प्रयोगशील गायिका व संगीत रचनाकार होत्या. आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्दीत त्यांनी नवतेचा अंगीकार केला व भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेले. आपला सांगीतिक वारसा पुढे नेताना त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते…
View On WordPress
0 notes
'जवान'चे एनर्जीटीक 'जिंदा बंदा' रिलीज
‘जवान’ चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ हे पहिले गाणे आज र���लीज झाल्याने ‘जवान’ भोवतीचा उत्साह नव्या उंचीवर पोहोचला आहे. त्याच्या अॅक्शन पॅक्ड सीक्वेन्स आणि किक-अॅस थ्रिलची झलक दिल्यानंतर, चित्रपट आता अनिरुद्धच्या पाय-टॅपिंग डान्स नंबरचे अनावरण करतो जे त्याच्या उत्साही उर्जेने प्रत्येकाला आग लावेल.
अनिरुद्धच्या संगीतमय पराक्रमाने जिवंत होणारा एक सेलिब्रेटी ट्रॅक, जो आवाज वाढवण्याचे आणि प्रत्येकाला आनंद…
View On WordPress
0 notes
36 तासात पावसाने माजवला हाहाकार…
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 36 तासापासून पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक मध्यम धरणाचे प्रकल्प भरत चालले आहेत. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाण्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.शहरातील, गावातील नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे अनेक जागी नाले तुंबल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत असल्याने निसर्गाचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासन सुध्दा नागरीकांच्या अडचणींसाठी सज्ज आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सहस्त्रकुंड धबधबा..
https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA00411.mp4
जुन महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दाखवलेली कमतरता काही दिवसांतच पुर्ण करून टाकली. कालपर्यंत पाणी कधी येणार, पाऊस कधी पडणार, पिकांचे काय होणार, कधी पेरणी करावी, दुबार पेरणी करावी लागेल अशा अनेक चिंतांनी ग्रस्त असलेले नागरीक आता 36 तासातच आता जास्त पाऊस झाला असे म्हणायला लागले आहेत. नदी नाल्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. गावांमध्ये आणि शहरामध्ये कमी उंचीवर घरे असणाऱ्या लोकांना पाणी तुंबल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पण प्रशासन सुध्दा अडीअडचणींसाठी तत्पर आहे.अनेक अडचणीतल्या लोकांना प्रशासनाने मदत करून सुरक्षीत ठिकाणी पोहचलवले आहे. प्रशासनासह नागरीकांनी सुध्दा या कामात मदत केली आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील पाळा, कोळनूर, होनवडज या गावांमध्ये काही घरात पाणी शिरले होते. तेथे जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. बिलोली तालुक्यातील हरनाळी, माचनूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासराळी, बेळकोणी, कुंडलवाडी, गंजगाव येथे 1 हजार लोकांना सुरक्षीतस्थळी नेण्यात आले आहे. कोळी व भोई समाजाची मंडळी या कामात महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे. गंजगाव येथील पुरात अडकलेले करण ऋशी, विशाल ऋशी, अर्जुन जाधव यांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. तेथे नागरीक लक्ष्मण वनरवाड, पोट्टी वनरवाड, बस्वराज पाटील, संभाजी तोटलवार, साहेबराव घाटे, शेख अनवर यांनी मदत केल्याबद्दल प्रशासनाने त्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. मौजे येसगी येथील मांजरा नदीला पुर आला नसून तेलंगणाकडे जाणारा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हैद्राबादकडे जाणारी आणि नांदेडकडे येणारी वाहतुक ठप्प पडली आहे. मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीने फुटला आहे. पाण्याचा विसर्ग हा संथगतीने आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. प्रशासन खबरदारी घेत आहे.
