बेस्टच ! OnePlus Nord Watch ची किंमत पहिल्यांदाच झाली इतकी कमी, मिळतोय जबरदस्त डिस्काउंट
बेस्टच ! OnePlus Nord Watch ची किंमत पहिल्यांदाच झाली इतकी कमी, मिळतोय जबरदस्त डिस्काउंट
बेस्टच ! OnePlus Nord Watch ची किंमत पहिल्यांदाच झाली इतकी कमी, मिळतोय जबरदस्त डिस्काउंट
तुम्हाला स्वस्त स्मार्टवॉच खरेदी करायचे असल्यास, तुम्हाला Amazon वर उपलब्ध डील ऑफ द डे पेक्षा चांगली दुसरी संधी मिळणार नाही. या डीलसह, वनप्लस नॉर्ड वॉच ४००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
तुम्हाला स्वस्त स्मार्टवॉच खरेदी करायचे असल्यास, तुम्हाला Amazon वर उपलब्ध डील ऑफ द डे पेक्षा चांगली…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 16 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १६ जून २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
सर्व शाळांमध्ये सिनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात;शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री
चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात
औरंगाबाद इथं राज्य कामगार विमा आयुक्तालय दोनशे खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभारणार
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
आणि
स्कॅश विश्वचषक स्पर्धेत भारत प्रथमच उपान्त्य फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्ग अर्थात सिनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरू केले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यात आलं असून, दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेलं एकच पुस्तक आणयचं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
****
नवीन शैक्षणिक वर्षाला कालपासून सुरुवात झाली. राज्यभरात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.
औरंगाबाद शहरात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प, मिठाई देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाच्या कार्यवाही संदर्भात शिक्षण विभागानं दिलेल्या निर्देशानुसार सकाळी शाळेच्या परिसरात गीत, घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
शहरालगत नारेगाव इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शाळा काल उत्साहात सुरू झाल्या. सर्व शाळांमध्ये सजावट करुन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
धुळे शहरासह जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्येही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
सोलापूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
नाशिक इथं विद्यार्थ्यांची घोड्यावर मिरवणूक, ढोलताशांचा गजर, शाळेच्या प्रांगणात काढलेल्या रांगोळ्या अशा प्रसन्न वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
****
राज्यात साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातले शेतकरी, ऊस वाहतूकदार तसंच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. तसंच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असंही त्यांनी ��ाहीर केलं. राज्यातल्या ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल शहरात आणि विविध परिसरात सहजपणे पोहचतो. यासाठी, वाहतूक परवाना आणि अनुषंगिक बाबींसाठी पणन विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
पालघर इथं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी मेळावा झाला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Byte…
अतिशय उदंड असा प्रतिसाद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळतोय. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी विद्यार्थी तरूण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. सर्वसामान्यांचा आयुष्यामधे चांगले दिवस आणणे हाच आमचा उद्देश आहे. यापूर्वी देखील सहा - सात ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. हा एक दिवसाचा कार्यक्रम नाहीये. आत्तापर्यंत जवळपास ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपला शासन पोहचलेलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. नंदुरबार इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते. हर सरकार जनतेचा पैसा जाहिरातबाजीवर खर्च करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केलं.
****
राज्यात काही समाज कंटकांकडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्यानं या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सर्व घटनांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी, त्यांनी या पत्रात केली आहे.
****
भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाअंतर्गत डब्ल्यू - 20 कार्यगटाची तिसरी बैठक काल चेन्नईनजीक महाबलिपूरम इथं सुरू झाली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी डब्ल्यू-20 प्रतिबद्धता गटाचं निवेदन जारी केलं. लिंगाधारित डिजिटल तफावत दूर व्हायला हवी, तसंच गरीब आणि आदिवासी समुदायांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करणारा भाषेशी संबंधित भेदभाव दूर व्हायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, जी - 20 कृषी मंत्र्यांची बैठक काल हैदराबाद इथं सुरु झाली. कृषी क्षेत्रातल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवं, आणि यासाठी जी - 20 हे योग्य व्यासपीठ असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते काल या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. पीक विविधतेसाठी धोरण आखणं आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं असं ते म्हणाले.
