*मराठा क्रांती नक्की बघा !!!*
कोपर्डीच्या ताई वर झालेला अत्याचार विरोधात उभारलेले वकील आणि न्यायालयाकडून मिळालेला न्याय व मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चे आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक मनामध्ये प्रचंड वादळ निर्माण झाले व *छत्रपती* *शिवरायांच्या* विचाराने पेटून उठलेला मराठा तरुण म्हणजेच *सचिन जी कदम सर .*
मराठा समाज जागृत कण्याकरता आणि मराठा समाजावर आतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी मराठा समाजावर *शिवरायांच्या प्रेरणेने* चित्रपट बनवला त्या चित्रपटाचे नाव आहे *मराठा क्रांती*
*Link :-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
या चित्रपटांमध्ये त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय ,अत्याचार तसेच मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चा.....
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची असणारी मराठा समाजाविषयी असणारी भूमिका .मराठा आमदार खासदार दिल्ली दरबारी घालत असलेला मुजरा .
पहिला मराठी डायरेक्टर , स्टोरी रायटर ,निर्माते ,दिग्दर्शक, मेकअप, लाइटिंग, साऊंड, ड्रेस डिझाईन यावर स्वतः काम करणारे म्हणजेच *one man army* असे व्यक्तिमत्व मराठा समाजास लाभले ते म्हणजे *सचिन जी कदम सर* कित्येक करोड लागतात चित्रपट बनवण्यासाठीहे आपल्याला पण माहित आहे .परंतु तोडक्या मोडक्या संसारातून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो .या उद्देशाने मराठ्यांसाठी बनवलेला हा पहिलाच चित्रपट *मराठा क्रांती* होय.
तानाजी मालुसरे चित्रपट करणारे डायरेक्टर प्रोडूसर हे मराठा नव्हते .तरीही मराठ्यांनी त्यांच्यासाठी करोडो रुपयांचा फायदा करून दिला.
आज 2022 मध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड बेरोजगारी ,व्यवसायिक ज्ञानाचा आभाव, बँकेकडून न मिळणारे कर्ज,राजकारणी लोकांचे असलेले तरूणांच्या हातातील झेंडे . आज मराठा समाजाला कोठे घेऊन जात आहे घरी खाण्याचे वांदे आहेत . आणि आपण राजकारणी लोकांची झेंडे घेऊन फिरत आहोत .यावरही *मराठा क्रांती* या चित्रपटामध्ये सचिन जी कदम सरांनी प्रकाश टाकलेला आहे .
तरी सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की त्यांनी *मराठा क्रांती* हा चित्रपट एकदा अवश्य पहावा .
*Link :*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
👆👆👆👆👆👆👆
वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्या आणि एकदा चित्रपट अवश्य पहा 🚩 *एक मराठा लाख मराठा* 🚩
सचिन कदम सरांचा मोबाईल नंबर पण देत आहे .
Direcor :- sachin Kadam
mob :- 9221008055
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
2 notes
·
View notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दहा जून रोजी होणारी निवडणूक लांबणीवर
मुंबईत जाहिरात फलक कोसळल्याप्रकरणी फलकाचा मालक भावेश भिडे आणि इतरांवर गुन्हा दाखल
भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
आणि
येत्या रविवारी नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर पुढील ४८ तासात मराठवाड्यात पावसाचा अंदाज
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आज संपली. अर्जांची छाननी उद्या होणार असून, येत्या १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. सातव्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात एकूण ५७ लोकसभा मतदारसंघासाठी एक जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी सात, पश्चिम बंगामधल्या नऊ, बिहारमधल्या आठ, ओडीशातल्या सहा, हिमाचल प्रदेशातल्या चार, झारखंडमधल्या तीन आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे.
****
ज्येष्ठ भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रानौतनं, तर चंदीगढमधून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. दुपारी एक वाजता निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं मोदी यांची सभा होईल. तसंच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांचंही उद्या नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्राचारार्थ डहाणू इथं सभा घेतली.
तर महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज वसई इथं सभेला संबोधित करणार आहेत.
