ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू
ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू
ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू
पंढरपुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला असून ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू झाला आहे.
Go to Source
View On WordPress
0 notes
कर्मचाऱ्यांच्या विरोधानंतर फोर्ड चेन्नई प्लांटमध्ये उत्पादन सुरू करणार आहे
कर्मचाऱ्यांच्या विरोधानंतर फोर्ड चेन्नई प्लांटमध्ये उत्पादन सुरू करणार आहे
नवी दिल्ली. भारतात, फोर्ड मोटरने पुढील महिन्याच्या अखेरीस तामिळनाडूमधील चेन्नई येथे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन ऑटो दिग्गज सध्या त्यांच्या कर्मचार्यांशी चर्चा करत आहे जे त्यांना दिलेल्या विच्छेदन पॅकेजला विरोध करत आहेत. उत्पादनाचे वेळापत्रक जून ते जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांशी चर्चा करून घेण्यात आला आहे.
फोर्ड इंडियाने गेल्या वर्षी देशात मोटारींचे उत्पादन बंद…
View On WordPress
0 notes
कामगारांचा आवाज बुलंद करणारे ज्येष्ठ कामगार नेते, माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण जॉर्ज फर्नांडिस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली!
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरु राहणार आहे. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. भाजपानं व्हीप जारी करुन सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहायला सांगितलं आहे. राज्यसभेत जलप्रदुषण निवारण आणि नियंत्रण सुधारणा विधेयक २०२४ पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव, तर लोकसभेत प्रवेश परीक्षांमध्ये होणारी कॉपी आणि पेपरलीक सारख्या घटना रोखण्याशी संबंधीत कठोर तरतूदी असणारं विधेयक मांडण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पुरवणी मागण्या दर्शवणारं विवरण पटलावर ठेवणार आहेत.
****
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या शक्ति या बँडला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. लॉस एंजेलिसमध्ये आज झालेल्या ६६व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहोळ्यात सर्वश्रेष्ठ वैश्विक अल्बम श्रेणीमध्ये ‘दिस मोमेंट’ या अल्बमसाठी शंकर महादेवनसह चार भारतीय संगीतकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उस्ताद झाकीर हुसैन यांनी तीन तर सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले.
****
नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल सर्वसाधारण परिषदेचा समारोप काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाला. आजच्या काळात हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर, न्यायाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व पैलूंसह पर्यावरणीय न्यायाचा पैलूदेखील समाविष्ट केला पाहिजे, असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं.
****
नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात एका विहिरीत गाळ काढत असताना क्रेनचा वायर रोप तुटल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. काल बागलाण तालुक्यातल्या मुळाणे इथं ही घटना घडली.
****
पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने दर्पण आणि मूकनायक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार काल अंबाजोगाई इथं वितरीत करण्यात आले. नितीन चव्हाण, दिनकर शिंदे आणि श्रीयुत स्वामी या पत्रकारांना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विशाल साळुंखे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
0 notes
वाळूजमध्ये अग्नितांडव;कंपनीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
View On WordPress
0 notes
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गिरणी कामगारांचा पात्र वारस करणार गृहप्रवेश l Mhada Lottery
Mhada Lottery : बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिल येथील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 2020 च्या म्हाडाच्या
0 notes
नाशिक महानगरपालिकेतील कामगारांचा दीपावलीनिमित्त 25000 रु. सहानुग्रहअनुदान ?
0 notes
ऊसतोड कामगारांचा संशयास्पद मृत्यू ; अंत्यविधी न करता प्रेत ठेवले मिठात पुरून
ऊसतोड कामगारांचा संशयास्पद मृत्यू ; अंत्यविधी न करता प्रेत ठेवले मिठात पुरून
नंदुरबार : कालिबेल तालुका धडगांव येथून ऊस तोड मजुरीसाठी माळशिरस तालुक्यातील तोंडले येथे गेलेल्या ईश्वर सिपा वळवी यांचा मनमाड येथे संशयांस्पद मृत्यू झालाय
.या प्रकरणी रवी चव्हाण, मनोज चव्हाण, रा.तोंडले ता. माळशिरस जि. सोलापूर तसेच मुकादम आट्या वन्या वळवी रा. कालिबेल ता. धडगांव जि. नंदुरबार यांची सखोल चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा . तोपर्यँत ईश्वर वळवि याच्यावर अंत्यसंस्कार…
View On WordPress
0 notes
नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार - कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) : राज्याच्या विकासामध्ये कामगार हा महत्त्वाचा घटक असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरप��े उभे आहे. कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार. यासाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात यामध्ये कामगार…
View On WordPress
0 notes
नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार - कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) : राज्याच्या विकासामध्ये कामगार हा महत्त्वाचा घटक असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार. यासाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात यामध्ये कामगार…
View On WordPress
0 notes
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
गटार साफ करत���ना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. गटार साफ करतेवेळी दोघा कामगारांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या कामागाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिसऱ्या मजुरावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रासायनिक उग्र वासामुळे या कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.…
View On WordPress
0 notes
दीपक मोहिते,
" हल्लाबोल,"
प्रकल्प अन्यत्र जाणे ; केवळ कुरघोडीचे राजकारण...
