Tumgik
#रविशंकर प्रसाद
countryinsidenews · 9 months
Text
दिल्ली ब्यूरो /विपक्षी एकता द्वारा गठबंधन का नामकरण इंडिया किए जाने को लेकर विपक्षी दलों पर जोरदार प्रहार किया
CIN ब्यूरो /पूर्व केंद्रीय मंत्री और भाजपा सांसद रवि शंकर प्रसाद ने विपक्षी एकता द्वारा गठबंधन का नामकरण इंडिया किए जाने को लेकर विपक्षी दलों पर जोरदार प्रहार किया और कहा की इंडिया नाम रख देने से कुछ नहीं होता उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का हवाला देते हुए कहा कि उन्होंने विपक्षी एकता के द्वारा नए नामकरण किए जाने पर अपनी टिप्पणी की है उसके तहत कई संगठनों के नाम में इंडिया लगा हुआ है लेकिन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"आमच्याकडे एक प्रश्न आहे": रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांवर टीका केली
“आमच्याकडे एक प्रश्न आहे”: रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांवर टीका केली
नवी दिल्ली: बिहारचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी भाजपमधून दुसऱ्यांदा फुटून जनतेच्या जनादेशाचा अवमान केल्याचा आरोप भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी आज नितीश कुमारांवर केला. श्री कुमार, ते म्हणाले, नरेंद्र मोदींमुळे – 2019 आणि 2020 मध्ये – दोन जनादेश जिंकले, परंतु भाजपसोबतची युती तोडली. माजी केंद्रीय मंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नितीश कुमार यांना आमचा प्रश्न आहे. “पंतप्रधान…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नितीश कुमारांनी भाजपाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रविशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
नितीश कुमारांनी भाजपाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रविशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
नितीश कुमारांनी भाजपाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रविशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… नितीश कुमारांकडून विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू असून ते चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (बुधवार) २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी नेत्यांवर टीका केली. बिहारचे…
View On WordPress
0 notes
‼️Breaking news‼️
"फिर पकड़ा गया BJP का झूठ..... 🤔
"राहुल गांधी जी ने कहा- 'भारत का कमज़ोर होता लोकतंत्र भारत की समस्या है और इसका समाधान भी हम खुद निकालेंगे।'
मोदी सरकार से बड़े बे-आबरू कर के बाहर किए गए रविशंकर प्रसाद जी को इतनी सी बात समझ न आई, निकल पड़े झूठ फैलाने और पकड़े गए।
BJP नेताओं का बस एक ही काम, झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो!!
‼️In NEWS: National,International, & Social media 📺‼️
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिंहराव, आणि कृषीतज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान जाहीर
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क माफ
राज्य शासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार जाहीर;दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार तर कौतिकराव ठाले पाटील यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
आणि
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
देशाचे दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह, दिवंगत पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, तसंच हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत डॉ एम एस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही घोषणा केली. पी व्ही नरसिंह राव यांनी देशात परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं तर चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. डॉ एम. एस. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण केलं तसंच देशात कृषी क्षेत्राचा कायापालट केल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
पुरोगामी लोकशाही आघाडीच्या काळातल्या दहा वर्षांच्या गैरकारभारातून अर्थव्यवस्था सावरण्याकरता केंद्र सरकारला दहा वर्ष लागली, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. सरकारने देशाच्या आर्थिक स्थितीवर सादर केलेल्या श्वेतपत्रिकेवर लोकसभेत झालेल्या चर्चेत त्या आज बोलत होत्या. दरम्यान, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी हे श्वेतपत्र सरकारचं राजनैतिक घोषणा पत्र असल्याचं सांगत टीका केली. काँग्रेसचे गौरव गोगोई, भाजपचे निशिकांत दुबे, रविशंकर प्रसाद, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजनसिंह, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आदींनी या श्वेतपत्रिकेवर आपले विचार मांडले.