बळेगाव बंधाऱ्यात 37.45 टक्के प्रकल्प भरला आहे. या बंधाऱ्यातून एक दरवाजा उघडलेला आहे. त्यातून 152.66 क्युमे���्स पाण्याचा विसर्ग होत आहे. आमदुरा प्रकल्पातून एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याची पातळी 353.35 मिटर म्हणजे या प्रकल्पात पाण्याचा साठा 56.55 टक्के झाला आहे. 348 क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग येथून सुरू आहे. 16 नंबरचा दरवाजा उघडण्यात आला आहे. ईस्लापूर धरणातून सुध्दा पाण्याचा साठा 57.4353 एवढा झाला आहे. या प्रकल्पात 65.19 टक्के साठा आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. बळेगाव बंधाऱ्यात 4 मिटर उंच पाणी जमले आहे. बाभळी धरणाचे 14 दरवाजे उघडे आहेत. दिग्रस बंधाऱ्यात पाण्याचा साठा 19.65 घनमिटर आहे. 30.91 टक्के प्रकल्प भरला आहे. बळेगाव बंधाऱ्याचे दुपारी 12 वाजता दोन गेट उघडण्यात आले आहेत. विष्णुपूरी येथील दुसरा दरवाजा उघण्यात आला आहे. त्यातून 321 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA0057.mp4
नांदेड शहरात सुध्दा दैनंदिन जीवन विसकटले आहे.शहरात नाल्या तुंबल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळ करणाऱ्या धनोडा जवळील पैनगंगा सुध्दा दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे पाणी पुन्हा येण्याची शक्यता आहे. काही शेतकरी सांगतात आता पुन्हा एकदा दुबार पेरणी करावीच लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबामात्र मोठ्या जोरदारपणे वाहत असल्याने त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पण अति पाऊस झाला आहे हे सुध्दा तेवढचे खरे आहे.
https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA0056.mp4
Read the full article
0 notes
StartupSetu
तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर घेऊन जा: आम्ही तुमच्या वाढीला चालना देणारे ग्राफिक्स प्रदान करतो.
त्वरित संपर्क करा
☎️+919373615614
1 note
·
View note
पाण्याच्या टाकीवर 70 फुट उंचीवर जाऊन त्याने घेतली फाशी कारण शोधण्यात पोलीस व्यस्त
नमस्कार वाचकानो मराठी GTPL या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. अकोल्यातील पातूर जवळ असलेल्या देऊळगाव एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीवर चढून एका इसमाने आत्महत्या केली नेमक कारण का? जाणून घ्या आमचे पातूर प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे यांनी दिलेली विस्तृत माहिती
पातूर नजीक असलेल्या देऊळगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या देऊळगाव शिवारातील पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली…
View On WordPress
0 notes
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
जे कोणी केवळ स्वतःच्या उद्धारासाठी सतत खटपट करतात, ते स्वतःचाही उद्धार कधीच साधू शकत नाही आणि इतरांचा तर मुळीच नाही. तुम्ही निःस्वार्थ अंतकरणाने कार्य करीत रहा, कार्य छोटे असो की मोठे एका विशिष्ट उंचीवर ते कार्य गेल्यावर, त्या कार्याची दखल जग घेतल्याशिवाय राहत नाही.
*स्वामी विवेकानंद…..**
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●*
*★ भारतीय सौर ७ अग्रहायण शक १९४४*★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ६★ शालिवाहन…
View On WordPress
0 notes
व्हायरल न्यूज : कॉकपिटमध्ये पायलटांची मारामारी सुरू; विमान कसे उतरले ते पहा
व्हायरल न्यूज : कॉकपिटमध्ये पायलटांची मारामारी सुरू; विमान कसे उतरले ते पहा
विमानप्रवास हा प्रवास करण्यासाठी खूप वेगवान मार्ग आहे. स्वतंत्र अवघ्या काही तासांमध्ये आपण एका ठिकाणी जाऊ शकतो. आता अनेकजण विमान प्रवासाला प्राधान्य देणार. उत्पादकांची बचत तर होतेच, पण सोयीस्कर प्रवासही करता. मात्र, छोटीशी चूक चुकली कारण बानू. कमालच विमान प्रवासादरम्यान वैमानिक त्यांचे काम अत्यंत सावधगिरीने पार पाडतात.
