How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय
How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय
How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय
How To Purify Blood Naturally at Home : मानवी शरीर हे एका सिस्टमनुसार काम करते. यात प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना जोडलेली आहे. शरीराचे सर्व अवयव, नर्व्हस सिस्टम, मस्क्युलर सिस्टम, हाडे आणि पेशी हे सर्व एकत्रित येतात तेव्हा कुठे आपले शरीर हे काम करत असते. या सर्व अवयवांपर्यंत पोषक घटक…
View On WordPress
0 notes
आहारात या 8 सुपरफूड्सचा समावेश करून रक्तातील साखरेची पातळी झटक्यात कमी करा
0 notes
वारंवार होणाऱ्या उलट्यांचा त्रास १ झटक्यात पळवून लावा
0 notes
Health : सकाळी उठल्यावर बेडवरच करा 4 योगासने, झटक्यात कमी होईल चरबी
0 notes
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण आता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि समाजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झाल��य...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुलींच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आयोग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गावी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
सिंहांच्या कळपाने एका झटक्यात केली बिबट्याची शिकार; व्हायरल व्हिटडीओ कोणत्याही तुमचाही थरकाप उडेल | सिंहीणीच्या कळपाने बिबट्याची शिकार केली एका झटक्यात; व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल
सिंहांच्या कळपाने एका झटक्यात केली बिबट्याची शिकार; व्हायरल व्हिटडीओ कोणत्याही तुमचाही थरकाप उडेल | सिंहीणीच्या कळपाने बिबट्याची शिकार केली एका झटक्यात; व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल
जंगल पक्षी, जंगली ती प्राणी, आणि त्यांची शिकारी. जंगलातील जीवनांनी भरलेले आहे. जंगलात मौजे प्राणीही रात्रंदिवस इकडून तिकडे धावत आरामात या चिंतेत की, कुठल्यातरी भक्ष्य प्राण्याने त्यांना आपली शिकार बनवू नये. शिकार अशी देखील वेळ की, शिकारी प्राणी शिकारी देखील शिकार करतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहिणींच्या कळपाने एका बिबट्याची शिकार केली आहे.
व्हायरल व्हिडियोमध्ये…
View On WordPress
0 notes
किंग कोब्राने एका झटक्यात गिळला रसेलचा व्हायपर, मग घडले असे काही, पीडितेने उधळले
किंग कोब्राने एका झटक्यात गिळला रसेलचा व्हायपर, मग घडले असे काही, पीडितेने उधळले
किंग कोब्रा आणि रसेलचे व्हायपर हे दोन्ही साप जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये गणले जातात. पण हे दोघे एकमेकांशी भिडले तर? गेल्या काही दिवसांत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
किंग कोब्राचा धक्कादायक व्हिडिओ
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
साप हा पृथ्वीवर आढळणारा असा प्राणी आहे, ज्याला पाहिल्यावर चांगल्या सुरमाची अवस्था बिघडते. माणसांवर सोडा, प्राणीही हे पाहून लगेच मार्ग बदलतात. पण एखाद्या सापाने…
View On WordPress
0 notes
आता झटक्यात होणार रेल्वेचे तिकीट बुकिंग
आता झटक्यात होणार रेल्वेचे तिकीट बुकिंग
रेल्वेने आणला स्वतःचा पेमेंट गेटवे
मुंबई : आयआरसीटीसीने म्हणजेच रेल्वेने आपला स्वत:चा पेमेंट गेटवे आणला आहे. IRCTC-iPay या नावाने रेल्वेने आपला गेटवे आणला आहे. यापूर्वी IRCTC iPay Means हा दुसऱ्या कंपनीकडून दिला गेलेला गेटवे होता. यामुळे पैशांचे व्यवहार होण्यास विलंब लागत होता. आता IRCTC-iPay मुळे अन्य बँकांच्या पेमेंट गेटवेवरून झटपट पेमेंट वळते होणार आहे. यामुळे तिकिटी बुकिंगला लागणारा वेळही…
View On WordPress
0 notes
आर्थिक निर्णय आणि चालढकल
चालढकल या शब्दाची व्याख्या काहीशी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे चालढकल म्हणजे तातडीच्या आणि महत्त्वाच्या कृती किंवा निर्णय त्वरित न करता पुढे ढकलत राहणे त्या महत्त्वाच्या कृती किंवा निर्णया ऐवजी कमी महत्त्वाचे व तातडीचे नसणारे काही तरी काम करणे या सगळ्या कृतीत, नेहमीच महत्त्वाच्या कृती करायच्या राहून जातात. त्याचे दूरगामी परिणाम मात्र वाईट असू शकतात. बचतीच्या किंवा गुंतवणुकीच्या बाबतीतले निर्णय नेहमी त्या पठडीत येतात मला असे वाटते, काही अशा कृती, ज्यात सगळ्यात जास्त चालढकल होत असते, त्यात बचत किंवा गुंतवणुकीचे निर्णय हे नक्कीच वरच्या क्रमांकावर असतील.