****
ग्राहकांना परवडणाऱ्या दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारनं खाद्यतेलांवरचं मूलभूत आयात शुल्क कमी केलं आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार रिफाईन्ड सोयाबीन तेल, आणि रिफाईन्ड सूर्यफूल तेलावरचं मूलभूत आयात शुल्क कालपासून साडे सतरा टक्क्यावरून साडेबारा टक्के करण्यात आलं आहे. हा दर ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे किरकोळ विक्रीचे दर कमी व्हायला मदत होईल.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२१ चा अंतिम निकाल काल जाहीर झाला. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम, सोनाली म्हात्रे महिलांमधून, तर विशाल यादव मागासवर्ग उमेदवारांमधून प्रथम आले आहेत.
****
औरंगाबाद इथं राज्य कामगार विमा आयुक्तालय यांच्याकडून कामगार रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, त्यामध्ये वाढीव दोनशे खाटांचं सुसज्ज रुग्णालय सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं आहे. काल औरंगाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. या रुग्णालयासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने तातडीनं जागा उपलब्ध करून द्यावी, आणि राज्य शासनाकडे रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना कराड यांनी यावेळी केल्या.
****
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतनं भारताच्याच लक्ष्य सेनचा २१-१७, २२-२० असा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं हाँगकाँगच्या अँगस एनजी कालाँग याचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला तैवानच्या ताईत्झू-यिंगकडून २१-१८, २१-१६ असा पराभव पत्करावा लागला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या स्कॅश विश्वचषक स्पर्धेत भारत पहिल्यांदाच उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. ब गटातल्या काल झालेल्या सामन्यात भारतानं जपानचा तीन - एक असा पराभव केला. उपान्त्य फेरीत भारताचा सामना मलेशियासोबत होणार आहे.
****
बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनाऱ्याला धडकून पुढे सरकलं, त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. ताशी १४५ किलोमीटर वेगानं धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीच्या भागातून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे वादळ उद्या दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल. त्यामुळे तिथे हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सखल भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
संपूर्ण देशभरात येत्या २३ जून प���सून मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. २३ जूनपासून मध्य भारत तसंच महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनची सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
****
राज्य सरकारनं गायरानधारकांना जमिनी सोडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी लाल बावटा शेत मजूर संघातर्फे काल औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या दोन लाख २२ हजार १५३ गायरान धारकांना गेल्या सहा महिन्यांपासून या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून घर मंजूर झाली आहेत त्यांना बेघर करु नये, सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून जमिनी कसणाऱ्यांना शेती करू द्यावी, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
****
नांदेड रेल्वे विभागात काल आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विभागीय रेल्वे व्यवस्थापन नीति सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रेल्वे फाटकांवर जनजागृती अभियान राबवण्यात आलं. नगरसोल, आदिलाबाद, परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकाजवळच्या फाटकांवर नागरीकांमध्ये पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसंच उद्घोषणा प्रणालीद्वारे मुदखेड - परभणी सेक्शन मधल्या नागरीकांचं समुपदेशन करण्यात आलं.