****
राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीची निवडणूक लांबवणीवर टाकण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं राज्यातल्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी १० जून ही तारीख निश्चित केली होती. मात्र, उन्हाळी सुट्ट्यानंतर ही निवडणूक घेण्यासाठी विनंती अर्ज प्राप्त झाले, त्यानुसार ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाकडून निवडणुकीची सुधारीत तारीख नंतर कळवण्यात येईल.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काल पार पडलेल्या मतदानानंतर मतदान यंत्रं स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातही काल मतदान पार पडलं. या मतदारसंघातली सगळी मतदान यंत्रं जालना औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती ऍटो कंपोनंट्स या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत. येत्या चार जून रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्रं स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आली. हा सगळा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असेल, अशी माहिती, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
****
श्रोतेहो, 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण 'ईशान्य मुंबई' लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडा नगर इथं काल वादळी वाऱ्यामुळे लोखंडी जाहिरात फलक कोसळल्याप्रकरणी फलकाचा मालक भावेश भिडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती, पंतनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर बेचाळी�� जण जखमी झाले. ३२ जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त जण अडकल्याची शक्यता महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागानं वर्तवली आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि अग्निशमन दलाचं शोध कार्य सुरू असल्याचं, महानगरपालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी आकाशवाणीला सांगितलं.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले -
दुःखद घटना आहे. दुर्दैवी घटना आहे. मी स्वतः तिथे व्हिजीट केली. जे मृत आहेत त्यांच्या परिवाराला पाच लाख रूपयांची मदत सरकार देणार. जे जखमी आहेत, त्यांचा पूर्ण खर्च सरकार करणार. ज्याची होर्डिंग आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करणार.
दरम्यान, या अपघातातले मृत्यू हे बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तर, घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारनं सखोल चौकशी करून या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. चेन्नीथला यांनी आज राजावाडी हॉस्पिटलला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतल्या जखमींची विचारपूस केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोन वर्षांपासून निवडणूक न झाल्यानं मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत आणि त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशांनुसार ही महापालिका चालत आहे, असा आरोपही चेन्नीथला यांनी केला.
****
भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. नवलखा हे चार वर्षांपासून कैदेत होते. या प्रकरणी अद्याप त्यांच्यावर आरोपही निश्चित झालेले नाहीत. या प्रकरणाची सुनावणी आणखी लांबणार असल्याचं मत नोंदवत न्यायलयानं हा जामीन मंजूर केला. गौतम नवलखा यांना राहत्या घरीच झालेल्या नजरकैदेच्या सुरक्षेसाठीचा वीस लाख रुपयांचा खर्च भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यानं राज्यभरात त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या टीव्ही सेंटर इथल्या चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांनी अभिवादन केलं. महाराजांची वेशभूषा केलेल्या बालकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यातही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी झाली.
****
येत्या रविवारी १९ मे पर्यंत नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण अंदमानमध्ये दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात आज दुपारी काही ठिकाणी पाऊस झाला.
****
नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावं, असे निर्देश धाराशीवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिले आहेत. धाराशीव इथं आज झालेल्या मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ प्रतिसाद द्यावा, तसंच, ज्या विभागांना पावसाळ्यात नियंत्रण कक्ष सुरू करायचे असतात, त्या विभागांनी त्यांचं आतापासून नियोजन करावं, अशा सूचनाही जाधव यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या मागासवर्गीय मुलांसाठीच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्धापूर तालुक्यातल्या इयत्ता आठवी, अकरावी किंवा पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत, असं आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केलं आहे.
****
तेंदूपानं तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला करून तिला ठार केल्याची घटना गडचिरोली तालुक्यात सावरगावच्या जंगलात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पार्वताबाई पाल असं या मृत महिलेचं नाव आहे.
****
नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस येत्या १६ मे पर्यंत जाखल, धुरी, लुधियाना या मार्गाने धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****
0 notes
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना अखेर दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना अखेर दिलासा.....
आमदार नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रसचे नेते यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे.
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण, १३ जुलैला उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला होता.…
View On WordPress
0 notes