कोणत्या निर्णयांची होत असते चालढकल
बरेच आर्थिक निर्णय किंवा कृती हे टाळल्या जातात. हे टाळण्यामागे जे कारण असते ते बऱ्याचदा अगदीच क्षुल्लक असते. पण दाखवले मात्र असे जाते कि ते फार मोठे कारण असावे.
महिन्याचा खर्च लिहिण्याची टाळाटाळ
गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची चालढकल
मासिक बचत सुरू करण्याची टाळाटाळ
मृत्युपत्र बनविण्याची चालढकल
आर्थिक नियोजन करण्याची टाळाटाळ
जोखमी पासून सुरक्षा देणारे विमा घेण्याचे निर्णय
वैयक्तिक आर्थिक कागदपत्रे ऑर्गनाईज करून जपून ठेवण्याची चालढकल
क्रेडिट कार्डवरील देय रक्कम चुकविण्याची चालढकल
काय असू शकते किंमत या चालढकलीची
वरील पैकी काही निर्णय न घेतल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आकड्यांमध्ये किंमत काढू शकतो पण काही बाबी या आकड्यांमध्ये मोजण्या पलीकडे आहेत. हे नुकसान मुख्यत्वे पैसे, वेळ व मानसिक त्रास या आघाड्यांवर होत असते.
जर आरोग्य विमा घेतला नसेल आणि एखादे मोठे आजारपण आले तर हॉस्पिटल ला इंजेक्शन ला जो खर्च येतो तो सध्या असलेली गुंतवणूक मोडून करावा लागतो विचार करा मागील तीन-चार वर्षात केलेली साठवून एका झटक्यात संपुष्टात येऊ शकते.
गुंतवणुकीस उशीर केल्याने चे व्याजाचे नुकसान होत असते त्याचा दीर्घकालामध्ये फार मोठा परिणाम होत असतो. समजा आज रुपये १०,००० ची एसआयपी वीस वर्षांसाठी सुरू करायची आहे व अपेक्षित व्याजाचा दर 12% आहे. ही एसआयपी आजच सुरू केली तर वीस वर्षानंतर मिळणारी रक्कम होते रुपये ९८,३३,०७५/-. पण हीच एसआयपी जर आठ महिने उशिराने सुरू केली तर मिळणारी रक्कम होते रुपये ९०,१०,४५०/-. याचाच अर्थ आठ महिने उशीर केल्याने नुकसान होणार आहे साधारण ८ लाख रुपयांचे.
जीवन विमा न घेणे, मृत्युपत्र न करून ठेवणे याचा बराच आर्थिक व मानसिक त्रास कुटुंबाला सोसावा लागतो.
आर्थिक नियोजन न करणे किंवा आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे वेळोवेळी व्यवस्थित न ठेवणे यामुळे तर खूप गोंधळ निर्माण होऊ शकतो व वेळेचा अपव्यय हमखास होतो. योग्य नियोजन न केल्यामुळे शिक्षण, लग्न, निवृत्ती यासारख्या ध्येयांसाठी ऐनवेळी आर्थिक बोजा पडून आनंदावर विरजण पडते.