****
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, मिस कॉल आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाद्वारे करण्यात आलं आहे. मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी शून्य २ २ - ५० ८९ ७१ शून्य शून्य हा क्रमांक असून, महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
****
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये नांदेडमधल्या इंग्रजी माध्यमाच्या काही नामांकित निवासी शाळांत शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पालकांनी येत्या ३० तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असं आवाहन नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
0 notes
60,000 चा iPhone 12 Mini मिळतोय फक्त 24 हजारात ! वाचा कुठे सुरु आहे ही ऑफर
नवी दिल्ली : आजकाल स्मार्टफोन (smartphone) हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लोकं मोबाईलवर सतत काही ना काहीतरी करत असतात. स्मार्टफोन वेगवेगळे ब्रँड्स बाजारात आहेत , पण बहुतांश लोकांना आयफोनची (iPhone) भुरळ पडलेली असते. आयुष्यात एकदा तरी आयफोन वापरावा , अशी बहुतांश लोकांची सुप्त इच्छा असते. पण त्यांच्या महाकाय किमतीमुळे (huge price) सर्वांनाच तो परवडतो असं नाही. तुम्हीसुद्धा…
View On WordPress
0 notes
सध्या महाराष्ट्रात वेड या सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे.कारण,या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीनं मराठीत पहिल्यांदा एकत्र येत प्रेमाची मोहिनी प्रेक्षकांवर फिरवलेय. हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास दोन आठवडे उलटून गेलेत. मात्र, अद्यापही या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. या सिनेमाने गेल्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आहे. याच सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी आज आपण या लेखातून जाणार घेणार आहोत.
0 notes
*अदिती आणि आस्तादला परदेशातून चर्चेचं आवताण*
राजकीय आणि सामाजिक वक्तव्यावरून घडणाऱ्या चर्चा याचे उलट सुलट प्रतिबिंब समाजात उमटत असते. कित्येकदा या चर्चा उलथापालथ करणाऱ्या ठरल्या आहेत. वेगवेगळ्या चर्चांनी सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. त्यात आता 'पठाण' मधील गाण्यावरून 'रंगासंगे युद्ध आमचे सुरु' हा चर्चेचा नवा अंक रंगत असताना मराठी रंगभूमीवरील एका चर्चेने प्रेक्षकांना खडबडून जागं केलं आहे. अगदी परदेशातही या चर्चेची दखल घेतली आहे. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं चर्चा तर होणारच या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे. अमेरिका, सिंगापूर, दुबई येथील महाराष्ट्र मंडळाकडून हे आमंत्रण देण्यात आलं आहे.
नाटकाचे अधिकाधिक प्रयोग परदेशात व्हावे अशी इच्छा परदेशातील नाट्यरसिक व्यक्त करत आहेत.
परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात आहे . एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम झडविल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत कोण, कसे डावपेच खेळतात याची रंगतदार मांडणी केलेलं नाटकं म्हणजे ‘चर्चा तर होणारच!’
लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाद्वारे सद्य: परिस्थितीवर भाष्य करत घडवून आणलेली चर्चा विचारमंथन करायला भाग पाडते. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर यांनी आपल्या सशक्त अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत.
रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नाटक सध्या तुफान गाजतंय. मुंबई पुण्यातल्या प्रयोगांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच कोकण दौरा आयोजित केला जाणार आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत
0 notes
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाला मिळतोय रसिकांचा प्रतिसाद; मंगळवारी "जोगवा"चे लेखक, दिग्दर्शक संजय पाटील रसिकांशी साधणार संवाद
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाला मिळतोय रसिकांचा प्रतिसाद; मंगळवारी “जोगवा”चे लेखक, दिग्दर्शक संजय पाटील रसिकांशी साधणार संवाद
मुंबई, दि. 14 : पु.ल.देशपांडे कला महोत्सवाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. 20 नोव्हेंबर पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. विविध चित्रपट, नाटक आणि कलाकृती यावेळी सादर होत आहेत.
या सोहळ्यात…
View On WordPress
0 notes
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाला मिळतोय रसिकांचा प्रतिसाद; मंगळवारी "जोगवा"चे लेखक, दिग्दर्शक संजय पाटील रसिकांशी साधणार संवाद
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाला मिळतोय रसिकांचा प्रतिसाद; मंगळवारी “जोगवा”चे लेखक, दिग्दर्शक संजय पाटील रसिकांशी साधणार संवाद
मुंबई, दि. 14 : पु.ल.देशपांडे कला महोत्सवाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. 20 नोव्हेंबर पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. विविध चित्रपट, नाटक आणि कलाकृती यावेळी सादर होत आहेत.