****
मुंबईत आयोजित ओटीएम प्रदर्शनात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं दालन आंतरराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माहितीचा, राज्यातील पर्यटन वाढीसाठी नक्कीच लाभ होईल असं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी यावेळी उद्धाटन प्रसंगी सांगितलं. या दालनात राज्यतले गड किल्��े, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, कोकण यासह विविध पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या दालनाला विविध पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
राज्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांकडे अवैध मार्गाने बंदुका येत असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावं लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगाव इथं ही घोषणा केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभाग आणि शिक्षणशास्त्र विभाग इमारतीचं उदघाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्या सुरू असलेल्या ६४२ आणि नव्याने सुरु होणारे २०० अभ्यासक्रम अशा एकूण ८४२ अभ्यासक्रमांसाठी ही शैक्षणिक शुल्क सवलत लागू असेल. जर्मन देशाला कौशल्य असलेल्या ४ लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकवण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दिले जाणारे २०२३ साठीचे विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि प्रकाशन संस्थेस दिला जाणारा श्री पु भागवत पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक डॉ रवींद्र शोभणे यांना विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेला श्री पु भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ प्रकाश परब तसंच बेळगावच्या वाङ्गमय चर्चा मंडळाला अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार तर मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार डॉ कौतिकराव ठाले पाटील आणि नाशिकच्या कुसूमाग्रज प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. विविध वाङ्गमय पुरस्कार यावेळी जाहीर झाले. यामध्ये कवी दासू वैद्य यांच्या गोलम्‌गोल या बालकाव्य संग्रहाला बालकवी काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ लाभावी अशी अपेक्षा गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आयोजित प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी ते आज बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १४ जिल्ह्यातल्या बचत गटांनी सहभाग घेतला असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांचे ७५ स्टॉल उभारण्यात आले आहेत.
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. गेल्या तीन दिवसात सहाशे नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला असून सहा ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये एकशे शेहेचाळीस नागरिकांनी पीएम स्वनिधीसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर दोनशे एकतीस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, ही यात्रा आज शहरातील सांगवी भागातील बुद्ध विहार परिसर आणि तरोडा भागात तथागतनगर इथं पोहोचली. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या लाभार्थी महिलांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले.
बाईट - सुनीता कटोरे आणि मनिषा बंगेवार, जि.नांदेड
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातले प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. पंढरपूर इथं यासंबंधी कामांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. शहरात येणाऱ्या भाविकांना तसंच स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. याठिकाणी एकशे आठ मंजूर कामांपैकी सहासष्ट कामं पूर्ण झाली तर सोळा कामं प्रगतीपथावर असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात चारचाकी वाहन पुलावरून कोसळल्याने एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. काल रात्री भोकर इथून उमरीला जात असताना हाळदा - मोघाळी रस्त्यावरील शिवारात हा अपघात झाला. जखमींवर भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
तरुण पिढीतील कलाकारांनी अक्षर सौंदर्य आणि त्यामध्ये दडलेले अर्थशास्त्र समजून घ्यावे असं मत सुप्रसिद्ध अक्षर रचनाकार सुनील धोपनकर यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाच्या वतीनं अक्षर सौंदर्य अर्थात टायपोग्राफी या विषयावर आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेत ते आज बोलत होते.
****
नांदेड इथं गुरुव्दारा बोर्ड कायद्याच्या प्रस्तावित संशोधनाला शीख बांधवांनी विरोध दर्शवत आज गुरुद्वाऱ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात अनेक शीख बांधव सहभागी झाले
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: बदलती राजकीय आव्हाने आणि समकालीन परिदृश्य' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात "भारतीय लोकशाहीवरील वाढती आक्रमणे आणि प्रसारमाध्यमांची भूमिका" या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी तर दुसऱ्या सत्रात "स्वातंत्र्योत्तर भारतातील पक्षीय, प्रादेशिक, राष्ट्रीय राजकारण आणि निवडणुकी समोरील आव्हाने" या विषयावर डॉ सुनिल पिंपळे यांनी मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बीड इथं आज आधुनिक समुपदेशन केंद्राचं उ‌द्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