क्रेडीट कार्ड वरील व्याज किंवा पर्सनल लोन वरील व्याज लवकर न भरल्यामुळे जे भरमसाठ व्याजावर व्याज लागत जाते त्यामुळे आर्थिक कणा निखळू शकतो.
चालढकल करण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी हे करा
मूळ प्रवृत्तीचा भाग म्हणून काही गोष्टी करणे आपल्याला आवडत नसते आणि त्यासाठी आपण कधीच तयार नसतो. तर स्वतःला वारंवार असे बजावून सांगा की जी महत्त्वाची आणि तातडीची कृती करायची आहे किंवा निर्णय घ्यायचा आहे, तो 'नावडताच' असणार आहे. परंतु ती कृती न केल्यामुळे किंवा तो निर्णय न घेतल्यामुळे होणारे नुकसान खुप मोठे असू शकते. म्हणून अनिच्छेने का होईना ते आत्ताच केले पाहिजे.
बऱ्याचदा महत्त्वाचे निर्णय आणि कृती यात जो वेळ जाणार असतो तो अगदीच 'थोडा' असतो. पण त्यासाठी विचार करण्यातच दिवस महिने आणि कधी कधी वर्षे ही खर्च होतात. स्वतःला आपण बजावले पाहिजे की फक्त थोडासा वेळ खर्च करून मी स्वतःचा खूप मोठा फायदा करून घेणार आहे.
महत्त्वाची कृती किंवा निर्णय घेतल्यानंतर सेलिब्रेट करा.
कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी वाट बघू नका. अशा प्रत्येक निर्णयाची डेडलाईन आजच आहे असे स्वतःला बजावा. एक अति महत्त्वाची चेकलिस्ट तयार करा. ही चेकलिस्ट नेहमीच्या इतर चेकलिस्ट पेक्षा वेगळी असायला हवी. हि महत्त्वाची चेकलिस्ट तुमच्या जोडीदाराला द्या व दोघांनी मिळून त्यावर 'ते काम झाले' अशी नोंद करा.
अशा प्रकारे काही पावले उचलून तुम्ही चालढकल करण्यापासून स्वतःला प्रवृत्त करुन, आपली आर्थिक निर्णयाबाबतची सक्षमता वाढवू शकता.
(सदर लेख दै. सकाळ च्या ' मैत्री पैशांशी' या लेखमालेमध्ये प्रकाशित झालेला आहे.)
0 notes
Gemology : सल्ला न घेताच घातलीत 'ही' रत्न तर झटक्यात बनवू शकतात गरीब, ही रत्न घालताना काळजी घ्या
Gemology : सल्ला न घेताच घातलीत ‘ही’ रत्न तर झटक्यात बनवू शकतात गरीब, ही रत्न घालताना काळजी घ्या
Gemology : सल्ला न घेताच घातलीत ‘ही’ रत्न तर झटक्यात बनवू शकतात गरीब, ही रत्न घालताना काळजी घ्या
These Two Stones Can Make You Rich : रत्न शास्त्रमध्ये दोन अशा रत्नांचा उल्लेख आढळतो. ही दोन रत्न परिधान करताना मात्र ज्योतिषांचा सल्ला घ्यावा असं सांगितलं जातं. ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय ही रत्न घालणं कधीकधी संकटाला आमंत्रण देण्यासारखंच असतं.
These Two Stones Can Make You Rich : रत्न शास्त्रमध्ये…
View On WordPress
0 notes
आहारात या 8 सुपरफूड्सचा समावेश करून रक्तातील साखरेची पातळी झटक्यात कमी करा
0 notes
वारंवार होणाऱ्या उलट्यांचा त्रास १ झटक्यात पळवून लावा
0 notes
रुईच्या पानांचा वापर फक्त अश्या पद्धतीने करा गुडघेदुखी, टाचदुखी, पोटऱ्यांना गोळे येणे कंबर दुखी, सांधे दुखी, एका झटक्यात या घरगुती उपायने कायमची बंद करा …..
रुईच्या पानांचा वापर फक्त अश्या पद्धतीने करा गुडघेदुखी, टाचदुखी, पोटऱ्यांना गोळे येणे कंबर दुखी, सांधे दुखी, एका झटक्यात या घरगुती उपायने कायमची बंद करा …..