पण हजारो उंचीवर उड्डाण भरलेले विमान वैमानिकांनी आपसात भांडण सुरू केले तर? अशीच…
View On WordPress
0 notes
बापरे! विमान तब्बल ३७ हजार फूट उंचीवर असताना दोन्ही वैमानिक झोपले आणि…
बापरे! विमान तब्बल ३७ हजार फूट उंचीवर असताना दोन्ही वैमानिक झोपले आणि…
बापरे! विमान तब्बल ३७ हजार फूट उंचीवर असताना दोन्ही वैमानिक झोपले आणि…
सूडानमधून खारतूम ते आदिस अबाबाकडे जात असलेल्या इथियोपियन एअरलायन्सच्या दोन्ही पायलटांनी अशी काही झोप लागली की, ते विमान लँड करणेच विसरून गेले. ही घटना सोमवारी घडली.
सूडानमधून खारतूम ते आदिस अबाबाकडे जात असलेल्या इथियोपियन एअरलायन्सच्या दोन्ही पायलटांनी अशी काही झोप लागली की, ते विमान लँड करणेच विसरून गेले. ही घटना सोमवारी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
येत्या पाच वर्षात देशाला नव्या उंचीवर नेण्याचा तसंच मध्यम आणि गरीब वर्गाला अधिक सशक्त करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प
शरद पवार यांच्या गटाला, ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी
राज्यात किलकारी या मोबाइल हेल्थ सेवा उपक्रमाचं आणि मोबाइल अकादमीचं उद्घाटन
आणि
लातूर इथं आजपासून तीन दिवसीय कृषी महोत्सव
****
येत्या पाच वर्षात देशाला नव्या उंचीवर नेण्याचा तसंच मध्यम आणि गरीब वर्गाला अधिक सशक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते. आगामी पाच वर्षांत प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन देश आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची युवाशक्ती जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सरकारच्या धाडसी आणि धोरणात्मक निर्णयांमुळे भारत आज देशातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. काँग्रेससह विरोधी पक्षांवर विविध मुद्यांवरून त्यांनी कडाडून टीका केली.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाला, ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शरद पवार यांना हे नाव वापरता येईल. आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांना दिलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी शरद पवार गटानं केली असून, याच प्रकरणी अजित पवार यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.
****
राज्यसभेच्या राज्यातल्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. सहा सदस्यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपत आहे. या जागा भरण्यासाठी येत्या १५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
****
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचं विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. या आवाहनाला प्रतिसाद देऊन निवासी डॉक्टरांच्या मार्ड या मध्यवर्ती संघटनेनं आपला प्रस्तावित संप मागे घेतला. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने हाती घ्यावी, विविध जिल्ह्यांत मंजूर वसतिगृहांच्या बांधकामांना गती द्यावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.
****
पुणे जिल्ह्यात सासवड इथं प्रात्यक्षिकासाठी आणलेलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र-ईव्हीएम चोरीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, चोरीस गेलेले ईव्हीएम परत मिळवले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी या नव्या योजनेचा आणि आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा, राज्यात कालपासून शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल यांच्या उपस्थितीत काल दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून या योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्रात सुमारे २८ लाख नोंदणी केलेल्या गर्भवतींना याचा लाभ होईल. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेनं आपल्या गावातल्या आशा सेविकेकडे नाव नोंदवणं आवश्यक आहे. 'प्रसूतीआधी आणि प्रसूतीनंतर, किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत', हे या योजनेचं ब्रीदवाक्य आहे. या मोबाईल अकादमीच्या माध्यमातून राज्यातल्या ८५ हजार आशा सेविकांना कामकाजासंबंधी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले, तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. धाराशिव तालुक्यात ढोकी इथं शिवसंकल्प अभियानात कार्यकर्ता मेळाव्याला काल ते संबोधित करत होते. मराठा समाजातल्या पाच हजार युवकांना तातडीने नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, तसंच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठा आरक्षणाचा कायदा या अधिवेशनात पारित करण्यासाठी नागरिकांनी आपल्या मतदार संघातल्या आमदारांना निवेदन द्यावं, असं आवाहन, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते काल नवी मुंबईत नेरुळ इथं एका कार्याक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी १० तारखेपासून पुन्हा उपोषणाचा इशारा जरांगे यांनी कालही दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ८५६ नियोजित गावांपैकी, ७७८ गावांमध्ये पोहचली आहे. केंद्रीय महिला बालकल्याण विभागाचे सचिव राय महिपत रे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत ही माह���ती दिली. उर्वरित ७८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या आठवड्यात यात्रा नेण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा काल नांदेड शहरात देगलूर नाका इथल्या उर्दू घर तसंच चौफाळा भागात राखेवार मैदान इथं पोहोचली. नागरिकांनी मोठ्या उत्साहात यात्रेचं स्वागत केलं. या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत मयुरी पूर्णेकर आणि भागाराम मचेवार यांनी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती दिली.
