#GovernorKoshyari : आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी
#GovernorKoshyari : आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी
#GovernorKoshyari : आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्ज्वल भारताचे स्वप्न…
View On WordPress
0 notes
ENG vs IND: इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली, 1200 बळी घेणाऱ्या जोडीला संधी मिळाली
ENG vs IND: इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली, 1200 बळी घेणाऱ्या जोडीला संधी मिळाली
इंग्लंड 11 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम कसोटी खेळत आहे: भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे पाचवी पुनर्निर्धारित कसोटी खेळली जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड 1-2 ने पिछाडीवर असल्याने हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे.
1200 बळी घेणाऱ्या जोडीला संधी मिळाली
भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या पाचव्या…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
पुणे कार अपघात प्रकरणी ससून रूग्णालयात झालेल्या गैरप्रकारचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखालील ही समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार आहे.
दरम्यान, या समितीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. सापळे यांची जेजे रुग्णालयातल्या सामान खरेदी-विक्री प्रकरणात चौकशी सुरु असून, त्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करणं मंजूर नसल्याचं दानवे ट्विट संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असून, या रुग्णालयाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर एक पोस्ट केली आहे. रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणं चांगलं लक्षण नाही, म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणं आवश्यक असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. वीर सावरकर यांनी आपलं आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांचं जीवन देशवासियांना सतत देशसेवेची प्रेरणा देणारं आहे, असं मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी नगर शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला आज विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं.
धुळे इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करुन अभिवादन केलं.
****
राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली. या आरोपींना वडोदरा, गोपालगंज, दिल्ली, गुरुग्राम आणि चंदीगढ इथून अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय युवकांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेऊन त्यांना कंबोडिया आणि लाओस सारख्या ठिकाणी अवैध कामांसाठी प्रवृत्त करण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. या कारवाईत कागदपत्रं, डिजिटल उपकरणं, एकाधिक पासपोर्ट, आदी साहित्य जप्त करण्यात आल्याचं एनआयएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
गुजरातच्या राजकोट इथल्या गेमिंग झोन आग प्रकरणी विशेष तपास पथकाचा अहवाल तीन दिवसांत येणं अपेक्षित असल्याचं, गुजरात सरकारनं काल गुजरात उच्च न्यायालयाला सांगितलं. अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र आणि इतर अत्यावश्यक परवानग्या नसतानाही गेल्या दोन वर्षांपासून राजकोट शहरात सुरू असलेल्या दोन गेमिंग झोन्सवरून गुजरात उच्च न्यायालयानं राजकोट महापालिका आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले. या प्रकरणाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती.
दरम्यान, या प्रकरणी गुजरात सरकारनं सात अधिकाऱ्यांवर कामात दुर्लक्ष आणि विलंब केल्याबद्दल काल निलंबनाची कारवाई केली. शनिवारी झालेल्या या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
****
एफ आय एच हॉकी प्रो लीग युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमनप्रीत सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा पाच - चार असा पराभव केला. भारतासाठी अरैजीत सिंह हुंदल आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमनप्रीत सिंहनं तीन गोल नोंदवले. भारताचा पुढचा सामना एक जूनला जर्मनीसोबत होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकमधल्या प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत भारताच्या अंकुशिता बो��ो हीनं महिलांच्या ६० किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अंकुशिता हिनं मंगोलीयाच्या नमुन मोनखोर हिच्यावर ४-१ अशी मात केली. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात मात्र भारताच्या अभिमन्यू लॉरा याचं आव्हान संपुष्टात आलं.
****
रेमाल चक्रीवादळामुळे आसाम मध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातल्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सावधानता म्हणून आसाममधल्या अनेक जिल्हा प्रशासनांनी आज शाळा बंद ठेवल्या असून, रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये रेमाल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. चक्रीवादळामुळे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातला अनेक भाग पाण्याखाली आला आहे. कोलकाता आणि आसपासच्या परिसरात वादळी वारे थांबले असून, मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
****
0 notes
ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १०:- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा…
View On WordPress
0 notes
Asia Cup 2023, IND Vs SL : रोहित शर्माची अपवाद सर्वाधिक 53 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले.
वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे.
भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली.