मित्रांनो, गुडघेदुखी किंवा पायाच्या पोटऱ्यांना गोळे येणे किंवा पोटऱ्या सारख्या आखडून जाणे तसेच घोटे आखडले असतील किंवा दुखत असतील तर हा घरगुती उपाय करून पहा. वारंवार गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर हा त्रास कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आपण साधा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. काही घरगुती उपाय या आजारांवर उपचार फायदेशीर ठरतात आपल्या आसपास असणाऱ्या वनस्पती या उपायांसाठी खूपच उपयुक्त आहेत. अशाच एका…
View On WordPress
0 notes
Paytm IPO : Paytm ने एका झटक्यात 350 कर्मचाऱ्यांना केले करोडपती, कसा घडला हा चमत्कार...
Paytm IPO : Paytm ने एका झटक्यात 350 कर्मचाऱ्यांना केले करोडपती, कसा घडला हा चमत्कार…
नवी दिल्ली l देशातील सर्वात मोठ्या IPO नंतर इलेक्ट्रॉनिक्स अभियंता सिद्धार्थ पांडे करोडपती बनेल, पण तो म्हणतो की त्याला 9 वर्षांपूर्वी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएममध्ये सामील होण्यासाठी त्याच्या वडिलांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
कंपनीच्या एका सूत्राने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की पेटीएमच्या $2.5 अब्ज आयपीओनंतर, सुमारे 350 वर्तमान आणि माजी कर्मचार्यांची एकूण संपत्ती…
View On WordPress
0 notes
पहिला फटका...
१९८८ ला नुकताच इंजिनिअर झालो होतो. नव्यानेच कामाला सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करुन मोठ्या मुश्किलीने एक काम मिळाले. पैठणला काम होते. अनुभव कसलाच नव्हता. पण हिम्मत केली. कामाचे अॅडव्हान्स दोन हजार रुपये मिळाले होते. दहा रुपयांच्या दोन गड्ड्या माझ्या हातात आल्या होत्या. खूप खूश झालो होतो. शोधाशोध करुन मजूर मिळवले आणि सर्व ठरवून औरंगाबादला परत आलो.
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून पैठणला जायला निघालो. आज काम सुरू करायचे होते. लुनावरून डार्लिंग हॉटेलवर आलो. मस्तपैकी कटलेट्स खाल्ले आणि चहा घेतला. दोन्ही गड्ड्या वॉचपाकेटमध्ये कोंबून भरल्या होत्या. त्यामुळे पँट फुगली होती. त्यापैकी एक गड्डी ऐटीत बाहेर काढून बील दिले आणि बाहेर येवून उरलेले पैसे वॉचपाकेटमध्ये ठेवले आणि दुसरी आख्खी गड्डी पँटच्या समोरच्या खिशात वॉलेटच्या खाली ठेवली. पैसे आणि वॉलेट पँटच्या समोरच्या खिशात ठेवले की आपले लक्ष असते. आता वॉचपाकेट फुगून वर आलेले दिसत नव्हते. त्यामुळे रिलॅक्स वाटत होते. लुनाला किक मारून रेल्वेस्टेशनवर आलो. पार्किंगमधे लुना पार्क करुन स्टेशनच्या बसस्टॉपवर आलो. पैठणला जाणारी बस लागलीच होती पण खूप गर्दी होती. दुसर्या बसची वाट पाहिली तर वेळ होईल म्हणून गर्दीत कसाबसा वर चढत गेलो आणि पायर्याच्या वरती रॉडला धरुन उभा राहिलो.
वर चढत असतांनाच मागे कुणीतरी जोरात ओरडले ‘पाकीट मारले, चोर.. पकडा..’ असा गलका ऐकतच मी पायर्याच्या वरती येवून आत स्थिरावलो होतो. हलायलाही जागा नव्हती. त्यात कंडक्टरचे खेकसणे चालू होते. ‘पुढे सरका...ए बाबा ते गाठोडं काढ...ओ आज्जी, व्हा पुढं...’ असे ओरडत त्याने डबल बेल दिली आणि बस सुरु झाली.