या सोहळ्यात…
View On WordPress
0 notes
देशातील सर्वात महाग सीएनजी महाराष्ट्रातील नागपुरात मिळतोय, पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त किंमत
देशातील सर्वात महाग सीएनजी महाराष्ट्रातील नागपुरात मिळतोय, पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त किंमत
नितीन गडकरी अनेकदा पेट्रोल आणि डिझेलऐवजी पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला देतात. मात्र त्यांच्या शहरातच नागपुरात जनतेला सर्वात महागडा सीएनजी गॅस विकत घ्यावा लागतो.
नागपूर Cng ची किंमत देशातील सर्वात जास्त
महाराष्ट्राची दुसरी राजधानी मानली जाणारी शहरे नागपूर मला डिझेल आणि पेट्रोलपेक्षा सीएनजी महाग मिळत आहे. नागपुरातील सीएनजी गॅसचे दर राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक आहेत. आज नागपुरात (मंगळवार, २…
View On WordPress
0 notes
टिव्ही...
आमच्या अगदी लहानपणी रेडीओ पहिल्यांदा घरी आला त्यावेळी ‘कुठल्या कुठे लांब असलेल्या लोकांचा आवाज घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळतोय बघा आप्पाराव, उद्या ती लोकं दिसूही लागतील!’ असे तात्या आणि आप्पा (आजोबा आणि चुलत आजोबा) यांचे संभाषण आम्ही ऐकले होते. पहिल्यांदा टेलिफोन आला त्यावेळीही ‘पुढे लोकं फोनवर दिसूही लागतील’ असेच वक्तव्य ऐकले होते. दोन्ही गोष्टी कालांतराने खर्या ठरल्या.
टेलिव्हिजनचे अजून सर्वत्र प्रचलन झाले नव्हते, पण वर्तमानपत्रात त्याबद्दल बातम्या यायच्या. अशा बातम्या वाचून खूप आश्चर्य वाटायचे. घरी बसून बातम्या ‘दिसतात’, सिनेमा पहाता येतो हे ऐकुन ते कसे असते हे पहायची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. मुंबईला बहिणीकडे टिव्ही घेतला होता. ती कधी आली की त्यावर काय काय दिसते ते सांगायची. त्यामुळे कधी एकदा मुंबईला जातो आणि टिव्ही पहातो असे झाले होते. तो योग 1980 साली अकरावीत असतांना आला!
आईसोबत मुंबईला पहिल्यांदाच गेलो होतो. बहिणीच्या घरी गेल्याबरोबर हॉलमध्ये नजर फिरवली. कोपर्यात टिपॉयवर समोर काच असलेला एक लाकडी डबा दिसला. तोच ‘टिव्ही’ हे लक्षात आले. आयुष्यात पहिल्यांदाच तो डबा पाहिला होता. भाऊजींनी सांगितलं की संध्याकाळी पाच वाजता टिव्ही सुरु होतो. वेळ जाता जात नव्हता. टिव्ही सुरु होतो म्हणजे नेमके काय होते, त्यात लोकं कसे दिसतात, थिएटरमध्ये दिसतो तसाच सिनेमा दिसतो का, असे अनेक प्रश्न मनात येत होते.
संध्याकाळी साडेचारपसूनच टिव्हीसमोर बसलो. भाऊजींनी टिव्ही चालू केला. काही वेळ फक्त मधमाशाच दिसल्या. नंतर काळ्या पांढर्या उभ्या पट्ट्या व त्याबरोबर टुं....असा अवाज! बरोबर पाच वाजता दूरदर्शन असे लिहीलेला एक गोळा फिरायला लागला. संगीतही ऐकायला येऊ लागले. अन काय कमाल! तो गोळा थांबल्यावर एक बाई प्रकटली, अन चक्क बोलायला लागली! माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी मन लावून पहात होतो. आजचे कार्यक्रम तिने सांगितले. काही वेळाने ‘संत तुकाराम’ चित्रपट सुरु झाला. मी तो पूर्ण पाहिला. आयुष्यात पहिल्यांदाच टिव्ही पाहिला अन ते पहायची सरुवातही संत तुकारामने झाली! त्याकाळी टिव्ही ब्लॅक अँड व्हाईट असायचे. दिल्लीला काही ठिकाणी रंगीत टिव्ही सुरु झाले होते असे भाऊजींनी सांगितले. अजूनच आश्चर्य वाटले.