0 notes
#BodhDiwas_Of_SantGaribdasJi
भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी शहरात जनजागृति
पैठण शहरात कबीर पंथियांची शांती यात्रा अधिक जानकारी के लिए पढ़िए अनमोल पुस्तक ज्ञान गंगा अवश्य पढ़ें।
0 notes
तीसाव्या दशकात देशभर स्वातंत्र भारतासाठी क्रांतीचे वारे वाहू लागले होते.याचं लोण ठाण्यानजदीगच्या बेलापूर पट्टीपर्यंत येवून पोहचलं होतं.ठिकठिकाणी देशभक्तांच्या फळ्या उभ्या राहत होत्या.त्यातच अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरोधच्या असंतोषाची आग धगधगत होती.अश्यात ब्रिटिशांनी मिठावर अवास्तव व अन्यायकारक कर लावला आणि देशभर संतापाची लाट उसळली. इंग्रजांच्या या निर्णयाविरोधात जाऊन महात्मा गांधी यांनी मिठावरील कर न भरण्याचं आवाहन भारतीयांना केलं.याचसोबत गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली. यानंतर देशभर मीठाच्या सत्याग्रहासाठी छावण्या उभारण्यात आल्या.
0 notes
"आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे" : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
“आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे” : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती स्वत: आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.…
View On WordPress
0 notes
नवभारताचे निर्माणकर्ते - पंडित जवाहरलाल नेहरू
नवभारताचे निर्माणकर्ते – पंडित जवाहरलाल नेहरू
स्वातंत्र्य प्राप्तीआधीच, पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे संकल्पचित्र मनाशी रेखाटले होते. पंतप्रधानपदाच्या आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १४० पेक्षा अधिक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी त्यांनी केली, हे त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक आहे. त्यांनी देशात एकसंघात्मकता निर्माण केली. संविधान निर्माण करण्याची जबाबदारी देशातील सर्वात योग्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपविली. स्वतंत्र भारतासाठी…
View On WordPress
0 notes
गौतम गंभीरने 2011 च्या विश्वचषक मोहिमेदरम्यान 1983 च्या विश्वचषकाच्या नायकांबद्दल "काही वरिष्ठांनी" काय सांगितले ते उघड केले | क्रिकेट बातम्या
गौतम गंभीरने 2011 च्या विश्वचषक मोहिमेदरम्यान 1983 च्या विश्वचषकाच्या नायकांबद्दल “काही वरिष्ठांनी” काय सांगितले ते उघड केले | क्रिकेट बातम्या
गौतम गंभीरचा फाइल फोटो© एएफपी
2011 चा विश्वचषक विजय हा भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा प्रसंग होता. 1983 च्या विश्वचषक विजयानंतर, भारतीय क्रिकेट संघाने 50 षटकांची मार्की आयसीसी स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. गौतम गंभीर त्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत नऊ सामन्यांमध्ये 393 धावा करून तो भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने…
View On WordPress
0 notes
भारतासाठी धोक्याची घंटा! अरुणाचलच्या सीमेजवळ चिनी लष्कराकडून वेगाने बांधकाम; स्थानिकांनी कॅमेरात कैद केली दृष्यं
भारतासाठी धोक्याची घंटा! अरुणाचलच्या सीमेजवळ चिनी लष्कराकडून वेगाने बांधकाम; स्थानिकांनी कॅमेरात कैद केली दृष्यं
भारतासाठी धोक्याची घंटा! अरुणाचलच्या सीमेजवळ चिनी लष्कराकडून वेगाने बांधकाम; स्थानिकांनी कॅमेरात कैद केली दृष्यं
चीन लडाखमध्ये मोठा पूल बांधत असल्याची माहिती समोर आल्यानंतर काही दिवसांतच आता ही नवी माहिती समोर आली आहे
अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सिमेला लागून असलेल्या अनवाज जिल्ह्यातील नागरिकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये चिनी लष्कराच्या माध्यमातून सीमेवर सुरु असणाऱ्या बांधकामाची दृष्य समोर…
View On WordPress
0 notes
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातून काढण्यात आली आजादी गौरव क्रांती पदयात्रा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातून काढण्यात आली आजादी गौरव क्रांती पदयात्रा
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले.१५० वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस ने स्वातंत्र्य भारतासाठी दिलेला लढा पाहता आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत आहे यानिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातून आजादी गौरव क्रांती पदयात्रा काढण्यात आली.यामध्ये सावंतवाडी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
0५ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा- नीट आज होणार आहे. देशभरासह देशाबाहेरील अशा ५७१ केंद्रांवर दुपारी दोन ते सायंकाळी सव्वा पाच यादरम्यान ही परीक्षा होईल. सुमारे २४ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या प्रवेशपत्रावर स्वत:च्या छायाचित्रासह स्वाक्षरी केलेली असणं आवश्यक आहे.