माझ्या मागे पाकेट मारल्याची चर्चा रंगली होती. अवघड परिस्थितीतही मी वळून मागे बघत त्यांना म्हणालो ‘लोकं पाकीट मागच्या खिशात का ठेवतात समजत नाही. कुणीही ते सहज मारु शकते. नंतर ओरडत बसण्यात काही अर्थ नाही. पाकिट किंवा पैसे नेहमी समोरच्या खिशात ठेवले पाहिजेत...’ असे म्हणत मी डाव्या हाताने वरचा रॉड पकडून सहज माझ्या पँटच्या समोरच्या उजव्या खिशावर उजवा हात फिरवला तर काय! खिसा रिकामा! माझेच पाकीट गायब! पैसेही गायब! हालताही येत नव्हते एवढ्या दाटीवाटीने लोक उभे होते. तशाच अवस्थेत दोन्ही खिसे चाचपडले, मागचा खिसाही तपासला. पण सगळं साफ! जोरात ओरडलो ‘गाडी थांबवा...माझे पाकीट मारले कुणीतरी...’
कंडक्टरची वाट न पाहता एकाने बेल मारली. गाडी स्टेशनच्या गेटवरच पोहोचली होती. धक्के देत, ‘सरका...सरका’ असे म्हणत वाट काढत खाली उतरलो. उतरतांना माझ्या मागचे लोक मला हसत होते हे जाणवत होते. ‘आम्हाला शहाणपणा शिकवतो काय, घे आता...’ असे कदाचित ते मनात म्हणत असावेत असे वाटले. मला लाजल्या सारखे झाले होते. पण काही इलाज नव्हता. खाली उतरतांना एका माणसाने ‘तिकडे पळाला बघा..’ असे म्हणत त्या दिशेला हात दाखवला आणि बस निघून गेली.
मी त्याने दाखवलेल्या दिशेला पळत गेलो. खूप फिरलो. पण हाती काहीच लागले नाही. स्टेशनसमोर गल्ली बोळातील छोटी छोटी घरे असलेली अवैध वस्ती होती ती. बरीच मुले आणि लोकं होती त्या छोट्या रस्त्यावर. सर्वांचे चेहरे पाकीटमारासारखेच दिसत होते. कुणाला म्हणून विचारणार! तसाच मागे येवून पार्किंगमधून लुना काढली. तिच्यावर बसून परत त्या बोळाबोळात फिरुन आलो. काय करावे काहीच कळत नव्हते. कावरा बावरा झालो होतो. कधी नव्हे ते एवढे पैसे मिळाले होते. त्या काळी एक हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. ते एकदम नाहीसे झाले होते. खूप निराश झालो.
माझा घामेघुम चेहरा पाहून एका माणसाने मला काय झाले ते विचारले. मी सविस्तर सर्व सांगितले. त्याने सुचवले की रेल्वे पोलीसांना तक्रार कर, त्यांना सर्व माहित असते. मी लगेच स्टेशनवरच्या चौकीत गेलो. आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस चौकी इतक्या जवळून पाहून गर्भगळीत झालो होतो. भीत भीतच एका पोलीसाला घडलेली हकिकत सांगितली. माझ्याकडे पाहून मिश्किल हसत त्याने माझीच उलट तपासणी केली.
‘खिशात काय काय होते, किती पैसे होते?’
मी म्हटले ‘एक हजार रुपये आणि पाकेटमध्ये थोडी चिल्लर अन ड्रायव्हिंग लायसंस होते’.
‘घरुन निघाल्यावर कुठे कुठे गेला होता?’
आता या प्रश्नाचा इथे काय संबंध असे मनात आले होते, पण विचारणार कसे? गोंधळून मी सर्व कथा सांगितली. त्याबरोबर तो स्वत:च टाळी वाजवत म्हणाला ‘हां.. बरोबर. तू हॉटेलमध्ये नोटाचे बंडल बाहेर काढले होते. इथेच गोची झाली! तू पैसे ठेवत असतांना चोराने पाहिले असणार आणि तिथूनच तुझा पाठलाग केला असणार. त्याने पाळत ठेवून हे काम केले. आता काय उपयोग नाही. पुन्हा असे सर्वांसमोर पैसे काढत जावू नको. जा घरी.’