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात राजकीय रणकंदन माजले आहे.हा प्रकल्प गुजरात सरकारने पळवला म्हणून शिवसेनेने रान उठवले आहे.काल त्यांच्या मुखपत्रातून " गुजराती लुटीमुळे महाराष्ट्र पेटणार !,"असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गुजराती समाज सेनेच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.तसं झाल्यास सेनेला मुंबई महानगरपालिका गमावण्याची पाळी येईल व भाजपचे उद्दिष्ट आपोआप साध्य होईल.
वेदांत-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष तोंडसुख घेणार,अशी अटकळ होती,ती खरी ठरली.सेनेचा हा गुजराथद्वेष त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे.पूर्वी आघाडी व नंतर युतीचे सरकार असतानाही महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक प्रकल्प शेजारच्या गुजरात राज्यात गेले.मग आताच ही ओरड का ? रायगड जिल्ह्यातील रसायनी गुजरात राज्यातील जामनगर येथे,मर्सिडीझ तामिळनाडूमध्ये गेली. या व्यतिरिक्त अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले.प्रकल्पाचे व्यवस्थापन,राज्यात प्रकल्प उभारण्यास का राजी होत नाहीत.याचा राज्यातील नेत्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.कामगार संघटनेचा जाच,कंत्राटे आमच्याच माणसाना मिळाले पाहिजेत,असा स्थानिक नेत्यांचा अट्टाहास,वारंवार होणारे संप, व औद्योगिक क्षेत्रातील दहशत,अशा विविध
कारणांमुळे राज्यातील अनेक कंपन्या आपला गाशा गुंडाळत आहेत.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने राजकीय पक्षाच्या कामगार संघटनांच्या दादागिरीमुळे बंद पडले तर काहींनी गाशा गुंडाळून शेजारच्या गुजरात राज्यात ( उंबरगाव ) पळ काढला.आमच्या नेत्यांना आण्विक,ऊर्जा,तेल रिफायनरी,सारखे प्रकल्प नको आहेत.याच मुर्दाड राजकर्त्यामुळे एन्रॉन विजनिर्मिती प्रकल्प बरबाद झाला.आज औरंगाबादच्या महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या वसाहतीमध्ये काय स्थिती आहे ? गेल्या काही वर्षात पंधराशे कारखान्यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अखेरचा श्वास घेतला.पण त्यावर एकही नेता बोलायला तयार नाही.हजारो बेरोजगार तरुण भिकेला लागले.पण आज तेच नेते तुमच्या आमच्या पोराबाळाचा रोजगार बुडाला,म्हणून गळे काढताना आपण पाहतोय.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मते मिळवण्यासाठी आता मराठी अस्मितेवर फुंकर मारण्याचे काम,या लोकांनी सुरू केले आहे.पण ३८ वर्षांपूर्वी गिरणी कामगारांचा संप कोणी फोडला ? सुमारे २ लाख कामगारांच्या संसाराची होळी कोणी केली ? मुंबईतील कापड व्यवसाय देशोधडीला लावणारे कोण होते ? आज मराठी माणसाच्या अस्मितेच्या नावाने हे लोक गळा काढत आहेत.महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या कि याना मराठी माणसाचा पुळका येतो.पण त्यांना हे कळत नाही कि गुजरातच्या नावाने खडे फोडल्यामुळे मुंबईतील गुजराती मते भाजपकडे वळणार आहेत.हा प्रकल्प बाहेर गेला म्हणून गळे काढणाऱ्यांचे हे प्रेम,पुतना मावशीचे प्रेम आहे.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १५० कारखाने अन्यत्र हलवण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला ?
या कारखान्यात काम करणारे मराठी भाषिक नाहीत का ? पण आघाडी सरकारने मालक व कामगारांचा विरोध डावलून हे कारखाने अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे.असा निर्णय घेताना आपण हजारो मराठी माणसाच्या संसारावर वरवंटा फिरवत आहोत,याची जाणीव या लोकांना होत नाही,आणि ते तुमच्या आमच्या अस्मितेच्या गोष्टी करू लागले आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,हे लवकरच गेल्या अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले,याची यादी जाहीर करणार आहेत.हे जे काही चाललंय,त्यामागे केवळ कुरघोडीचे राजकारण आहे,या नतद्रष्ट राज्यकर्त्यांना महाराष्ट्राचे हित किंवा मराठी अस्मितेशी काही देणे-घेणे नाही.तुमच्या-आमच्या भावनांना हात घालून सोयीचे राजकारण करणे,एवढेच या लोकांना ठाऊक...