****
केंद्र शासनानं कांदा निर्यातबंदी उठवल्यानं, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत, त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. निर्यातबंदी उठवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानं हा निर्णय घ्यावा लागल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. विरोधकांनी या प्रकरणी राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा इथं जादुटोणा केल्याच्या संशयावरून एका महिलेसह दोन जणांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना एटापल्ली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं आरोपींना काल पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही दुर्घटना १ मे रोजी घडली होती. दरम्यान, यात मारहाण करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी काल गडचिरोलीच्या अपर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
****
विकसित भारतासाठी उच्चशिक्षण महत्वाचं असल्यानं केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरणाला प्राधान्य दिल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केलं आहे. पुणे इथं काल डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वर्ष २०१४ नंतर केंद्र सरकारनं उच्चशिक्षणाच्या पायाभरणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, तसंच तंत्रज्ञान, वैद्यकीय तसंच व्यवसायाभिमुख उच्चशिक्षण संस्था उभारण्यात मोलाचं योगदान दिलं आहे, असं त्या म्हणाल्या.
****
राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान ४३ पूर्णांक ८ अंश सेल्सियस हे मालेगाव इथं नोंदवण्यात आलं. कोकणात आज आणि उद्या हवामान उष्ण आणि दमट असेल, असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, आज रात्री साडे अकरापर्यंत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
"आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे" : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
“आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे” : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती स्वत: आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.…
View On WordPress
0 notes
वर्ल्ड चॅम्पियन निखतनेही CWG मध्ये गोल्डन पंच लावला, सोशल मीडियावर बॉक्सर मुलीचा जल्लोष
वर्ल्ड चॅम्पियन निखतनेही CWG मध्ये गोल्डन पंच लावला, सोशल मीडियावर बॉक्सर मुलीचा जल्लोष
भारताची बॉक्सर कन्या निखत जरीन हिने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या सामन्यात निखतने प्रतिस्पर्धी कार्ली मॅकनालला आपल्या ठशक्यांसह टिकू दिले नाही.
निखतने सुवर्णपदक जिंकले
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
CWG 2022 च्या 10 व्या दिवशी निखत जरीनने भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले. देशाची महिला बॉक्सर आणि विश्व विजेता निखत जरीनने रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेत…
View On WordPress
0 notes
ज्युदोमध्ये डबल धमाका
एक रौप्य, एक कांस्य पदक पटकावले
बर्मिंगहम : भारताने आज ज्युदोमध्ये डबल धमाका केल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या सुशिलादेवी लिकमाबाने ४८ किलो वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर भारताच्या विजयकुमार यादव याने ६० किलो वजन गटात कांस्यपदकाची कमाई केली.
भारताला आज ज्युदोमध्ये एक तरी सुवर्णपदक मिळावे, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण भारताला आज ज्युदोमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नसले तरी त्यांनी दोन पदकांची कमाई केली आहे. सुशिलादेवीने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशिलादेवीने रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशिलादेवीने भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावले आहे. यावेळी सुशिलादेवीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा एकदा सुशिलादेवी दमदार कामगिरी करेल, असे वाटले होते. त्यामुळेच तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. सुशिलादेवीचा अंतिम फेरीतील सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेलाबरोबर होणार आहे.
सुशिलादेवी आणि मिचेला यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पण या सामन्यात सुशिलादेवीवर मिचेला भारी पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सुशिलादेवीच्या हातून सुवर्णपदक निसटले आणि तिला रौप्यपदक मिळवता आले. मिचेलाने या सामन्यात अनुभव पणाला लावला आणि सुशिलादेवीवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
सामन्याच्या सुरुवातीलाच विजय कुमार हा आक्रमक खेळ करत असल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या पाच सेकंदांमध्येच त्याने जोरदार चाल खेळली आणि तिथेच आता विजय कुमार पदक पटकावणार हे जळपास निश्चित झाले होते. एकामागोमाग एक भारतासाठी ज्युदोमध्ये हे दुसरे पदक आले. विजय कुमारने कांस्यपदकाच्या सामन्याच्या सुरुवातीच्याच मिनिटाला पेट्रोस क्रिस्टोडॉलिड्सची झटपट कामगिरी करून भारताला पदक मिळवून दिले. विजय कुमारने बेल वाजवण्याच्या अवघ्या ५ सेकंदांनंतर वाजा-अरी जिंकली आणि पुरुषांच्या ६० किलो ज्युडो स्पर्धेत इप्पोनला कांस्यपदक मिळवून देण्यासाठी दावेदारी स्पष्ट केली.
Read the full article
0 notes