‘ठिक आहे साहेब.’ असे म्हणून बाहेर पडलो. तोंडात मारल्यासारखे झाले होते. चोर पकडायचे दूरच, त्याने मलाच शहाणपणा शिकवला. पण पोलीसांच्या नादी कोण लागणार! खजील होवून लुना स्टार्ट केली आणि वा�� फुटेल तिकडे जात वेरुळला पोहोचलो. इथे का आणि कसे आलो हे लक्षातच आले नाही. डोक्यात इतके विचार चालले होते की कुठे चाललोय हे कळतही नव्हते. मेहनतीने कमावलेले पैसे एका झटक्यात गायब झाले होते हा विचारच सहन होत नव्हता. नव्यानेच कामाला सुरुवात झाली होती. अन हे असे घडले. कामावरच्या लोकांना पैसे द्यायचे होते. आता कुठून देणार, कसे देणार, कोण माझ्यावर विश्वास ठेवणार अशा एक ना अनेक विचारांनी डोके गरगरत होते.
वेरूळला एका झाडाखाली खजील होवून बसून राहिलो. झाडाच्या गर्द सावलीत विचाराच्या तंद्रीत केव्हा झोप लागली कळलेच नाही. उठलो तेव्हा चार वाजले होते. भूक लागली होती. एका टपरीवर गरम भजे खाल्ले, चहा घेतला आणि खिन्न मनाने परत निघालो. मन थोडे शांत झाले होते. आपल्या नशीबात ते पैसे नव्हतेच असा मनाला समज देत औरंगाबादला आलो.
मित्राच्���ा रुमवर जावून सर्व वृत्तांत सांगितला. मित्रांनी मला धीर दिला. जाऊ दे जे झाले ते झाले. विसरुन जा सगळं. असे म्हणून माझे सांत्वन करू लागले. काही वेळ असाच गेला आणि अचानक एक एकजण हसू लागला. आधी खुदू खुदू आणि नंतर जोर जोरात हसणे सुरु झाले. हसता हसताच ते म्हणाले ‘लोकांना शहाणपणा शिकवत होतास. पाकीट समोरच्या खिशात ठेवायला पाहिजे...मागच्या खिशात ठेवायला नाही पाहिजे...बसला तुलाच फटका...’ असे म्हणत माझी नक्कल करत, टर उडवत सर्वजण किती न किती वेळ हसत होते. मला ओशाळल्यासारखे झाले होते. पण लगेच स्वत:ला सावरून मीही त्यांच्या हास्यात सामील झालो. हास्य विनोदामुळे मनात साठलेले विचार क्षणात पळून गेले. सर्व विसरून दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागलो.
या पहिल्या फटक्याने मला असा झटका दिला की तेव्हापासून मी खिशावर हात ठेवूनच फिरतो. गर्दी असो, धक्का लागो, काहीही होवो, पॅन्ट वरती ओढण्याचे नाटक करतो, पण खिसा सोडत नाही...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Sangli Suicide : सांगलीतील सामूहिक आत्महत्येचे रहस्य काय? गुप्तधनाच्या प्रकरणात डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी दिले जीव?
Sangli Suicide : सांगलीतील सामूहिक आत्महत्येचे रहस्य काय? गुप्तधनाच्या प्रकरणात डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी दिले जीव?
गुप्तधन मिळविण्यासाठी सांगलीच्या डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली का?
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क
या सामुहिक आत्महत्येमागे आणखी एक कारण समोर येत आहे ते म्हणजे अंधश्रद्धा किंवा गुप्तधनाच्या लालसेपोटी या कुटुंबाने एवढे मोठे पाऊल उचलले आहे. गुप्तधन किंवा मरणोत्तर जीवन जगण्याच्या उद्देशाने असे अपघात यापूर्वीही समोर आले आहेत.
एका झटक्यात 9 जणांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला. नऊ जणांनी…
View On WordPress
0 notes