0 notes
माझ्या विरोधातील षडयंत्र उघड करणार!
माझ्या विरोधातील षडयंत्र उघड करणार!
नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा
कणकवली : नवीन कुर्ली विकास समिती चा मागील 13 वर्षे मी अध्यक्ष असून नवीन कुर्ली वसाहतच्या नळपाणी योजनेच्या मेंटेनन्स साठी मागील 12 वर्षांत मी पदरमोड करून 20 लाखहुन अधिक रक्कम खर्च करत गावातील घरोघरी पाणीपुरवठा सुरळीत राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले. जलसंपदा विभागाकडून केवळ नळपाणी कामगारांचा पगार मिळत होता. घरपोच पाणीपुरवठा सुरळीत राहून…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 31 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार आहे; पण त्यासाठी देशातील तरुण सुदृढ असले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. या मालिकेचा हा एकशे आठावा भाग होता. या भागात त्यांनी मावळत्या वर्षातील यशाचा मागोवा घेतला.
नारी शक्ती वंदन कायदा, जी ट्वेंटी परिषद आणि चांद्रयान मोहिमेचं यश, तसंच भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेक देशवासीयांनी पत्र लिहून आनंद व्यक्त केल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केलं. त्याबरोबरच नाटु-नाटु ला मिळालेला ऑस्कर पुरस्कार, 'द एलिफंट व्हिस्परर्स'ला मिळालेला सन्मान, आशियाई खेळ आणि पॅरा गेम्समध्ये खेळाडूंनी मिळवलेली पदकं, क्रिकेट विश्वचषकातील कामगिरी, १९ वर्षांखालील टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील विजय अशा अनेक महत्वपूर्ण घटनांचाही आपल्या भाषणात उल्लेख करत त्यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमा, ७० हजार अमृत तलावांचं निर्माण हेदेखील संपूर्ण देशाचं सामूहिक यश असल्याचं ते म्हणाले.
३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं बोलताना, सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले यांचं मानवतेला समर्पित जीवन आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं, अशा शब्दांत पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
****
राज्यभरातील सुमारे ५३ हजार शिधा वाटप, म्हणजेच रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी उद्या १ जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ सहभागी होणार आहेत. रेशन दुकानदारांना किमान उत्पन्नाची हमी ५० हजार रुपये करावी, टू-जी ऐवजी फोर-जी मशीन द्यावं, कालबाह्य नियमात बदल करावेत, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्यांसाठी हा बंद असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील हातमोजे तयार करणाऱ्या एका कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखान्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन आग लागली होती. या आगीतून सुमारे १५ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर होरपळलेल्या सहा कामगारांना घाटी रुग्णालयात नेण्यात आलं असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत आज महा स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मुख्यमंत्र्यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर महाराष्ट्र गीतानं अभियानाची सुरुवात करण्यात आली. मुंबईत दहा ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून अभियानाचा आढावा घेतला.
****
परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामासाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण योजनेसाठी जिल्ह्यातल्या सव्वा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ३ लाख ८९ हजार हेक्टरवरील ज्वारी, हरभरा, गहू आणि भुईमुगासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. यात हरभरा पिकाचे सर्वाधिक २ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
****
बीड जिल्हा रुग्णालयात काल आयुष अभियान अंतर्गत विविध आजारांचं रोगनिदान आणि उपचार शिबीर घेण्यात आलं. एक हजार दोनशे ३५ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
****
लातूर शहरात पंतप्रधान आवास आणि रमाई आवास योजनेच्या माध्यमातून २०२३ या वर्षात एकूण २ हजार ८३६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. या वर्षभरात एक हजार सातशे ७६ कुटुंबांनी नव्या घरात प्रवेश केला, असं लातूर महानगरपालिकेने कळवलं आहे.
****
0 notes
मजुर ,कामगारांचा बुलंद आवाज विश्वविख्यात साहित्यिक शाहीर अण्णाभाऊ साठे,जयंती निमिताने त्रिवार अभिवादन💐💐💐 https://www.instagram.com/p/Cgr9VYRPL--/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
agriculture fund ई-श्रम कार्ड ऑनलाईन काढून २ लाख रुपये कसे मिळवायचे ?
agriculture fund ई-श्रम कार्ड ऑनलाईन काढून २ लाख रुपये कसे मिळवायचे ?
agriculture fund : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यास असंघटित क्षेत्रातील कामगाराला 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे. हे दोन लाख रुपये मिळविण्यासाठी तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे. हे ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी कशी करायची याची…
View On WordPress
0 notes