दूरदर्शनचे कार्यक्रम संध्याकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत असायचे. जे असेल ते पहायचे, नो चॉईस! तिथल्या वास्तव्यात दिवसा जरी बाहेर फिरलो तरी संध्याकाळी टिव्ही पहायचा भरपूर आनंद लुटला.
1983-84 साली उमरग्यालाही घरी टिव्ही आला. दादांनी सोलापूरहुन ओरीऑन कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही आणला होता. त्याला समोर लाकडी स्लायडिंग शटर होते. पाहणे झाले की ते शटर बंद करुन ठेवायचे. रेडीओच्या माडीत ते एका टेबलावर स्थानापन्न झाले. तिसर्या माडीत (गच्चीवर) अँटेना लावला. त्याचे अँगल अॅड्जस्ट केले की चित्र दिसायचे. रोज संध्याकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत कार्यक्रम असायचे. मुंबईला मराठीतून कार्यक्रम असायचे, पण इथे फक्त दिल्ली दूरदर्शनचे हिंदीतले कार्यक्रमच दिसायचे. रविवारी मात्र सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत कार्यक्रम असायचे. दुपारी सगळ्यात बोअरिंग युजीसी चा कार्यक्रम लागायचा. त्या वेळात आम्ही जेवून घ्यायचो. पुन्हा टिव्हीसमोर हजर!
टिव्ही आल्यापासून रेडीओ मागे पडले. रात्रीची आपली आवड, विविध भारती, भुले बिसरे गीत, बिनाका गीतमाला ऐकणे कमी झाले. त्याजागी नुक्कड, हम लोग, बुनियाद, ये जो है जिंदगी, रजनी, डिस्कवरी ऑफ इंडीया, अशा सिरियल्स पाहणे सुरु झाले. अगदी सुरुवातीला तर रात्रीचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमपण आम्ही बघायचो. मुंग्या दिसायला लागल्यावरच टिव्ही बंद व्हायचा!
याच काळात पंतप्राधान इंदिरा गांधींची हत्या झाली होती. बारा तेरा दिवस टिव्हीवर फक्त दुखवट्याचे सांगितिक कार्यक्रमच दाखवले जात होते. त्यांची अंत्ययात्रा लाईव्ह दाखवणार होते. गावात मोजकेच टिव्ही त्यावेळी होते. ज्यांना आमच्याकडे टिव्ही आहे हे माहित होते असे एकेकजण त्या दिवशी यायला लागले. रेडीओच्या माडीतील पलंग, सोफे काढून जास्त लोकांना बसता यावे यासाठी सतरंज्या टाकल्या. हळुहळू गर्दी वाढायला लागली. हॉल संपूर्ण भरला. काही जण उभे राहिले. नंतर तर गर्दी एवढी वाढली की समोरच्या दारापासून, अंगणातून वर जाणार्या पायर्यावर लांबलचक लाईनच लागली. रेडीओ ठेवला होता त्या खालची खिडकी उघडी करुन ठेवली. अलिकडच्या खोलीतून त्या खिडकीत उभे राहून काहीजण टिव्ही पाहू लागले. अंत्ययात्रा पाहून काही बायका तर पदर डोळ्याला लावून हमसुन हमसुन रडायला लागल्या होत्या. त्यांना आवरणे कठिण जात होते.