0 notes
n7india · 3 months
Text
हेमंत सोरेन की गिरफ्तारी को लेकर केंद्र सरकार पर लगाए जा रहे आरोप पूरी तरह से बेबुनियाद : BJP
New Delhi: भाजपा नेता रविशंकर प्रसाद ने हेमंत सोरेन की गिरफ्तारी को लेकर केंद्र सरकार पर लगाए जा रहे आरोपों को पूरी तरह से बेबुनियाद करार देते हुए विपक्षी दलों पर जमकर हमला बोला है। भाजपा राष्ट्रीय मुख्यालय में मीडिया से बात करते हुए रविशंकर प्रसाद ने कहा कि हेमंत सोरेन गिरफ्तार हो गए हैं, जो कानूनी कार्यवाही चल रही है, उस पर उन्हें कुछ नहीं कहना है। लेकिन, उनके समर्थकों द्वारा जो आरोप लगाया जा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prakhar-pravakta · 3 months
Text
श्री बिहारी रामलीला समाज ने श्रीराम लला प्राण प्रतिष्ठा पर वितरित किया प्रसाद
सतना श्री बिहारी रामलीला समाज द्वारा बिहारी चौक बिहारी मंदिर में अयोध्या राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा होने पर श्रद्धालुओ ने प्रसाद शाम को वितरित किया और जय श्री राम के जय घोष के साथ गगन भेदी जयकारे लगाए गए। प्राण प्रतिष्ठा को लेकर बड़े ही धूमधाम से प्रसाद वितरण किया गया। इस दौरान सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया गया। लोगों ने एक दूसरे को मिठाई खाकर बधाई दी। प्रसाद वितरण मे रविशंकर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 4 months
Text
आज ही के दिन हुई थी भारत रत्न देने की शुरुआत, जानें किसे दिया जाता है यह सम्मान
नई दिल्ली: भारत के पहले राष्ट्रपति डॉ. राजेन्द्र प्रसाद ने आज ही के दिन यानी 2 जनवरी 1954 को 'भारत रत्न' को संस्थापित किया ���ा। देश का सबसे बड़ा नागरिक सम्‍मान 'भारत रत्न' (Bharat Ratna ) है। यह उन महान शख्सियतों को दिया जाता है, जिन्‍होंने कला, साहित्य, विज्ञान, समाज सेवा और खेल के क्षेत्र में उल्लेखनीय और असाधारण योगदान के जरिए राष्ट्र सेवा की हो। बता दें कि खेल के क्षेत्र में विशिष्ट उपलब्धि हासिल करने वालों को भी भारत रत्न से सम्मानित करने का प्रावधान बाद में किया गया। वर्ष 2014 में सचिन तेंदुलकर खेल के क्षेत्र में भारत रत्न पाने वाले अब तक इकलौते भारतीय हैं। यह कोई अनिवार्य नहीं है कि, भारत रत्‍न सम्‍मान हर साल दिया ही जाए। भारत रत्‍न देने के लिए नामों की सिफारिश भारत के प्रधानमंत्री, राष्ट्रपति से करते हैं। जिसके बाद राष्‍ट्रपति की ओर से उस व्‍यक्ति को यह सम्‍मान दिया जाता है। इस पुरस्कार के तहत प्राप्तकर्ता को राष्ट्रपति द्वारा हस्ताक्षरित एक सनद (प्रमाण पत्र) और एक पदक प्राप्त होता है। पुरस्कार में कोई मौद्रिक अनुदान नहीं होता है। भारत रत्न की डिजाइन पहले भारत रत्न की डिजाइन में 35 मिमी गोलाकार स्वर्ण पदक था और इस पर सूर्य बना था। जिसके ऊपर हिंदी में भारत रत्न लिखा हुआ था और नीचे की तरफ पुष्पहार था। इसके पीछे राष्ट्रीय चिन्ह और वाक्य लिखा होता था। इसके बाद रत्न में बदलाव करते हुए तांबे के बने पीपल के पत्ते पर प्लेटिनम का चमकता सूर्य बना दिया गया। इसके नीचे चांदी में भारत रत्न लिखा रहता है। भारत रत्‍न से सम्‍मानित हस्तियों की सूची * प्रणब मुखर्जी (2019) * भूपेन हजारिका (2019) * नानाजी देशमुख (2019) * मदन मोहन मालवीय (2015) * अटल बिहारी वाजपेयी (2015) * सचिन तेंदुलकर (2014) * सीएनआर राव (2014) * पंडित भीमसेन जोशी (2008) * लता दीनानाथ मंगेशकर (2001) * उस्ताद बिस्मिल्लाह खान (2001) * प्रो अमर्त्य सेन (1999) * लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई (1999) * लोकनायक जयप्रकाश नारायण (1999) * पंडित रविशंकर (1999) * चिदंबरम सुब्रमण्यम (1998) * मदुरै शनमुखावदिवु सुब्बुलक्ष्मी (1998) * डॉ. अबुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (1997) * अरुणा आसफ अली (1997) * गुलजारी लाल नंदा (1997) * जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (1992) * मौलाना अबुल कलाम आज़ाद (1992) * सत्यजीत रे (1992) * राजीव गांधी (1991) * सरदार वल्लभभाई पटेल (1991) * डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर (1990) * डॉ. नेल्सन रोलिहलाहला मंडेला (1990) * मरुदुर गोपालन रामचंद्रन (1988) * खान अब्दुल गफ्फार खान (1987) * आचार्य विनोबा भावे (1983) * मदर टेरेसा (1980) * कुमारस्वामी कामराज (1976) * वराहगिरी वेंकट गिरी (1975) * इंदिरा गांधी (1971) * लाल बहादुर शास्त्री (1966) * डॉ. पांडुरंग वामन केन (1963) * डॉ. जाकिर हुसैन (1963) * डॉ. राजेंद्र प्रसाद (1962) * डॉ. बिधान चंद्र रॉय (1961) * पुरुषोत्तम दास टंडन (1961) * डॉ. धोंडे केशव कर्वे (1958) * पं गोविंद बल्लभ पंत (1957) * डॉ. भगवान दास (1955) * जवाहरलाल नेहरू (1955) * डॉ. मोक्षगुंडम विवेस्वराय (1955) * चक्रवर्ती राजगोपालाचारी (1954) * डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन (1954) * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1954) http://dlvr.it/T0rSTj
0 notes
newsmakeinindia · 8 months
Video
youtube
BJP नेता रविशंकर प्रसाद ने | Sonia Gandhi and Rahul Gandhi | से सवाल कर ...