****
लातूर इथं आजपासून तीन दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, पशुपालन, कृषी यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती अशा विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानही या महोत्सवात केला जाणार आहे.
****
परभणी इथं आजपासून ११ फेब्रुवारी पर्यंत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त काल शहरातून राजगोपालचारी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विष्णू जिनींग मिल या मार्गानं शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर मसोड पाटी या ठिकाणी काल पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या ईसापूर धरणातून जलवाहिनेद्वारे नांदेड जिल्ह्याला जाणारं पाणी रोखण्यात यावं, शेनोडी - रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी, कयाधू नदीवर छोटे बंधारे स्वयंचलित दरवाजे बसवून तयार करावेत, नियोजित खरबी प्रकल्प रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २१ फेब्रुवारीला शेनोडी इथं जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
****
छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या मच्छीमारांनी काल पैठण इथल्या जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलन केलं. जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत हे आंदोलन करण्यात आलं.
****
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून १५ हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल ताब्यात घेतलं. मुकेश गुंजाळ असं त्याचं नाव असून, गेवराई तालुक्यात संगम जळगाव इथं हायवा चालकास अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा वित्त आणि लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सहा लाख रुपये लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. प्रलंबित देयक मंजुरी आणि अतिरिक्त सुरक्षित रक्कम मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या कोष्ठवाडी इथं जवळपास दोन हजार नागरीकांना प्रसादातून विषबाधा झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नांदेड इथं शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. परवा सहा तारखेला कोष्ठवाडी इथं संत बाळूमामा यांच्या सप्ताहानिमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेत ही विषबाधा झाली होती. या घटनेची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत.
****
0 notes
व्हायरल व्हिडिओ: माणसाने केला एवढा खतरनाक स्टंट, पाहून जनता घाबरली; व्हिडिओ पहा
व्हायरल व्हिडिओ: माणसाने केला एवढा खतरनाक स्टंट, पाहून जनता घाबरली; व्हिडिओ पहा
व्हायरल क्लिपमध्ये धोकादायक स्टंटचा प्रकार पाहून एक मुलगा इमारतीच्या उंचीवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे, नक्कीच तुमच्या हृदयाचे ठोकेही वाढू शकतात.
हा स्टंट व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या संवेदना उडाल्या
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram
सामाजिक माध्यमे प्रत्येकाला या काळात प्रसिद्ध व्हायचे असते. मात्र काही लोक या प्रकरणात आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. विशेषतः आपण स्टंट तुम्ही…
View On WordPress
0 notes
विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर…
View On WordPress
0 notes
विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर…
View On WordPress
0 notes
व्यवसाय कुठलाही असो डिजिटल जाहिरात गरजेची आहे.
आमच्या डिजिटल मार्केटिंग सेवांसह तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर नेऊ
आता कॉल करा! आजच सामील व्हा!
WWW.EESWEB.IN
0 notes