सर्वांना जागा करुन देण्यात आमची एवढी दमछाक होत होती की कुणाला बसू द्यावे अन कुणाला जायला सांगावे हे कळेना. काही जणांना थोडे पाहून जायला सांगितले की त्यांना राग यायचा. बाहेरच्यांना आत येऊ नाही दिले तर त्यांनाही राग यायचा. या सगळ्या द्रवेडी प्राणायामात आम्हालाच ते प्रसारण संपूर्ण पाहता आले नाही! अंत्यविधी पार पडुन लोकं परततांना दिसायला लागले तेव्हाच इकडची गर्दी हळुहळू ओसरली!
असाच प्रकार महाभारत सिरीयलच्या वेळेसही यायचा. त्यावेळपर्यंत गावातली टिव्हींची संख्या वाढली होती. तरी वाड्यातले व गल्लीतले मिळून पंचेवीस-तीसजण ही सिरीयल पहायला असायचे! श्रीकृष्ण दिसला की बायका टिव्हीला नमस्कार करायच्या. गनीमत! कुणी हळद कुंकू वाहिले नाही! या महाभारत सिरियलचे वैशिष्ट्य असे होते, की त्याच्या प्रसारणाच्या वेळी रस्त्यावर अक्षरश: कर्फ्यु असायचा. कुठे चिटपाखरु दिसायचे नाही. दुकाने ओस पडायची. तरी कुठे चोरी झालेली ऐकले नाही. बहुतेक चोरही ही सिरियल पहात असावेत!
टिव्हीचा सर्वात जास्त फायदा तर आमचे अत्यंत आवडते क्रिकेट पहाण्यासाठी व्हायचा. पूर्वी रेडीओवर कॉमेंट्री ऐकून स्टेडियमवरील खेळाचा कल्पनेप्रमाणे अंदाज करावा लागायचा. आता ते प्रत्यक्ष दिसत होते. टिव्हीवर अनेक क्रिकेट मॅचेस पाहिल्या. मी शिकायला लातूरला असतांना 1985 साली ऑस्ट्रेलियात बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशीप क्रिकेट टुर्नामेंट होती. मी थोडा आजारी पडलो होतो. ती संधी साधून उमरग्याला आलो. टिव्हीसमोरच्या पलंगावर ठिय्या मांडला. बस���्या जागेवर आई खायला आणून द्यायची. आजारी होतो ना! पंधरा दिवस थांबून सगळ्या मॅचेस पाहिल्या. रवी शास्त्रीला ऑडी देऊनच लातूरला परतलो!
पुढे काही वर्षांनी घरी रंगीत टिव्ही आला आणि हा कृष्णधवल टिव्ही दादांनी हमीदला देऊन टाकला!
आता काळ बदललाय. केबल, सॅटेलाईट, इंटरनेट या माध्यमातून असंख्य चॅनल्सवर अनेक प्रकारचे कार्यक्रम, घरी बसूनच काय, चालता फिरतासुद्धा पहाता येत आहेत. आम्ही चौदा पंधरा वर्षाचे असतांना पहिल्यांदा टिव्ही पाहिला! पण आता जन्मत:च सर्व उपलब्ध आहे. लहान मुलांना ‘चिऊ ताई ये काऊ ताई ये...’ असे म्हणून घास भरवणे बंद होऊन टिव्ही किंवा मोबाईलवरचे कार्टुन दाखवत खाऊ घालणे सुरु झाले आहे. मुलांचे मैदानावर जाऊन खेळणे तर जवळपास बंदच झाले आहे.
आमची पिढी मात्र याबाबतीत नशीबवान आहे. आम्ही मैदानी खेळही भरपूर खेळलो, विहीरीत पोहण्याचा आनंदही लुटला, खूप मस्ती केली, त्याबरोबरच आता कॉम्प्युटर युगाचाही आनंद लुटत आहोत...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note
·
View note
तुमचा व्यवसाय ऑनलाईन आहे का?
कारण आज काल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन मिळतात म्हणून तुमच्या व्यवसायाला पूर्वी पेक्षा कमी response मिळतोय का?