0 notes
vanmarkvans · 8 months
Text
Tumblr media
एक प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और कानूनी विशेषज्ञ रविशंकर प्रसाद अपना जन्मदिन 30 अगस्त 1954 को मनाते हैं। जैसा कि हम उनके विशेष दिन का सम्मान करते हैं, आइए भारतीय राजनीति और समाज में उनकी उल्लेखनीय यात्रा और योगदान पर विचार करने के लिए कुछ समय निकालें। प्रारंभिक जीवन और शिक्षा: 30 अगस्त 1954 को जन्मे रविशंकर प्रसाद जन्मस्थान, पटना, बिहार,से हैं। उन्होंने अपनी शिक्षा शानदार अंकों के साथ पूरी की और पटना विश्वविद्यालय से बीए ऑनर्स, एमए (राजनीति विज्ञान) और एलएलबी की डिग्री हासिल की। उनकी शैक्षणिक उत्कृष्टता और कानून की गहरी समझ ने उनके भविष्य के प्रयासों की नींव रखी। कानूनी कैरियर: रविशंकर प्रसाद की कानूनी कौशल को जल्द ही पहचान मिल गई और वह एक प्रतिष्ठित वकील के रूप में उभरे। न्याय के लिए उनकी वकालत और कानून के शासन को बनाए रखने की प्रतिबद्धता ने उन्हें कानूनी बिरादरी के भीतर सम्मान दिलाया। राजनीति में प्रवेश: बड़े पैमाने पर बदलाव लाने की अपनी क्षमता को पहचानते हुए रविशंकर प्रसाद ने राजनीति के क्षेत्र में प्रवेश किया। उनके प्रवेश से भारत के राजनीतिक परिदृश्य में एक परिवर्तनकारी यात्रा की
0 notes
newsuniversal-in · 8 months
Text
राज्यस्तरीय पत्रकार महाधिवेशन सह सम्मान समारोह का आयोजन
Tumblr media
लखीसराय, बिहार। शहर के नया बाजार आरलाल कॉलेज के समीप सम्राट अशोक भवन में इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन बिहार इकाई के बैनर तले राज्यस्तरीय पत्रकार महाधिवेशन सह सम्मान समारोह का आयोजन किया गया। जिसकी अध्यक्षता इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन  बिहार के प्रदेश अध्यक्ष रणजीत कुमार सम्राट ने की। समारोह का उद्घाटन डीएम अमरेंद्र कुमार, एडीएम सुधांशु शेखर, एसडीओ डॉ निशांत राज, प्रसिद्ध चिकित्सक डॉ प्रवीण कुमार सिन्हा, ऑल बिहार को-ऑपरेटिव बैंक इम्पलाइज फेडरेशन के प्रदेश उपाध्यक्ष सह वरीय शाखा प्रबंधक विपिन कुमार, एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी व मुख्य अतिथि गंगेश गुंजन, एसके राजीव, पीके आजाद व वरीय अधिवक्ता कुमारी बबीता द्वारा दीप प्रज्वलित कर किया गया। जबकि कार्यक्रम का संचालन मनोज मेहता व वरिष्ठ पत्रकार राजेश कुमार ने की। इस अवसर पर पत्रकारों को संबोधित करते हुए उद्घाटन कर्ता सह डीएम अमरेंद्र कुमार ने कहा कि पत्रकारिता एक जुनून है, लेकिन इसमें भी सोच समझकर कार्य करना चाहिए। उन्होंने नवोदित पत्रकारों से कहा कि बायस्ड होकर खबर नहीं करें, दोनों पक्षों की बातों को भी अपने खबरों में समाहित करें. जिससे आपकी प्रतिष्ठा भी बनी रहेगी। मुख्य अतिथि वरिष्ठ पत्रकार गंगेश गुंजन ( एडीटर इन चीफ़ - न्यूज 22 स्कोप) ने महाधिवेशन को संबोधित करते हुए कहा कि पत्रकारों को अपने हक और अधिकार के लिए एकजुटता जरूरी है। समाज में शांति स्नेह और सद्भाव के साथ खबरों की वास्तविकता आम और आवाम के बीच परोसने की जरूरत है। जनता के बीच विश्वास पैदा कर सरकार से अपने हक और हुकूक के लिए पत्रकारों को लड़ना होगा। अति विशिष्ट अतिथि सह एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी ने वर्तमान परिस्थिति में पत्रकारों के हालात पर चर्चा करते हुए कहा कि आये दिन पत्रकार पर हमले किये जा रहे हैं तथा सरकार पत्रकार को सुरक्षा देने में नाकाम रही है। सरकार द्वारा समय-समय पर पत्रकारिता पर कुठाराघात किया जा रहा है, जिससे पत्रकारों में आक्रोश व्यक्त है। सरकार पत्रकार सुरक्षा कानून व मिडिया नीति बनाएं। स्वागत गान से हुई कार्यक्रम की शुरुआत। कार्यक्रम की शुरुआत पवन बिहारी एंड ग्रुप द्वारा स्वागत गान से की गयी, इसके बाद पत्रकार के सम्मान का दौर शुरू हुआ। इससे पूर्व आंगतुक अतिथियों को एसोसिएशन के सदस्यों द्वारा बुके देकर माल्यार्पण व स्मृति चिन्ह व शाल ओढ़ाकर सम्मानित किया गया। मौके पर इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन बिहार के प्रदेश अध्यक्ष रंजीत सम्राट, मो. अनवारूल हक (लखनऊ), इश्तियाक अहमद (नेपाल), डी एन एम न्यूज के संपादक पीके आजाद, रफ्तार मिडिया पटना के मदन गुप्ता, राजीव रंजन उपाध्याय, केवल सच के प्रबंध संपादक अरुण बंका, ईटीवी भारत पटना के कुंदन कुमार, नवबिहार के संपादक अमरजीत मौआर, न्यूज 22 स्कोप के बिहार हेड एसके राजीव, मिथलेश कुमार नवादा। मनीष कमालिया नवादा, अजीत कुमार केशरी जमुई, के.एम.राज (मुंगेर), मनीष कुमार (मुंगेर), चंदन वर्मा (शेखपुरा), विश्वनाथ गुप्ता (लखीसराय), पंकज झा (बेगूसराय), राकेश कुमार सिंह, सुधांशु रंजन शुक्ला(पटना), बृज मोहन भगत, रफ्तार मिडिया से आशीष कुमार, दिपक कुमार।  लखीसराय जिलाध्यक्ष सुनील कुमार, राजीव मुरारी सिन्हा, दिवाकर सिंह रामपुरिया, सुधाकर पाण्डेय,रामायण सिंह राजपूत, अमलेश पाण्डेय, संतोष पाण्डेय,मनीष गुप्ता, कुमार हिमांशु, अजय कुमार झा, देव कुमार, भोला यादव, चांद किशोर यादव, जेपी सिं���, चंदन कुमार मिश्रा, सुमित सिंह, नलिनी रंजन, रजा मुराद (सुपौल। मो. शाहिद(मधेपुरा), राकेश रोशन, प्रदीप कुमार, अभिषेक सिन्हा, मिन्हाज( दरभंगा),गुलाम सरवर, लक्ष्मण कुमार, फरोग रहमान के आलावे नगर परिषद के उपाध्यक्ष शिवशंकर राम, रविशंकर सिंह अशोक,नेशनल चैम्बर आँफ काँमर्स के अध्यक्ष सुरेश प्रसाद  नूतन विपिन ,रंजय सिंह, शिक्षाविद रंजन कुमार, धर्मेन्द्र कुमार आर्य, प्रेमचंद कुमार, सिकंदर विद्यार्थि, प्रकाश मंडल, रंजन पासवान, अरविंद कुमार, रामाशीष बिंद, धर्मदेव चौधरी, अमन कुमार आदि उपस्थित रहे। Read the full article
0 notes
countryinsidenews · 1 year
Text
पटना /पूर्व मंत्री रवि शंकर प्रसाद और शाहनवाज हुसैन नें पूछा-बिहार में सरकार कैसे चल रही है -बड़ी पार्टी के प्रदेश अध्यक्ष अपने क्रोध के कारण अपने गांव में बैठे हैं
पटना /पूर्व मंत्री रवि शंकर प्रसाद और शाहनवाज हुसैन नें पूछा-बिहार में सरकार कैसे चल रही है -बड़ी पार्टी के प्रदेश अध्यक्ष अपने क्रोध के कारण अपने गांव में बैठे हैं