मग तुम्ही सुद्धा तुमच्या वस्तू ऑनलाईन का विकत नाही? इंटरनेटला न वेळेची मर्यादा आहे न जागेची. तुमची website बनवा आणि व्यवसाय २४ तास घर बसल्या सुरु राहील!
आहे त्या पेक्षा अधिकपटीने तुमचा Business मोठा होऊ शकतो.
आजच संपर्क करा : 9922833107
Website: www.kbplussoftwaresystem.com
#kbplusdigitalmarketing #digitalmarketing #softwaredesign #webdesign#websitedesign #websitedevelopent
1 note
·
View note
Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर 'या' कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट
Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर ‘या’ कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट
Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर ‘या’ कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट
Poco Smartphones : चीनी टेक कंपनी Poco च्या सर्व लोकप्रिय स्मार्टफोन्सवर डिस्काउंटचा लाभ देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमुळे, विशेष ऑफरसह अनेक पोको डिव्हाइसेस मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. जर तुम्ही नवीन वर्षासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल…
View On WordPress
0 notes
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यशाच्या आजोबांनी घेतली एक्झिट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिक…
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यशाच्या आजोबांनी घेतली एक्झिट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिक…
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी, परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
या मालिकेत मुख्य मुख्य भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे साकारत आहे. तसेच मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित…
View On WordPress
0 notes
सोलापूर पोलिसांनी तृतीयपंथीयांना दिला रोजगार
सोलापूर पोलिसांनी तृतीयपंथीयांना दिला रोजगार
-पेट्रोलपंपावर काम करून मिळतोय हक्काचा पगार
सोलापूर: प्रतिनिधी
वर्षानुवर्षे समाजानेच काय तर कुटुंबाने ही दुर्लक्षित ठेवलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. जत्रा, यात्रा, बाजार, रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावरती टाळी वाजवून आजपर्यंत हा समाज कसाबसा जगत आलाय. मात्र, आजपर्यंत या समाजाला ना कधी प्रतिष्ठा मिळाली ना माणूस म्हणून मानाचं स्थान. या समाजाच्या वाट्याला आजपर्यंत केवळ हेटाळणी आणि तिरस्कारच आलाय. या…
View On WordPress
0 notes
*✒️प्रचंड नुकसान होऊनही प्रशासन धृतराष्ट्र च्या भूमिकेत!*
*✒️सोलापूर जिल्ह्याला मिळतोय वेगळा न्याय!अहमदनगर, सांगतील नुकसानीचे पंचनामे सुरु झाले,सोलापूरला कधी सुरु होणार
https://www.aajtimenews.in/Ahmednagar-Sangli-damage-panchnama-started-when-will-it-start-in-Solapur
0 notes
ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाला लाभले प्रदर्शनाचे कोंदण…
ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाला लाभले प्रदर्शनाचे कोंदण…
ठाणे येथे टाऊन हॉलमध्ये सुरू असलेले कोकण विभागीय विकास प्रदर्शनाला सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सामान्य ठाणेकरांचे शतकी वाटचाल करणाऱ्या टाऊनहॉल बरोबर असलेले नाते अधिक घट्ट होण्यासाठी हे विकास प्रदर्शन खुपच उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नागरिक टाऊन हॉलचे बदलेले रुपडे पाहून हरखून जात आहेत. मंगळवारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक…
View On WordPress
0 notes
रात्रीस खेळ चाले ३ मध्ये आता ही अभिनेत्री साकारणार शेवंता
रात्रीस खेळ चाले ३ मध्ये आता ही अभिनेत्री साकारणार शेवंता
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळतोय. पहिल्या २ पर्वांप्रमाणेच तिसऱ्या पर्वावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण सध्या मालिकेत शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मालिकेत सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकर हि शेवंताची भूमिका साकारत आहे. जाणून घेऊया कृतिका बद्दल.
कृतिका गेली १८ वर्ष थिएटर माध्यमात कार्यरत असून तिने अनेक नाटक आणि…
View On WordPress
1 note
·
View note