प्रियंका भारद्वाज की रिपोर्ट /पूर्व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद का बयान.आज संस्थान में सिलाई केंद्र में विभिन्न जो टॉपर है उनको प्रशस्ति पत्र बांटा और हर समाज की लड़कियां आगे बढ़ रही हैं हर लड़की के हाथ में हुनर हो हमारी यह सोच है नरेंद्र मोदी सरकार की एक कोशिश है कि देश को आम आदमी में हुनर होना चाहिए.भारत जोड़ो यात्रा में बिहार में भी अब तैयारियां शुरू हो गई.पूर्व केंद्रीय मंत्री ने कहा कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nationalistbharat · 11 months
Text
हराम के पैसों से दिल्ली के न्यू फ्रेंड्स कॉलोनी में रहता है लालू राबड़ी का परिवार, संजय जायसवाल का वार
नई दिल्ली:इन दिनों भारतीय जनता पार्टी के बिहार प्रदेश के पूर्व अध्यक्ष और सांसद संजय जयसवाल और राष्ट्रीय जनता दल के दरमियान सोशल मीडिया पर जंग छिड़ी है। इस जंग की शुरुआत राष्ट्रीय जनता दल ने की जिसने अपने अधिकारी सोशल मीडिया अकाउंट पर दो फोटो शेयर करते हुए पूर्व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद और बिहार प्रदेश भारतीय जनता पार्टी के पूर्व अध्यक्ष संजय जयसवाल को निशाने पर लिया था। राष्ट्रीय जनता दल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवलं होतं - रविशंकर प्रसाद
पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवलं होतं – रविशंकर प्रसाद
पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवलं होतं – रविशंकर प्रसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध 3 तास थांबवलं होतं असा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.   भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून काढण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे भारतीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
oyspa · 11 months
Text
क्यों हटा दिए गए किरण रिजिजु ? क्यों हटाए गए थे रविशंकर प्रसाद ?
2014 से मोदी मंत्रिमंडल के चहेते मंत्री रहे हैं। वर्ना संघ और बीजेपी के पुराने नेता रविशंकर प्रसाद को हटाकर उन्हें क़ानून मंत्रालय नहीं दिया जाता। कई मीडिया रिपोर्ट में ऐसा पढ़ने को मिल रहा है कि सुप्रीम कोर्ट से टकराव या न्यायपालिका में हस्तक्षेप कारण हटा दिए गए। सुप्रीम कोर्ट को लेकर मोदी सरकार के ट्रैक रिकार्ड को देखें तो तो यह कारण केवल बहाना लगता है। किरण रिजिजु को इस वजह से नहीं हटाया गया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsdaynight · 1 year
Text
क्या राहुल गांधी अपील के नाम पर ड्रामा कर रहे हैं ? कानून मंत्री ने पूछे तल्ख सवाल
Delhi: कुछ दिन पहले राहुल गांधी सूरत कोर्ट पहुंचे और उसी दिन उन्हें मानहानि मामले में दोषी ठहराते हुए 2 साल की सजा सुनाई गई थी। कांग्रेस नेता को 30 दिन का वक्त मिला था और आज वह ऊपरी अदालत में अपील करने एक बार फिर सूरत में हैं। किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, संबित पात्रा समेत कई भाजपा नेताओं ने इसे दुर्भाग्यपूर्ण बताते हुए कोर्ट पर दबाव बनाने की कोशिश बताया है। http://dlvr.it/SlvdBG
0 notes